शनिवार, १७ एप्रिल, २०२१

आंबोलीत सुरु आहे स्वच्छतेचा 'अभिषेक'

    गेल्यावर्षी कोरोना विषाणूच्या संक्रमणापूर्वी महिनाभर अगोदर शेवटची जंगलमय आंबोली पाहिली होती. तेव्हा अनेक ठिकाणी नजरेला खटकलेल्या कचऱ्याने तीव्र दु:खही झालेलं. सोबत असलेले वन्यजीव अभ्यासक रोहन कोरगावकर मात्र प्रत्येक नेचरट्रेलमध्ये जंगलवाटांवर पडलेला कचरा गोळा करत होते. यंदाही कोरोनाची दुसरी लाट महाराष्ट्रात सक्रीय होण्यापूर्वी मार्चच्या शेवटच्या आठवड्यात आंबोलीला गेलेलो. तेव्हाही नेचरट्रेलमध्ये जंगलवाटांवर पडलेला कचरा गोळा करण्याचे काम चालू राहिले. दरम्यान ‘आंबोली’त स्वच्छतेचा ‘अभिषेक’ सुरु असल्याची माहिती मिळाली. काहीसं सुखावायला झालं. स्वच्छतेच्या या अभिषेकात आपणही सामील व्हावं असं बोलूनही दाखवलं. पण आम्ही आंबोलीत असताना नेमक्या कचरा भरण्यासाठी लागणाऱ्या पिशव्या संपलेल्या होत्या. स्वच्छतेच्या या अभिषेकातून एक-दोन नव्हे तर तब्बल अडीचशे पिशव्यांतून साडेबाराशे किलोहून अधिक कचरा केवळ महादेवगड पॉईंट परिसरातून गोळा झाल्याचे आम्ही पाहिले. आम्ही आंबोलीत सुरु असलेला हा स्वच्छतेचा 'अभिषेक' समजून घेतला. चांगलं काहीतरी घडवू पाहणाऱ्या अशा सत्प्रवृत्त कामांना समाजाची खंबीर साथ मिळायला हवी, या हेतूने केलेलं हे विवेचन !

१०-१२ वर्षांपूर्वीपर्यंत अभिषेक नार्वेकर हा तरुण (मो. ०९४२३२१३१५३) इतर पर्यावरण प्रेमींप्रमाणे आंबोलीत संशोधनासाठी येणाऱ्या संशोधकांसोबत काम करत होता. अशा साऱ्या कामातून संशोधन पातळीवर ‘आंबोली’ खूप पुढे गेली. पण ‘संवर्धन’ विषय मागे पडला. यातला कचरा हा विषय अभिषेकला खटकत होता. तसे आंबोलीच्या स्वच्छतेचे प्रयत्न यापूर्वी ‘मलबार नेचर कॉन्झर्वेशन क्लब’ने केलेले होते. पुन्हा त्याची गरज असल्याचे लक्षात आल्याने अभिषेकने एके दिवशी ठरवलं, ‘आंबोलीतील मुख्य रस्त्यावर असलेल्या पोलीस चौकीपासून महादेवगड पॉईंटच्या शेवटपर्यंत आणि रस्त्याच्या दुतर्फा दरीत पडलेलाही सारा कचरा स्वच्छ करायचा’. त्याने आपली ही भूमिका सोशल मिडीयावर, ‘PROJECT CLEAN AMBOLI’ पेजवर जाहीर केली. समाजाचा प्रतिसाद मिळू लागला. अभिषेकने आपले सहकारी चेतन नार्वेकर, राकेश देऊलकर, सुजन ओगले आणि कौमुदी नार्वेकर यांच्या सहकार्याने हा कचरा गोळा केला. यासाठी त्यांनी २५ किलो क्षमतेच्या सिमेंटच्या रिकाम्या पिशव्या उपयोगात आणल्या. या टीमने मार्चच्या शेवटच्या आठवडयापर्यंत अडीचशेहून अधिक पिशव्या भरल्या होत्या. या पिशव्यातील कचरा सरासरी ५ किलो वजनाचा गृहित धरला तरी संपूर्ण कचरा साडेबाराशे किलो होत होता. आम्ही आंबोलीत होतो तेव्हा या अभियानाला तीनेक आठवडे झाले होते. आज ४५-५० दिवस होत आलेत. इथले स्थानिक सोशल मिडीयावर फारसे सक्रीय नसल्याने अभिषेकने तीनेक आठवडे कचरा गोळा केल्यावरही प्रशासनापर्यंत याची माहिती पोहोचली नव्हती. कचरा गोळा करायला सुरुवात केल्याच्या पहिल्या दिवशी अभिषेकने चार बॅग कचरा गोळा केला होता. यासाठीची वेळ त्याने सकाळ किंवा संध्याकाळची ठरवली होती. अशाच एके दिवशी त्याने तब्बल १६ बॅग कचरा गोळा केला.

महादेवगड पॉईंट परिसरात खूप कचरा होता. बराच कचरा वाऱ्याने उडून खोल दरीत गेला होता. अभिषेकने गोळा केलेल्या एकूण कचऱ्यापैकी रस्त्याशेजारी पडलेला मोजका कचरा वगळता ९५ टक्के कचरा हा जंगलात उताराच्या बाजूंवर दरीत मिळालेला आहे. माउंटनेरिंगचा कोर्स पूर्ण केलेल्या अभिषेकने गेल्या अनेक वर्षांपासून दरीत गेलेला, अडकून राहिलेला कचरा पहिल्यांदा दरीबाहेर आणला. दरीतून वरती जमिनीकडे पाहिले असता स्वच्छतेसाठी गेलेल्या व्यक्तीला बराच कचरा पानांखाली लपलेला दिसतो. मात्र हा कचरा जमिनीवरून दरीत खोलवर पाहिले असता दिसत नाही. यात पाण्याच्या प्लास्टिक बाटल्या, मद्याच्या बाटल्या, वेफर्सटाईप कुरकुऱ्यांची पाकीटे पुष्कळ आहेत. आंबोलीसारख्या संरक्षित जंगलात कचरा स्वच्छतेची जबाबदारी प्रशासनाची  आहे. पण ती ‘माहितीचे फलक’ लावण्यापलिकडे किती काळजीपूर्वक तपासली जाते ? काय माहित. असो ! तर दरीतला हा कचरा जमिनीवर आणून पुन्हा महादेवगड पॉईंटच्या पार्किंगपर्यंत नेणे वाटते तितके सोपे नव्हते. ज्यांनी आंबोली आणि महादेवगड पॉईंट पाहिला आहे, त्यांना यातले किमान परिश्रम लक्षात यावेत. परिश्रम लक्षात आलेल्या पर्यटकांनी पर्यटनस्थळी कुठेही, कसाही कचरा फेकताना हे काम जरी लक्षात घेऊन जंगल क्षेत्रातील अस्वच्छता टाळली तरी त्यांना ‘कदाचित’ देशसेवा केल्याचं पुण्य पदरात पाडून घेता येईल. हा सारा कचरा तातडीने स्थानिक व्यवस्थेला देऊ केला तर आंबोलीतील कचऱ्याच्या समस्येकडे कोणाचे लक्ष जाणार नाही. म्हणून त्याला महादेवगड पॉईंटवर साठविण्यात आले. भविष्यात आंबोलीतील इतर ठिकाणीही स्वच्छतेचं काम करायचे आहे. महादेवगड पॉईंटवर कचरा ठेवायला पुरेसी जागा उपलब्ध होती. इतर ठिकाणी ती नाही ही अडचणही आहे. आंबोलीत कचऱ्यासाठी डम्पिंग यार्डची आवश्यकता आहे. स्थानिक प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे, असे अभिषेकला वाटते. अभिषेकने या कामासाठी कोणालाही आग्रहपूर्वक बोलावले नाही. फक्त आवाहन केले. याचं महत्त्व आणि आवश्यकता माहित असलेले मोजके सहकारी त्याच्यासोबत जोडले गेले. यातले राकेश आणि सुजन हे दोघे स्वच्छतेचे काम आंबोली-चौकुळ मार्गावर नियमित करत असतात. सोशल मिडीयावर रोज सकाळी उठून शुभेच्छा देणे ही आपली नैतिक जबाबदारी असल्यासारखे मेसेज करणारे पहाटे उठून अभिषेकसोबत कचरा गोळा करायला पोहोचले नाहीत.

सध्या आंबोलीतील महादेवगड पॉईंट स्वच्छतेचा श्वास घेत आहे. लवकरच तो ‘प्लास्टिक फ्री झोन’ बनेल. या जंगलात आतवर पुन्हा कचरा जायला ‘कुठेही कचरा फेको’ टाईप पर्यटकांना अजून दोनेक वर्ष मेहनत घ्यावी लागेल. पण हे चक्र असचं चालू ठेवू द्यायचं ? की यावर कडक उपाययोजना करायच्या ? हे स्थानिक प्रशासनाने ठरवायचं आहे. ...अन्यथा अभिषेकसारखे तरुण आपलं काम करत राहतील. मात्र अशा स्वच्छता अभियानातून पर्यटक आणि गावाच्या संपूर्ण सुधारणेची जबाबदारी वाहणारे ‘खांदे’ नक्की काय करणार ? हेही पाहाणं महत्वाचं आहे. गेली दहाएक वर्षे अभिषेक पुण्यात एका ट्रॅव्हल कंपनीच्या माध्यमातून देशभरात साहसी आणि वन्यजीव क्षेत्रातील अभ्यासपूर्ण सहलींचे नियोजन करू करत होता. याच कामातून त्याने अनेकदा ‘ट्रेक्स हिमालया’दरम्यान तेथील पर्वतांमध्ये कचरा स्वच्छतेचे प्रयोग केले. त्यावेळी आपण आपल्या, ‘आंबोलीत असे काहीही केलेले नाही’ याची त्याला प्रकर्षाने जाणीव व्हायची. साहसी पर्यटनासह वन्यजीव, सूक्ष्म वनस्पती आणि जीवजंतूचा अभ्यास असलेल्या अभिषेकने २०१२ मध्ये एकाच वर्षात १५० हून अधिक फोर्ट ट्रेक केलेत. २०१५ मध्ये त्याने मनाली ते लेह आणि श्रीनगर पर्यंतची उंच डोंगरावरील सर्वात पहिली एकल सायकलिंग मोहीम पूर्ण केली. २०१७ मध्ये त्याने देशातील नऊ किनारावर्ती राज्यातून ७२ दिवसात ६७८० किलोमीटर सायकलिंग करून केले. ‘इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड्स’ने असे हे पहिले भारतीय सायकलिंग असल्याचे मान्य केले होते. असा हा अभिषेक गेल्यावर्षी कोरोना संक्रमणात आंबोलीत परतला. गेली अनेक वर्षे मान्सून टुरिझम, वाईल्डलाईफ टुरिझम आदी प्रयोग आंबोलीत सुरु आहेत. हेच काम आंबोलीत सुरु करण्याच्या प्रयत्नात असलेल्या अभिषेकच्या नजरेला इथला कचरा खटकू लागला. आपल्या सोबत फिरणाऱ्या साहसी आणि पर्यावरणप्रेमी पर्यटकांना आपण हाच कचरा दाखवायचा का ? या विचारातून स्वच्छतेचं हे काम उभं राहिलं. गप्पांच्या ओघात बोलता बोलता अभिषेक ‘बारा महिने, डेस्टिनेशन आंबोली’ यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्याच्याकडून समजल्यावर आम्हाला खूप आनंद झाला. कारण गेले वर्षभर नेमक्या याच विषयावर आम्ही आणि वन्यजीव अभ्यासक रोहन कोरगावकर विचार करत होतो. वन्यजीव अभ्यासक मल्हार इंदुलकर, सर्पमित्र अनिकेत चोपडे, निसर्गप्रेमी विलास महाडिक ही मंडळी सोबत होती. तीच संकल्पना अधिक विस्तृत आणि खात्रीशीर स्वरुपात अभिषेक ऐकवत राहिला. कोकणातल्या आंबोलीत, थंड हवेच्या ठिकाणी पर्यटक बारमाही वावरावा यासाठीच्या प्रयत्नात आता अभिषेकही असणार आहे.

जमलेल्या कचऱ्यातील प्लास्टिक आणि काचेच्या बाटल्या, काचा घेऊ शकणाऱ्या मंडळींची अभिषेकला माहिती मिळाली आहे. एकूणपैकी याचाच कचरा ६० टक्क्याहून अधिक आहे. उर्वरित कचरा हा प्लास्टिक वेस्ट आहे. यासाठीची व्यवस्था लावण्यात आणि भविष्यातील स्वच्छता नियोजनात सध्या अभिषेक आणि सहकारी गुंतलेत. त्यांच्या या खऱ्याखुऱ्या सेवाभावी प्रयत्नांना मनापासून शुभेच्छा द्यायला हव्यात. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कृत्रिम ऑक्सिजनसाठी वणवण भटकणाऱ्या आपण समाजाने, शासकीय यंत्रणेने अशा पर्यावरणपूरक कार्य साधणाऱ्या प्रयत्नरतांकडे ‘वेडे’ म्हणून बघण्याचे सोडून विशेष सहकार्य भावना दाखवावी. वेळोवेळी आपणहून एक पाऊल पुढे टाकावे, अशी अपेक्षा आहे.

धीरज वाटेकर

dheerajwatekar@gmail.com


ऑनलाईन लोकमत न्यूजपेपर लिंक :  https://www.lokmat.com/ratnagiri/amboli-begins-anointing-cleanliness-a703/?utm_source=Lokmat.com&utm_medium=InfiniteArticle-Desktop


वरील लेखाचा हिंदी अनुवाद प्रसिद्ध @

https://kendriyamanavadhikar.in/727/fbclid=IwAR07SHVzpxnAG1pcphZUj69sXHLLTBb5Lp44xMkeSBCIyvmzdkEJvhs0tTQ

अभिषेक नार्वेकर का स्वछता मे सहरानीय कार्य

पिछले साल ने कोरोना वायरस के संक्रमण से एक महीने पहले आखिरी जंगली अंबोली को देखा था। उस समय, कई जगहों पर जो कचरा दिखाई देता था, उससे मैं बहुत दुखी था। हालांकि, वन्यजीव शोधकर्ता रोहन कोरगांवकर, प्रत्येक प्रकृति की पगडंडी में जंगल के रास्तों पर पड़ा कचरा इकट्ठा कर रहे थे। इस वर्ष भी, कोरोना की दूसरी लहर महाराष्ट्र में सक्रिय होने से पहले मार्च के अंतिम सप्ताह में अंबोली गई थी। फिर भी, नेचर ट्रेल में जंगल के रास्तों पर पड़े कचरे को इकट्ठा करने का काम जारी रहा। इस बीच, यह पता चला कि स्वच्छता का ‘अभिषेक’ ‘अंबोली’ में शुरू हो गया है। कुछ गलत हो गया। उन्होंने यह भी कहा कि हमें स्वच्छता के इस अभिषेक में शामिल होना चाहिए। लेकिन जब तक हम अंबोली गए, तब तक हम बैग से बाहर निकल चुके थे। स्वच्छता के इस अभिषेक से, हमने देखा कि अकेले महादेवगढ़ प्वाइंट क्षेत्र से एक या दो नहीं बल्कि दो सौ से अधिक बैग कचरा इकट्ठा किया गया था। हमने अंबोली में शुरू होने वाली स्वच्छता के इस ‘अभिषेक’ को समझा। इस तरह का जानबूझकर किया गया काम जो कुछ अच्छा करना चाहता है उसे समाज का मजबूत समर्थन मिलना चाहिए।

10-12 साल पहले तक, अभिषेक नार्वेकर, एक युवा (मो. 09423213153) अन्य शोधकर्ताओं के साथ काम कर रहे थे, जो अन्य पर्यावरणविदों की तरह अनुसंधान के लिए अम्बोली आते हैं। इन सभी कार्यों में से, अंबोली ने अनुसंधान स्तर पर एक लंबा सफर तय किया है। लेकिन the संरक्षण ’का विषय पीछे छूट गया। कचरे का मुद्दा अभिषेक को परेशान कर रहा था। इसी प्रकार, मालाबार नेचर कंज़र्वेशन क्लब द्वारा अम्बोली को साफ़ करने के प्रयास किए गए। फिर से इसकी आवश्यकता को महसूस करते हुए, अभिषेक ने एक दिन, clean अंबोली में मुख्य सड़क पर पुलिस स्टेशन से महादेवगढ़ प्वाइंट के अंत तक और सड़क के दोनों ओर घाटी में सफाई करने का फैसला किया ’। उन्होंने C PROJECT CLEAN AMBOLI ’पेज पर सोशल मीडिया पर अपनी भूमिका की घोषणा की। समुदाय से प्रतिक्रिया शुरू हुई। अभिषेक ने अपने सहयोगियों चेतन नार्वेकर, राकेश देउलकर, सुजन ओगल और कौमुदी नार्वेकर की मदद से कचरे को एकत्र किया। इसके लिए, उन्होंने 25 किलो की क्षमता वाले खाली सीमेंट बैग का इस्तेमाल किया। मार्च के अंतिम सप्ताह तक टीम ने दो सौ से अधिक बैग पैक कर लिए थे। इस थैले में कचरे का औसत भार 5 किग्रा माना गया, कुल अपशिष्ट डेढ़ सौ किग्रा था। अभियान में तीन सप्ताह हो चुके थे जब हम अंबोली में थे। आज 45-50 दिन है। अभिषेक तीन हफ्तों तक कचरा इकट्ठा करने के बाद भी प्रशासन तक नहीं पहुंचा क्योंकि वह स्थानीय सोशल मीडिया पर बहुत सक्रिय नहीं था। अभिषेक ने कचरा इकट्ठा करने के पहले दिन चार बैग इकट्ठा किए थे। उसने आज सुबह या शाम के लिए समय निर्धारित किया था। उसी दिन, उन्होंने 16 बैग कचरा एकत्र किया।

महादेवगढ़ प्वाइंट इलाके में काफी कचरा था। गहरी घाटी में बहुत सारा कचरा हवा में उड़ गया था। अभिषेक द्वारा एकत्र किए गए कुल कचरे में से, 95 प्रतिशत घाटी में जंगल के ढलानों पर पाया गया, सिवाय मुट्ठी भर सड़क के किनारे। पर्वतारोहण का कोर्स पूरा करने वाले अभिषेक, पिछले कई वर्षों से घाटी में फंसे मलबे को बाहर निकालने वाले पहले व्यक्ति हैं। घाटी से ज़मीन की ओर देखने पर, सफाई के लिए गया एक व्यक्ति पत्तियों के नीचे छिपा हुआ ढेर सारा कचरा देखता है। हालाँकि, यह कचरा घाटी में नीचे जमीन से दिखाई नहीं देता है। बहुत सारी प्लास्टिक की पानी की बोतलें, शराब की बोतलें, वेफरस्टाइप कुरकुरे बैग हैं। अम्बोली जैसे संरक्षित जंगलों में, कचरे को साफ करना प्रशासन की जिम्मेदारी है। लेकिन panel सूचना पैनल ’से परे इसे कितनी सावधानी से जांचा जाता है? क्या आपको पता है। वैसे भी! इसलिए यह उतना आसान नहीं था जितना कि घाटी से कूड़े को जमीन पर लाना और वापस महादेवगढ़ प्वाइंट पर पार्किंग स्थल तक लाना प्रतीत होता है। जिन लोगों ने अंबोली और महादेवगढ़ के अंक देखे हैं, उन्हें कम से कम कड़ी मेहनत पर ध्यान देना चाहिए। यहां तक ​​कि अगर परिश्रमी पर्यटक, पर्यटक स्थल में कहीं भी कचरा फेंकते हैं, तो वन क्षेत्र में विषम परिस्थितियों से बचें, उन्हें देश की सेवा के लिए ’शायद’ पुरस्कृत किया जा सकता है। यदि यह सारा कचरा तुरंत स्थानीय प्रणाली को सौंप दिया जाता है, तो कोई भी अम्बोली में कचरे की समस्या पर ध्यान नहीं देगा। इसलिए इसे महादेवगढ़ बिंदु पर संग्रहीत किया गया था। अम्बोली के अन्य स्थानों को भी भविष्य में साफ करने की आवश्यकता है। कचरा रखने के लिए महादेवगढ़ बिंदु पर पर्याप्त जगह थी। कहीं और, यह कहना मुश्किल है। अंबोली में कचरे के लिए डंपिंग यार्ड की आवश्यकता होती है। अभिषेक को लगता है कि स्थानीय प्रशासन को इस पर ध्यान देने की आवश्यकता है। अभिषेक ने इस काम के लिए किसी को नहीं बुलाया। बस अपील की गई। कुछ सहयोगियों को पता था कि इसके महत्व और आवश्यकता को इसके साथ जोड़ा गया था। राकेश और सुजान दोनों अंबोली-चाकुल सड़क पर नियमित सफाई का काम कर रहे हैं। जो लोग सोशल मीडिया पर संदेश देते हैं कि हर सुबह उठना और अलविदा कहना अभिषेक के साथ कचरा इकट्ठा करने के लिए सुबह उठना उनकी नैतिक जिम्मेदारी नहीं है।

वर्तमान में, अंबोली में महादेवगढ़ प्वाइंट स्वच्छता की सांस ले रहा है। यह जल्द ही ‘प्लास्टिक फ्री जोन’ बन जाएगा। जंगल में कचरा वापस लाने के लिए पर्यटकों को दो साल तक कड़ी मेहनत करनी होगी। लेकिन यह सिलसिला चलता रहे? या हमें इसके खिलाफ सख्त कदम उठाने चाहिए? यह स्थानीय प्रशासन को तय करना है। … अन्यथा अभिषेक जैसे युवा अपना काम करते रहेंगे। लेकिन पर्यटक और गाँव के समग्र सुधार के लिए ज़िम्मेदार ‘कंधों’ का इस तरह के स्वच्छता अभियान के साथ क्या होगा? यह भी देखना महत्वपूर्ण है। पिछले दस वर्षों से, अभिषेक पुणे में एक ट्रैवल कंपनी के माध्यम से देश भर में साहसिक और वन्यजीव यात्राओं की योजना बना रहा है। यह इस काम से था कि वह अक्सर ट्रेक्स हिमालय के दौरान पहाड़ों में अपशिष्ट सफाई के साथ प्रयोग करते थे। उस समय, वह बहुत जागरूक था कि हमने अंबोली में ऐसा कुछ नहीं किया था। एडवेंचर टूरिज्म के साथ-साथ वाइल्ड लाइफ, माइक्रो-फ्लोरा और जीव-जंतुओं का अध्ययन करने वाले अभिषेक ने 2012 में एक ही साल में 150 से अधिक किलों की ट्रैकिंग की। 2015 में, उन्होंने मनाली से लेह और श्रीनगर तक अपना पहला एकल साइकिल अभियान अभियान पूरा किया। 2017 में, उन्होंने देश के नौ तटीय राज्यों में 72 दिनों में 6780 किमी साइकिल चलाई। इंडियन बुक ऑफ रिकॉर्ड ने स्वीकार किया कि यह पहली भारतीय साइकिलिंग थी। कोरोना संक्रमण के साथ अभिषेक पिछले साल अंबोली लौट आया। अम्बोली में पिछले कई वर्षों से मानसून पर्यटन, वन्यजीव पर्यटन आदि जैसे प्रयोग शुरू किए गए हैं। अभिषेक, जो अंबोली में उसी काम को शुरू करने की कोशिश कर रहा था, ने यहाँ कचरा देखा। क्या आप अपने साथ यात्रा करने वाले साहसिक और पर्यावरण के अनुकूल पर्यटकों को इस कचरे को दिखाना चाहते हैं? इसे ध्यान में रखते हुए, सफाई का काम बाहर खड़ा था। अभिषेक से यह जानकर हमें बहुत खुशी हुई कि वह 12 महीने तक ‘डेस्टिनेशन अम्बोली’ में काम करेगा। क्योंकि पिछले साल हम और वन्यजीव शोधकर्ता रोहन कोरगांवकर इसी विषय पर सोच रहे थे। वन्यजीव शोधकर्ता मल्हार इंडुलकर, स्नेक मित्र अनिकेत चोपड़े, प्रकृति प्रेमी विलास महादिक समूह के साथ थे। अभिषेक उसी अवधारणा को अधिक विस्तृत और ठोस रूप में सुनते रहे। अंबोली, कोंकण में, अभिषेक भी पर्यटकों को शांत हवा के स्थान पर आकर्षित करने के प्रयास में मौजूद होगा।

अभिषेक को उन सभाओं के बारे में बताया गया है जो एकत्र किए गए कचरे से प्लास्टिक और कांच की बोतलें और गिलास ले सकते हैं। इसमें से 60 फीसदी से ज्यादा बेकार है। बाकी कचरा प्लास्टिक कचरा है। अभिषेक और सहकर्मी वर्तमान में इसके लिए व्यवस्था करने और भविष्य की सफाई के लिए योजना बनाने में शामिल हैं। हम वास्तव में उनके वास्तविक सेवा उन्मुख प्रयासों की सराहना करते हैं। कोरोना की दूसरी लहर में, हम, कृत्रिम ऑक्सीजन के लिए भटक रहे समाज को सरकार द्वारा पर्यावरण के अनुकूल प्रयासों को ‘पागल’ के रूप में देखने के बजाय विशेष सहयोग दिखाना चाहिए। हम आपसे समय-समय पर एक कदम आगे बढ़ने की उम्मीद करते हैं। 

सिंधुदुर्ग प्रतिनिधी - धीरज वाटेकर 

सम्पर्कसूत्र - 9860360948

शुक्रवार, १६ एप्रिल, २०२१

‘आंबोली’ला हवीय, जंगल’गस्त’ !





कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या महाराष्ट्रातील दुसऱ्या लाटेच्या उद्रेकापूर्वी मार्चच्या शेवटच्या आठवड्यात ‘आंबोली’ला पोहोचलो. सर्वाधिक पावसाचे ठिकाण असलेले आंबोली हे कोकणातील थंड हवेचे ठिकाण. जागतिक हवामान दिवसानंतर आलेला हा आठवडा उष्णतेची लाट घेऊन आलेला. २/३ दिवसांच्या या भेटीत आजूबाजूला उष्ण लहरींचे प्रमाण वाढलेले असताना आंबोलीच्या निसर्गाची विविध रूपे अनुभवता आली. भटकलेल्या एका जंगल नेचर ट्रेलच्या मार्गावर पट्टेरी वाघाने गव्याची शिकार केल्याचे उघड झाले. गेल्यावर्षीही कोरोना लॉकडाऊन काळात दोडामार्ग-तळकट-खडपडे-कुंभवडे-चौकुळ-आंबोली मार्गावर हिंस्र जंगली प्राण्याने गव्याची शिकार केल्याचे आढळले होते. दरम्यान मागील आठवड्यातही सह्याद्रीतील एका संवर्धन राखीव वनक्षेत्रात पट्टेरी वाघ शिकारीसह कॅमेरा ट्रॅपमध्ये टिपला गेला आहे. आंबोलीसह संपूर्ण सह्याद्रीच्या जंगलात पट्टेरी वाघाचे अस्तित्व असल्याचे पुरावे गेली काही वर्षे मिळत आहेत. अलिकडे तिलारी पाठोपाठ आंबोली ते दोडामार्ग पट्ट्याला संवर्धन राखीव क्षेत्र दर्जा मिळाला आहे. या आणि अशा संवर्धन राखीव क्षेत्र दर्जा असलेल्या जंगलांना मिळालेले हे संरक्षण तातडीने प्रत्यक्ष जमिनीवर दिसायला हवे आहे. यासाठी ‘आंबोली’ला नियमित देखरेख आणि जंगल’गस्त’ हवी आहे.

महाराष्ट्रातल्या जंगलात आणि डोंगरपट्ट्यात कोरोना लॉकडाऊन काळात मोठ्या प्रमाणात प्राण्यांच्या शिकारीच्या घटनांची चर्चा सुरु झाल्यावर वनविभागाने शिकार्‍यांना पकडण्यासाठी रात्रीची गस्त आणि देखरेख वाढविली होती. मुंबईच्या आसपास असलेल्या जंगलावर ड्रोनच्या साहाय्याने गस्त घालण्याचे नियोजन केले होते. जंगल संवर्धन आणि वन कर्मचाऱ्यांची सुविधा यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा काळानुरूप वापर आवश्यक आहे. ‘संरक्षित वन आणि पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील जंगल क्षेत्र याचे संवर्धन झाले पाहिजे. तेथे प्राण्यांचे मुक्त वास्तव्य राहिले पाहिजे. प्राण्यांची शिकार सहन केली जाणार नाही.’ अशी भूमिका वनखात्याकडून मांडली जात असतानाही वन्यजीवांच्या हत्या आणि तस्करीचे गुन्हे घडतात. जंगलगस्तीसाठी स्थानिक मजुरांची उपलब्धी महत्त्वाची आहे. जंगलगस्त घालताना अवैध वृक्षतोड लक्षात येते. वनतस्करांना जंगलात अवैध वृक्षतोड करताना रंगेहाथ पकडताना घनदाट जंगल आणि रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन आरोपी पसार होत असतात. कधीकधी रात्री-अपरात्री जंगल हद्दीत बेकायदा तस्करी किंवा शिकार करणाऱ्या टोळीला अडवण्याचा प्रयत्न केल्यास गस्त घालणाऱ्या वनरक्षकांवर, मजुरांवर हल्ले होतात. मूळात रात्रीच्या अंधारात गस्त घालणाऱ्या कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्याची प्रवृत्ती आपल्याकडे बळावली कशी ? याचा विचार व्हायला हवा. नियमित जंगलगस्त घालण्याने हल्ल्याला आळा बसू शकतो. अशा जोखमीच्या कामात योगदान देणाऱ्या, रोजंदारीवर काम करणार्‍या किनवट जंगल क्षेत्रातील पाच मजुरांना जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात वनपरिक्षेत्र कार्यालयासमोर उपोषणाचा मार्ग पत्करावा लागला होता. पर्यावरणाचा समतोल साधण्यासोबत लाकूडचोरी, वन जमिनीवरील अतिक्रमणे, वणव्यांमुळे जंगल संपत्तीचे होणारे नुकसान टाळण्यासाठी जंगलगस्तीचा उपयोग आंबोलीत करून घेणे आवश्यक आहे.

महाराष्ट्रात पाचेक वर्षांपूर्वी जंगलामधील पदभ्रमंतीला (ट्रेकिंग) प्रोत्साहन, गावकऱ्यांना रोजगार, वनक्षेत्रात नियमित गस्त, अवैध वृक्षतोड, अवैध चराई आणि वन्य प्राण्यांची तस्करी रोखण्यासाठी पुणे आणि कोल्हापूर वन विभागाने गिर्यारोहक आणि निसर्गप्रेमींची मदत घेण्याचा निर्णय घेतला होता. जंगलातील गैरप्रकार शोधून काढत त्याला आळा घालण्यासाठी निसर्गप्रेमींचा पुढाकार असतो. जंगलातील भटकंती दरम्यान ही मंडळी सतर्क असल्याने वनाधिकाऱ्यांना सतत वन्यजीवांशी निगडीत घडामोडी कळत असतात. असे प्रयत्न आंबोलीत अधिक सक्रीय करता येतील. कोकणातील डोंगररांगांनी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाची एक बाजू व्यापलेली आहे. या भागात काही ठिकाणी परंपरागत शिकारी करणाऱ्या समूहाचे वास्तव्य आहे. तसेच येथे बेकायदा वृक्षतोड करणाऱ्या टोळ्याही सक्रीय आहेत. दऱ्याखोऱ्यांमध्ये वसलेल्या या वनक्षेत्रात आणि सह्याद्रीतील कोकणात उतरणाऱ्या मार्गांवर वन्यप्राण्यांच्या शिकारी होत असल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत असतात. तस्करांपासून जंगल आणि वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी वनक्षेत्रात निसर्गप्रेमी, अभ्यासक आणि गिर्यारोहकांचा वावर वाढल्यास चोरांवर नियंत्रण आणता येईल. मजूर आणि वनरक्षकांसोबत जंगलातील भटकंती दरम्यान खूप काही नव्याने शिकायला मिळेल. निसर्गाचे आकर्षण वाढेल. जंगलाचे व्यवस्थापन कळण्यास मदत होईल.

आंबोली-दोडामार्ग कॉन्झर्वेशन रिझर्व्ह या ५६९२ हेक्टर जंगलक्षेत्रात पट्टेरी नर वाघाचे अस्तित्व स्पष्ट झाले आहे. कॉन्झर्वेशन रिझर्व्ह कायद्यांतर्गत लोकांच्या सहभागातून, त्यांचे अधिकार कायम राखून वन्यक्षेत्राचे संवर्धन करणे अभिप्रेत आहे. अभयारण्य किंवा राष्ट्रीय उद्यान संवर्धनाचे कडक पाहाता संवर्धन राखीवमध्ये स्थानिकांना सोबत घेणे सोयीचे होते. पूर्वी पश्चिम घाट अभ्यासासाठी नियुक्त डॉ. माधव गाडगीळ समितीनेही हे क्षेत्र पर्यावरण संवेदनशील क्षेत्र निश्चित करण्याची शिफारस केलेली होती. आंबोली ते दोडामार्ग पट्टा व्याघ्र कॉरिडॉरसंरक्षित व्हावा म्हणून वनशक्तीसंस्थेने न्यायालयात प्रयत्न केले होते. या जंगलात गेल्या मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पट्टेरी वाघाने मारलेल्या गव्याचे कुजलेले शरीर आढळून आले होते. वाघाच्या पावलांच्या ठशावरून हा पूर्ण वाढीचा नर वाघ असल्याची शक्यता वन विभागाने वर्तवली होती. फेब्रुवारी २०१८ मध्येही वसमंदिर-आंबोली-चौकुळ भागात स्थानिकांना पट्टेरी वाघाचे दर्शन झालेले होते. या घटनेच्या तीन वर्ष अगोदर आंबोलीत पट्टेरी वाघ दिसला होता. नोव्हेंबर २०१९ मध्ये शेवटच्या आठवड्यात आंबोलीला लागून असलेल्या कोल्हापूर हद्दीत वाघाचे दर्शन झाले होते. गेल्यावर्षी (२०२०) जून महिन्यात आंबोली जंगलात वाघाने एका दुभत्या म्हशीची शिकार आणि दोन म्हशींना तोंडावर पंजा मारून जखमी केल्याचे समोर आले होते. पावसामुळे शिकारी प्राण्याच्या कोणत्याही खुणा शिल्लक न राहिल्याने वन विभागाने वाघाने शिकार केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला नव्हता. स्थानिकांना मात्र वाघाच्या वावराच्या खुणा आढळल्या होत्या. या भागात एकदा जंगल मार्गावर स्क्रेप (रस्त्यावरती मार्किंग करिता केलेली उकरण) आढळून आली होती. नुकतेच एका संवर्धन राखीव वनक्षेत्रात पट्टेरी वाघाने गाईला गळा फोडून ठार मारल्याचे काही धनगर बांधवांनी पाहिले होते. घटनास्थळी इतर कोणतेही पुरावे आढळून आलेले नसले तरी भक्ष्य ओढून नेण्याची आणि खाण्याची पद्धत ही पट्टेरी वाघाच्या सवयीशी जुळते आहे. दरम्यान या ठिकाणी वन विभागाने लावलेल्या कॅमेरा ट्रॅपमध्ये नर वाघाचे दर्शन घडले आहे. शेतकऱ्यांना अशा हल्याच्या घटनांनंतर नुकसान भरपाई देण्याच्या दृष्टीने अशा घटनांची नोंद होणे आवश्यक आहे.

आंबोली-दोडामार्ग हे जंगलक्षेत्र सह्याद्री व्याघ्र प्रकल्पासाठी अतिशय महत्वाचे आहे. गोव्यातील म्हादई आणि कर्नाटकातील भीमगड अभयारण्य क्षेत्र याला जोडलेले असल्याने वन्यजीवांच्या आणि वाघांच्या भ्रमणमार्ग आणि प्रजननाकरिता हा सलग पट्टा उपयुक्त आहे. भविष्यात वन्यजीवांच्या हालचाली आंबोली, दोडामार्ग, तिलारी, चंदगड, आजरा, राधानगरी, चांदोलीपर्यंत आढळू शकतात. वाघ आणि इतर मोठ्या सस्तन प्राण्यांसाठी कॉरीडोर कनेक्टिव्हिटी (भ्रमणमार्गाची जोडणी) महत्त्वपूर्ण असते. हा भ्रमणमार्ग अखंड ठेवल्याने प्रजनन क्षेत्रातील वाघ हे त्या क्षेत्राला जोडणाऱ्या इतर जंगलात आणि संरक्षित वन क्षेत्रात स्वत:चा स्वतंत्र अधिवास निर्माण करु शकतात. राधानगरीपासून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील चांदोली अभयारण्यापर्यंतचे अंतर पूर्ण करणे वाघांसाठी सहजसाध्य आहे. या भागात मोठ्या प्रमाणात मानवी वसाहत आहे. येथे सततची देखरेख आणि गस्त आवश्यक आहे. आंबोली जंगल परिसराचा पट्टा नर वाघाच्या भ्रमंतीचा परिसर असल्याचे वाघांवर संशोधन करणारे वन्यजीव संशोधक गिरीश पंजाबी यांनी यापूर्वीच शासनाच्या निदर्शनास आणले आहे. त्यांनी २०१४-१५ साली वनविभागाच्या मदतीने तिलारी परिसरात कॅमेरा ट्रॅपलावले होते. पहिल्यांदा तेव्हा या जंगलपट्ट्यात तीन वाघांची नोंद झाली होती. तसेच सह्याद्री निसर्ग मित्र आणि बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने राबविलेल्या ‘ई-मॅमल’ प्रकल्पांतर्गत आंबोली-तिलारी पट्यात कॅमेरा ट्रॅपमध्ये पट्टेरी वाघाचे छायाचित्र कैद झाले होते. सिंधुदुर्ग जिल्हा मानद वन्यजीव रक्षक काका भिसे, वन्यजीव अभ्यासक रोहन कोरगावकर यांनाही आंबोली जंगलात वाघाच्या पावलांचे ठसे, विष्ठा आढळली होती.

सह्याद्रीत संरक्षित नसलेल्या वनक्षेत्रात गेली अनेक दशके वृक्षतोड सुरू आहे. यामुळे जैवविविधतेतील घटकांचा संपूर्ण अधिवास नष्ट होत आहे. तरीही आंबोली ‘शिस्टुरा हिरण्यकेशी’ मासा, टॅरॅन्टुलाची (कोळी) ‘थ्रिगमोपीयस इग्निसिस’ प्रजाती आदी प्रदेशनिष्ठ जैवविविधता जोपासून आहे. २०१३ साली दिवाळीत आंबोली भ्रमंती करताना आम्हाला मोठ्या केसाळ कोळ्याची हॅप्लॉक्लास्ट्स (Haploclastus) प्रजाती पाहायला मिळालेली होती. आपल्या जवळचे मध्यप्रदेश राज्य आज ‘टायगर स्टेट ऑफ इंडिया’ म्हणून ओळखले जाते. तेथे वन्यजीवांचे संरक्षण, त्यांच्या अधिवासाचे व्यवस्थापन, लोकसहभाग, मानव वन्यजीव संघर्ष व्यवस्थापन उत्तम आहे. आपल्याकडे यासाठी अधिकाऱ्यांनी कडक उपाययोजना अंमलात आणल्या पाहिजेत. सह्याद्रीत स्थानिकांना मध्यभागी ठेवून वनक्षेत्र संरक्षण आणि संवर्धनाच्या संकल्पना झोकून देऊन राबवायला हव्या आहेत. वाघाचे जंगल हे आपल्या भूमीचे वैभव आहे. ते जपायला हवे. इथल्या झाडांचे, प्राण्यांचे, पक्ष्यांचे, संवर्धन व्हायला हवे. अशी जंगले आपल्या भूमीची फुफ्फुसे असतात. ती आपल्याला शुद्ध हवा देतात. सह्याद्रीत वनक्षेत्राचा प्रदेश कमी आहे. असलेले वनक्षेत्र लहान तुकड्यांमध्ये विभागलेले असल्याने ते राखण्याची जबाबदारी अधिक आहे. आंबोलीला सध्या रेंजर असलेले दिगंबर जाधव फिल्डवर सक्रीय असलेले अधिकारी आहेत. त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी जंगल गस्त वाढविल्याचे म्हटले आहे.

आंबोली परिसरातील जंगल भागात मागील काही वर्षांपासून जाणवणारे पट्टेरी वाघाचे अस्तित्व जंगलप्रेमींना सुखावणारे आहे. आंबोलीसारख्या कोणत्याही जंगलात जंगलाचा श्वास असलेल्या वाघाची (रॉयल बेंगॉल टायगर) निर्मिती आपल्याला शक्य नाही. म्हणून त्याच्या अधिवासांचे संवर्धन आणि संरक्षण आवश्यक आहे. यासाठी पट्टेरी वाघाचे अस्तित्व आढळून आलेल्या आंबोली जंगलात नियमित कडक ‘देखरेख आणि गस्त’ घातली जायला हवी आहे. आपल्या दुर्लक्षामुळे वाघ भरकटला, इतरत्र गेला किंवा गायब झाला तर कोणाला जबाबदार धरायचे ? सह्याद्रीत शिकारीचे धोके आहेत. अशा शिकारींच्या समोर वाघ आला तर काय होईल ? यासाठी आंबोली सारख्या जंगलांना मिळालेले संरक्षण तातडीने जमिनीवर दिसायला हवे आहे. यंत्रणा अधिक सक्षमतेने कार्यरत व्हायला हवी आहे. गार्ड्सकडे वायरलेस कनेक्टीव्हिटी असायला हवी आहे. हे काम राज्यात नव्याने संरक्षित झालेल्या सगळ्या जंगलक्षेत्रात आणि विशेषत: वाघाची सक्रीयता असलेल्या आंबोलीच्या जंगलात व्हायला हवे आहे.

धीरज वाटेकर

dheerajwatekar@gmail.com


आंबोली जंगलात सप्टेंबर २०१९ मध्ये 
आढळलेला वाघाच्या पायाचा ठसा

मार्च २०२० मध्ये आंबोली जंगलात 
गव्याची शिकार केलेल्या वाघाच्या पावलाचे ठसे

मार्च २०२० मध्ये महिन्यात आंबोली जंगलात 
वाघाने केलेली गव्याची शिकार 

मार्च २०२० मध्ये महिन्यात आंबोली जंगलात 
वाघाने केलेली गव्याची शिकार 

मार्च २०२० मध्ये महिन्यात आंबोली जंगलात 
वाघाने केलेली गव्याची शिकार 

मार्च २०२० मध्ये महिन्यात आंबोली जंगलात 
वाघाने केलेली गव्याची शिकार 

शुक्रवार, १९ मार्च, २०२१

कोकण पर्यटन विकासावर भरीव आर्थिक तरतूद हवी !

जागतिक महिला दिनी महाराष्ट्र सरकारने रु. ५,०६, २३६ कोटींचा अर्थसंकल्प मांडला गेल्यावर, 'कोकणच्या पदरात काय पडले ?' याची स्वाभाविक चर्चा सुरू झाली. 'समर्थन' संस्थेने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, दरडोई उत्पन्नात देशात गोवा, ५ लाख २० हजार ३१ रुपयांसह अग्रेसर आहे. महाराष्ट्र राज्य २ लाख २ हजार १३० रुपयांसह दहाव्या क्रमांकावर आहे. आपल्या शेजारच्या गोवा राज्याची अर्थव्यवस्था पर्यटनावर अवलंबून आहे. त्यामुळे निसर्गरम्य कोकणच्या शाश्वत पर्यटनावर भरीव आर्थिक तरतूद केल्यास त्यातून राज्याच्या आणि कोकणच्या प्रगतीचा महामार्ग निर्माण करता येणे शक्य आहे. याचा विचार कोकणातले लोकप्रतिनिधी आणि त्यांना निवडून देणाऱ्या आपण सर्व मतदारांनी करायला हवा.

कोकणच्या स्वतंत्र वैधानिक विकास महामंडळाचा प्रश्न गेली तीसहून अधिक वर्षे चर्चेत आहे. यापूर्वी १३ मार्च १९८९ रोजी विधीमंडळाच्या दोनही सभागृहांनी कोकणसाठी स्वतंत्र वैधानिक विकास महामंडळ असावे, असा ठराव मंजूर केला होता. आजही प्रलंबित असलेला हा प्रश्न म्हणजे, 'कोकणावरील अन्यायाचा संतापजनक इतिहास आहे' अशी लिखित नोंद यापूर्वी माजी आमदार आणि विचारवंत स्व. नानासाहेब जोशी यांनी केली होती. राज्याचा प्रादेशिक असमतोल शोधण्यासाठी अर्थशास्त्रज्ञ डॉ. वि. म. दांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली सत्यशोधन समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने १९८४ साली आपला अहवाल सादर केला होता. या समितीने कोकणचा अनुशेष मान्य केला होता. आजचा विचार करता विकासाच्या बदललेल्या संकल्पना, संदर्भ, महागाई, पावसाळा विचारात घेता इथे कामाला मिळणारा वेळ पाहाता हा अनुशेष हजारो कोटी होईल. तीसेक वर्षांपूर्वी कोकणला स्वतंत्र महामंडळ न देता उर्वरित संबोधून आर्थिक आणि राजकीय दृष्ट्या सबळ असलेल्या पश्चिम महाराष्ट्राशी जोडले गेले, जे आजही कायम आहे. कोकणातील मानवी विकासाचा संदर्भ देऊन कोकणला सातत्याने महामंडळ  नाकारले गेले आहे. हे वैधानिक विकास महामंडळ अस्तित्वात आले तर कोकणसाठी काही शे कोटींची तरतूद दरवर्षी करता येईल आणि तिचा उपयोग पर्यटनादी कामांसाठी होऊ शकेल. कोकणच्या अनुशेषाकडे प्रमाणिकपणे पहिल्यास आणि तशा तरतुदी अर्थसंकल्पात झाल्यास पुढच्या दहाएक वर्षात कोकण संपन्न होईल.

 एकूण अर्थसंकल्पात पूरक मागण्यांचे प्रमाण १०% पेक्षा जास्त असू नये असा अर्थसंकल्पीय दंडक असताना वर्षभरातल्या पूरक मागण्या मूळ अर्थसंकल्पाच्या तुलनेत १७.८८% इतक्या करण्यात आल्या आहेत. आपल्या बजेटच्या एकूण उत्पन्नापैकी पगार, पेन्शन, व्याज आणि मुद्दल फेड यावर ६३% खर्च होतो. विकासाला मिळतात, केवळ ३७ टक्के ! यंदा कोरोनाने उत्पन्न घटले आहे. त्यामुळे किती लोकसंख्येसाठी किती टक्के खर्च हा विचार करायला हवा.

कोकणचा विचार करता रायगड, सिंधुदुर्गला मेडिकल कॉलेज मिळाले आहे. सिंधुरत्न योजना, रायगड जिल्ह्यातील जांभूळपाडा येथे कातकरी एकात्मिक वसाहत प्रकल्प, रत्नागिरी येथे भगवती बंदर क्रुज टर्मिनल, बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मारकासाठी निधी मिळणार आहे. प्रेरणा देणारी अशी किती स्मारकं कोकणात होऊ शकतात याचा अभ्यास करण्यासाठी एकदा तरी चिपळूणच्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराने उभारलेला 'कलादालन' प्रकल्प पाहायला हवा. कोकणाला स्वतंत्र मत्स्य विद्यापीठ हवे ही मागणी जुनी आहे आणि ते नसणे ही शोकांतिका आहे. सावंतवाडीतील हस्तकला, पालघरमधील वारली कला यांवर खर्च करून स्वयंरोगाजर वाढविण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. याचे मूल्यमापन आवश्यक आहे. कोकणात निसर्ग पर्यटन योजना, महाड येथे निसर्ग आपत्ती  निवारणासाठी विशेष यंत्रणा शासन उभारणार आहे. मुंबई गोवा महामार्गाचे चौपदरीकरण झाल्यावर अशी यंत्रणा आणखी काही ठिकाणी उभारावी लागेल. ठाणे पालघर मधील बोईसर, दहिसर नद्यांचे संवर्धन करण्याचा मुद्दा अर्थसंकल्पात आहे. चिपळूणच्या वाशिष्ठी नदीत क्रोकोडाईल टुरिझम वाढावे, पर्यटन नकाशावर चिपळूणला डेस्टिनेशनचा दर्जा मिळावा  म्हणून गेली आठेक वर्षे ग्लोबल चिपळूण टुरिझम ही संस्था आपल्या खिशातील पैसे खर्च करते आहे. अशा प्रयत्नांकडे संबंधित यंत्रणांकडून ममत्व भावनेने पाहिले जायला हवे.

जव्हार गिरीस्थान विकास, संत स्मारके आणि धार्मिक तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी शासनाने निधी दिला आहे. प्राचीन मंदिरे यांच्या जतन आणि संवर्धन अंतर्गत यात कोकणातल्या धूतपापेश्वरचा स्वागतार्ह समावेश झाला आहे. एकूण ८ मंदिरांसाठी शासनाने १०१ कोटींची तरतूद केली आहे. कोकणातील आडवाटेवरच्या अनेक मंदिराकडे पाहायला हवे. कोकण पर्यटन म्हणून गावोगावी दरवर्षी विविध जल्लोष, फेस्टिव्हल होत असतात. त्याचे एका मंचावर नियोजन करून त्याच्या प्रचार आणि प्रसिद्धीसाठी शासनाने सलग काही वर्षांसाठी आर्थिक तरतूद करायला हवी. रेवस ते रेड्डी ह्या ५४० किमीचा सागरी महामार्गासाठी निधी मंजूर झाला आहे. गेल्या अनेक दशकांपासून ग्रामीण कोकण जोडले जाईल या भावनेने हे काम सुरू आहे. देशातील इतर किनारवर्ति  राज्यांनी हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी जो उत्साह दाखविला तो महाराष्ट्रात दिसला नाही. म्हणून सध्याच्या निधीचे स्वागत करायला हवे.

समृद्धी महामार्गांच्या दुतर्फा हवाई बीज पेरणी करण्याचे शासनाने ठरविले असल्याचे वाचनात आले. हा विषय राज्यातील सर्व जंगलात व्हायला हवा. वृक्षारोपण हे जंगलात व्हायला हवे. तसेच जंगलतोडीला परवानगी मिळू नये. हापूस आंबा, मच्छिमार, सिंचन, पायाभूत सुविधा आदी सर्व क्षेत्रात सातत्याने कोकण प्रदेशावर अन्याय केला जात आहे. या पार्श्वभूमीवर ताज्या अर्थसंकल्पात मांडलेले कोकण विकासाचे विषय कसे अंमलात येतात, हे पाहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.

 

धीरज वाटेकर

मो. ९८६०३६०९४८ 











वरील कार्यक्रमाची फेसबुक लाईव्ह लिंक :

https://www.facebook.com/1419427465034610/videos/524578555597420

रविवार, २८ फेब्रुवारी, २०२१

सांस्कृतिक राजधानीतील सुसंस्कृत नेतृत्व

 

क्षमता, गुणवत्ता आणि आकाराने ‘सह्याद्रि’ सारख्या विशाल शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष आणि कोकणची सांस्कृतिक राजधानी ‘चिपळूण’सह संगमेश्वरचे आमदार शेखर निकम (सर) यांचा आज वाढदिवस आहे.शिक्षण, सहकार आणि राजकारणाच्या माध्यमातून जनविकासाच्या कामात कार्यरत राहिलेल्या खा. गोविंदराव निकम साहेबांच्या पाऊलांवर पाऊल ठेवून चालताना काळानुरूप बदल स्वीकारीत शेखर सरांनी ‘पर्यटन आणि पर्यावरण’सारख्या विषयाकडे लक्ष देण्याचा प्रयत्न केला आहे. समाजकारणातून द्वेषविरहित राजकारण साधताना समाजातील सर्वस्तरीयलोकांना प्रामाणिक सहकार्य केल्याचे आमदार होण्यापूर्वी त्यांनी प्रसिद्ध केलेल्या ‘पालखी विकासाची’ मधील समाजपयोगी कामांच्या यादीवरून लक्षात येते.अचूक वेळेत मदत करणाऱ्या, जनसामान्यांच्या मनात आपल्या दैनंदिन स्वाभाविक वर्तवणुकीतून ‘आपला माणूस’ अशी प्रतिमा तयार करण्यात यशस्वी ठरलेल्या आणि ती जपण्यासाठी मेहनत घेणाऱ्या शेखर सरांच्या कारकीर्दीचा आजच्या त्यांच्या ५६ व्या अभिष्टचिंतनदिनी घेतलेला हा आढावा.

स्व. आई अनुराधा आणि स्व. वडील गोविंदराव या दाम्पत्याच्या पोटी १ मार्च १९६६ रोजी जन्मलेल्या शेखर सरांचं आजचं शांत, संयत, मनमिळावू, अभ्यासू आणि जनतेच्या अपेक्षांना भिडणारं व्यक्तिमत्त्व संपूर्ण रत्नागिरी जिल्हावासियांना भावतं आहे. जनतेसाठी सदैव उपलब्ध राहण्याची सवय आणि कला, क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रातल्या अभ्यासू वावरातून त्यांनी मागील दहा-पंधरा वर्षांच्या काळात जिल्ह्याच्या राजकारणात वेगाने आपले स्थान पक्के केले आहे. ते कार्याध्यक्ष म्हणून सह्याद्रि शिक्षण संस्थेचा ३३ माध्यमिक विद्यालये, १८ व्यावसायिक महाविद्यालये, ५ कनिष्ठ महाविद्यालये, ४ इंग्रजी माध्यमाच्या शाळा, २ प्राथमिक शाळा असा भव्यदिव्य डोलारा सांभाळत आहेत. सह्याद्रि ही आज महाराष्ट्रातील अग्रगण्य शिक्षण संस्था म्हणून ओळखली जाते. तिचे कामकाज पाहण्यासाठी असंख्य मान्यवर सावर्डेत येत असतात. मागील ६५ वर्षांच्या या संस्थेचा, जणू मैलाचा दगड ठरावा असा अलीकडचा विस्तार साकारण्यात सरांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे.

चिपळूण संगमेश्वर मतदार संघ आकाराने मोठा आहे. तरीही आमदार म्हणून शेखर सर चिपळूण तालुक्यासह संगमेश्वरातील देवरुख-मार्लेश्वर पर्यंतच्या विशाल मतदारसंघात सर्वांना सहज उपलब्ध होत असतात. त्यांना भेटायला येणाऱ्यांचे प्रश्न व्यक्तिगत असोत, विकासाचे असोत किंवा शोषित-पिडीत वर्गाच्या हेळसांडीचे असोत अशा सर्वच प्रश्नांची प्रामाणिक उकल करण्याकडे त्यांचा कायम भर असतो. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम करताना त्यांनी चिपळूण–संगमेश्वर मतदारसंघाकडेही विशेषत्वाने लक्ष देत आपली ताकद वाढविली होती. तरीही २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत ते थोड्या मताने पराभूत झाले. मात्रते निराश होऊन घरी बसले नाहीत. पाहिल्यासारख्याच जोमाने मतदासंघात वावरत राहिले. त्यांनी लोकसंपर्क वाढविला. लोकांच्या अपेक्षांना भिडण्याचा प्रयत्न केला. प्रसंगी पदरचे पैसे खर्च करून लोकविकासाची प्रलंबित कामे केली. यात विहीर बांधकाम, पाईप लाईन जोडणी, बौद्ध विहार, विंधनविहीर आणि पंप, पाण्याच्या तळ्यांचे बांधकाम, वीज कनेक्शन जोडणी, सभागृह बांधकाम आणि लादीकाम, प्लास्टरकाम, पिकअप शेड बांधकाम, मोऱ्या, पाखाडी, गणपती विसर्जन घाट, संरक्षक भिंत, मंदिर वॉल कंपाऊंड, स्टील मटेरियल पुरवठा, पेव्हर ब्लॉक, सौरउर्जा, मंदिर, ग्रील्स, अंतर्गत रस्ते दुरुस्ती, खडीकरण आदींसह अनेक ठिकाणी ग्रामदेवता मंदिरांच्या उभारणी व दुरुस्तीसाठी सहकार्य आदींचा समावेश आहे. कापशी नदीवर बंधाऱ्यांचे जाळे, स्वखर्चातून १७५ विंधन विहिरी त्यांनी बांधून दिल्या. यातून त्यांची ‘जलदूत’ अशी ओळख निर्माण झाली. पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून त्या पाण्याचा शेतीसाठी वापर करण्याचा यशस्वी प्रयोग सरांनी राबविला. निवडून येण्यापूर्वीपासून त्यांनी शेती, फलोत्पादन, फळप्रक्रिया, पशूपालन आदी शेती आणि शेतीपूरक क्षेत्रातील अनेक कामांचा धडाका सुरु ठेवल्याने त्यांच्याकडे ‘भावी आमदार’ म्हणून बघायला सुरुवात झालेली होती. आमदार नसताना शेखर सरांनी केलेल्या कामांमुळे आज जनतेच्या त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत. यामुळेच मतदार संघासाठी ते करीत असलेल्या विकासाच्या प्रयत्नांचे रुपांतर जनतेच्या अपेक्षांच्या बदलांमध्ये होणे आवश्यक आहे. निवडून आल्यानंतर सरांनी आपल्या मतदारांना, ‘आपला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी मी अविरत प्रयत्न करत राहीन’ अशी दिलेली खात्री त्यांच्या दैनंदिन कार्यप्रणालीतून निश्चित जाणवते आहे.

मागील वर्षीच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेखर सरांनी कोकण विकासाशी निगडीत जवळपास सारे मुद्दे मांडले होते, भविष्यात त्यांचा पाठपुरावा करावा लागणार आहे. आपल्या या भाषणात बोलताना त्यांनी, ‘शासनाच्या दुर्लक्षामुळे कोकणात पर्यटन विकास होत नाही’ असे म्हटले होते.कोकणात नद्यांना पूर येतात. यावर उपाय म्हणून रोहा आणि कराड प्रमाणे नद्यांना दोन्ही बाजूंनी भिंती घालून संरक्षण करण्याची मागणी केली होती. कोकणातल्या छोट्या छोट्या खोऱ्यात पाझर तलाव व्हावेत. ‘सिरीज ऑफ बंधारा’ ह्या संकल्पनेची कोकणात आवश्यकता असल्याचे शेखर सरांनी आपल्याला आलेल्या अनुभवाच्या आधारे विधिमंडळात आवर्जून सांगितले होते. रस्त्यांच्या कामासाठी निधी मिळाला नसल्याबाबत त्यांनी जाहीर मत व्यक्त केलं होतं.  खाजगी पडीक क्षेत्राचे वातावरण नैसर्गिक आहे. अशा जमिनींवर साग, बांबू, खैर अशी लागवड होण्यासाठी विशेष योजना हवी असा मुद्दाही मांडला होता. प्रक्रिया उद्योगाचे काम कोकणात होत नाही. यासाठी शासनाची भाग भांडवलाची स्कीम आहे. पण मागच्या ५ वर्षात त्याचे प्रस्ताव मंजूर झाले नसल्याचे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले होते. त्यांनी यावेळी कोकण पर्यटन विकास महामंडळ, छोट्या मच्छिमारांच्या समस्या, कोकणात समुद्रकिनाऱ्यावरील हॉटेल्सच्या अंतराचा मुद्दा, कोकण कृषी विद्यापीठात पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी १९९० पूर्वीपासून असलेली जागांची ६ ही संख्या वाढावी, मत्स्य विद्यापीठाची आवश्यकता, एल.ई.डी. मासेमारी बंद करावी, शासकीय ग्रामीण रुग्णालयांची अवस्था, रिक्त असलेली पदे, रुग्णालयांची चालू असलेली बांधकामे, काजू बागायतदारांच्या समस्यांसंदर्भात केसरकर समितीचा अहवाल अमलात आणावा, खैराच्या लागवडीची शेतीत गणना व्हावी, रेवस ते रेड्डी सागरी महामार्ग आदी मुद्दे मांडल्यावर कोकणातले लोक ‘आत्महत्या’ करत नाहीत म्हणून याकडे लक्ष द्यायचे नाही असे न करता याकडे गांभिर्याने पाहावे अशीही भूमिका मांडली होती.

समस्यांचा विचार करता, चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघडोंगरी भागात वसलेला आहे. आजही इथे दीर्घकाळ प्रलंबित प्रश्न, पायाभूत सुविधा, पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे. चौपदरीकरणाचे काम सुरु झाल्यापासून मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करताना सर्वाधिक खराब रस्ता म्हणून कायम खेड ते संगमेश्वरकडे पाहिले गेलेले आहे. या स्थितीत बदल होतो आहे, तो अधिक वेगाने व्हायला हवा आहे. अलीकडचे देवरूख ते संगमेश्वर मार्गाचे झालेले डांबरीकरण अनेकांना सुखावणारे ठरले आहे. मागचं संपूर्ण वर्ष कोरोना संक्रमणाने व्यापलं होतं. अजूनही त्यातून आपली मुक्तता झालेली नाही. अशा स्थितीत शेखर सरांची संवेदनशीलता अनेकवेळा पाहायला मिळाली. प्रसंगी विरोध पत्करून, ‘कृपा करून गावी येण्यासाठी काहीतरी मार्ग काढावा. आम्ही १४ दिवस क्वारंटाईन राहू’ या चाकरमान्यांच्या आवाहनाला दाद देत त्यांनी मुख्यमंत्र्यांशी पत्रव्यवहार केला होता.

विदेशी वृक्षप्रजाती ही शासनाच्या वृक्षलागवड कार्यक्रमातून वगळायला हवी अशी पर्यावरणप्रेमींची गेल्या कित्येक वर्षांची मागणी होती. तिला शासनस्तरावर वाचा फोडण्याचे काम शेखर सरांनी केले. सामाजिक वनीकरण खाते अस्तित्वात आल्यापासून महाराष्ट्रभर विदेशी वृक्ष प्रजातींची शासकीय कार्यक्रमातून लागवड झाली आहे. विदेशी वृक्ष प्रजातींच्या लागवडीचे पर्यावरण, जीवसृष्टीवर गंभीर परिणाम दिसू लागलेत. या विदेशी प्रजातींशी जीवसृष्टी एकरूप होत नाही. यातील काही प्रजाती मोठ्या प्रमाणात जमिनीतील पाणी शोषून घेतात. अशा जैवविविधता धोक्यात आणणाऱ्या विदेशी वृक्षांना शासकीय वृक्षारोपण कार्यक्रमातून तसेच निर्मितीतून वगळावे. देशी वृक्षांच्या प्रजातींना जाणीवपूर्वक प्रशासनाने प्राधान्य द्यावे. असा धोरणात्मक बदल शासनाकडून व्हावा, अशी विनंती शेखर सरांनी सप्टेंबर २०२० मध्ये शासनाला केली होती. त्याबाबतचा अहवाल शासनाला सादर करण्याबाबतच्या सूचनाही महसूल आणि वन विभागाच्या कार्यासन अधिकाऱ्यांनी नोव्हेंबर २०२० मध्ये प्रधान मुख्य वन संरक्षकांना दिल्या होत्या. कोकणात वणव्याची समस्याही मोठी आहे. चिपळूणातल्या पर्यावरणप्रेमींनी यावर काम करायला सुरुवात करताच शेखर सरांनी वणवा मुक्तगावांच्या विकासासाठी जादा निधी देण्याचे जाहीर केले.

मागच्या महिन्यात, किल्ले प्रचितगडच्या जीवघेण्या शिडीच्या दुरावस्थेतेबाबत शेखर सरांनी तातडीने दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत दाखविलेल्या तत्परतेची तमाम शिवप्रेमी नक्की दखल घेतील. आपल्याकडे किल्ल्यांसंदर्भात अनेकविध प्रश्नकायम आहेत. मागच्या शिवजयंतीला गोवळकोट बंदरावर मातीत उलट्या गाडलेल्या ४ तोफा गडावर नेण्याचे काम राजे प्रतिष्ठानच्या मावळ्यांनी अनेकांच्या सहकार्याने पूर्ण केले. जिथे जिथे शिव छत्रपतींच्या इतिहासाची साक्ष देणारे किल्ले व इतर ऐतिहासिक वास्तू आहेत त्या त्या ठिकाणी आजच्या पिढीतले राजांचे मावळे संवर्धन कामासाठी कार्यरत आहेत. स्वच्छता आणि संवर्धनाचे काम हे मावळे मनापासून, कोणत्याही अपेक्षेशिवाय आणि स्वयंस्फूर्तीने करत असतात. शासकीय पातळीवरील स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायती, पंचायत समित्या, जिल्हा परिषदा आदींनी त्यात्या ठिकाणी वर्षातून एखाद-दुसऱ्या वेळेला किमान एकत्र करून या कष्टाळू मावळ्यांसोबत चहा-पान घेण्याची, त्यांच्याशी संवाद साधण्याची, त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारण्याची पद्धत सुरु करण्याची आवश्यकता आहे. अशा प्रकारची पद्धत सुरु झाल्यास गडकिल्ल्यांच्या स्वच्छता कामाला अधिक उत्साह येईल. याद्वारे चर्चा घडून आपोआप संवर्धन कामाला गती प्राप्त होईल.

आपल्या भागाचा विकासकरणे हे लोकप्रतिनिधींचे पहिले काम आहे आणि शेखरसर यासाठी आटोकाट प्रयत्न करताना दिसत आहेत.तरीही कालौघात आपल्या कामाचा ठसा उमटावा अशी भरीव कामेही त्यांच्याकडून व्हावीत, अशी प्रामाणिक अपेक्षा आहे.सकारात्मक राजकीय भूमिका आणि विकासकामांना प्राधान्य या कार्यपद्धतीद्वारे सरांना मतदारसंघात मोठे काम उभे करणे शक्य आहे. कोकणात आणि शेखर सरांच्या मतदारसंघात पुष्कळ देवराया आहे. अपवाद वगळता या देवरायांची आजची स्थिती भयावह आहे. ‘विज्ञानवादी’ युगात मंदिरांच्या निर्मितीसाठी किंवा इतर कारणांन्वये अनेक पुरातन देवराया मुळापासून तोडल्या गेल्या आहेत. यातल्या काही देवराया प्रातिनिधिक स्तरावर म्हणून पारंपरिक देशी वृक्षांच्या माध्यमातून पुन्हा वनसमृद्ध आणि पर्यावरणपूरक होण्यासाठी प्रयत्न व्हायला हवे आहेत. अशा विषयात काम करणाऱ्यांची कोकणात कमी नाही. त्यांना पाठबळ आवश्यक आहे. सांस्कृतिक राजधानीचे शहर असलेल्या चिपळूणच्या नाव लौकिकाला साजेसे उपक्रम होण्यासाठीही सर योगदान देत असतात. शहरातल्या सर्वात जुन्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या विविध उपक्रमांना त्यांचे सहकार्य असते. वाचनालयाने पनवेल ते पणजी दरम्यानचे सर्वोत्तम वस्तूसंग्रहालय आणि कलादालन प्रकल्प उभारले आहेत. तालुकाभर आजही पुरातन भग्नावशेष इतरत्र विखुरलेले पाहायला मिळतात. हे अवशेष संग्रहालयात एकत्रित यायला हवे आहेत.

चिपळूण शहर आणि तालुक्याच्या पर्यटन विकासासाठी ‘ग्लोबल चिपळूण टुरिझम’ संस्था धडपडते आहे. चिपळूणला डेस्टीनेशन बनविण्याचे काम हे सर्वांचे आहे. ही संस्था अनेक वर्षे पर्यटन महोत्सव भरवते आहे. याला भरीव शासकीय किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांचे आर्थिक पाठबळ मिळायला हवे आहे. चिपळूण हे कोकणातील महत्वाचे मध्यवर्ती केंद्र आहे. चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील नैसर्गिक सौंदर्य, ऐतिहासिक, धार्मिक स्थळे, धबधबे आदी पर्यटनदृष्ट्या विकसित होण्यासाठी शेखर सरांनी ‘The Happening Kokan’ नावाचा माहितीपट बनवला होता. महामार्ग चौपदरीकरणानंतर मध्यवर्ती ठिकाण म्हणून चिपळूणचे महत्त्व सर्वाधिक वाढणार आहे. कोकणात पर्यटनाच्या व्यवसायाचा विचार करता येथे अत्याधुनिक संपर्क यंत्रणा असलेलं ‘पर्यटन माहिती केंद्र’ तयार होणं आवश्यक आहे. चिपळूण तालुक्यात गेल्या पंचवीसेक वर्षांत रोजगारसमृद्धी साधणारा एकही मोठा प्रकल्प आलेला नाही. इथल्या हातांना काम देण्याची क्षमता असलेला ‘पर्यटन’ हाच एकमेव व्यवसाय आहे. त्याच्या विस्तारासाठी पायाभूत सुविधा, प्रत्यक्ष पर्यटनस्थळी विविध सोयी उभ्या व्हायला हव्यात. कोयना अवजलाच्या बळावर बारमाही वाहणाऱ्या चिपळूणच्या वाशिष्ठी नदीच्या किनारवर्ती भागात पर्यटनाचा अनोखा आधुनिक प्रकल्प आकाराला येऊ शकतो. महामार्गावरचे शहर असल्याने त्याला प्रतिसादही चांगला मिळू शकतो. कोकण ही परशुराम भूमी म्हणून ओळखली जाते. इथल्या महेंद्रगिरी पर्वतात भगवान परशुरामांचा भव्य पुतळा उभारल्यास ते कोकण पर्यटनाचे प्रमुख आकर्षण ठरू शकते. पूर्वी इथल्या पर्यटनप्रेमींनी परशुराम ते गोवळकोट असा रोपवे व्हावा म्हणून सर्व्हे केला होता. त्याला गती मिळायला हवी आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील या मध्यवर्ती शहरात छोटेखानी थिएटर आवश्यक आहे. अखिल भारतीय तालुकास्तरीय पहिले दैनिक वृत्तपत्र सुरु करणाऱ्या चिपळूणच्या भूमीत आजही माध्यमाच्या प्रतिनिधींसाठी एकत्रित बसायला जागा उपलब्ध नाही. समुद्रअभाव असलेल्या चिपळूण शहरातल्या नागरिकांना सायंकाळच्या वेळेस मनोरंजनासाठी घराबाहेर पडल्यावर कोठे जावे ? असा प्रश्न पडतो. इथल्या साने गुरुजी उद्यानाचे नूतनीकरण सध्या अंतिम टप्प्यात आहे. पण ते एकच उद्यान चिपळूणच्या लोकसंख्येला पुरेसे नाही. या शहराची आजची स्थिती ‘इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र’च्या अवस्थेवरून सहज लक्षात यावी.

जनसामान्यांच्या मनातील दैनंदिन विकासाचे प्रश्न मार्गी लावत असताना काळाच्या कसोटीवर टिकून राहण्याची क्षमता असलेले विषय शेखर सरांकडून मार्गी लागावेत, अशी अपेक्षा आहे. शेखर सरांना महाराष्ट्र शासनाचा ‘वनश्री’, सानेगुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाचा भालचंद्र पुरस्कार, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक असोसिएशनचा पुरस्कार, दापोली कृषी विद्यापीठाचा ‘आबासाहेब कुबल’ पुरस्कार आदी पूर्वीच प्राप्त झाले आहेत. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या, वास्तवाचे भान ठेवत कार्यरत राहणाऱ्या सरांना मतदारसंघात ‘ऑफबीट’ काम करणे अवघड नाही. कोकणातील खाड्यांतून जलवाहतुकीच्या भन्नाट कल्पना त्यांच्याही डोक्यात कायम घोळत असतात. आजच्या वाढदिवसाला दोन दिवस बाकी असताना सरांनी आपल्या मतदारांशी सोशल मिडीयावरून ‘दोन शब्द मनातले’ म्हणत संवाद साधला. त्यात त्यांनी कोरोना महामारी आणि आजपासून (१ मार्च) सुरु होणाऱ्या विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कारण देत जाहीर सार्वजनिक वाढदिवस कार्यक्रम टाळण्याबाबत निवेदन प्रसिद्ध केले, हे महत्त्वाचे आहे.

सुसंवादी शेखर सरांचा मूळ पिंड राजकीय नाही. त्यांची कार्यपद्धतीही राजकीय दिसत नाही. शेखर सरांच्या जगण्यात वायफळ बडबड किंवा उघड संताप भावना आढळून येत नाही, ही कोकणच्या सांस्कृतिक राजधानीचे नेतृत्व करण्यासाठी महत्वाची गोष्ट आहे. स्वभावात, बोलण्यात कधीही त्रस्तता येऊ न देता व्यस्त राहाणं ही सरांची खासियतआहे. आपल्या याच स्वभावाने त्यांनी विरोधकांनाही आपलसं केलं आहे. त्यांची आजवरची ही ऊर्जादायी वाटचाल राजकारणात यशस्वी होऊ पाहणाऱ्या तरुणाईसाठी मार्गदर्शक आहे. सरांना त्यांच्या जीवनात पत्नी सौ. पूजाताई निकम यांची मिळालेली मोलाची साथ विशेषत्वाने नोंद घ्यावी अशीच आहे. ते कार्यरत असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, खा. सुप्रिया सुळे यांचा कौटुंबिक आपुलकीचा प्रेमळ वरदहस्त सरांना लाभलेला आहे. त्याचा उपयोग कोकणच्या भल्यासाठी व्हावा. कोकणच्या सांस्कृतिक राजधानीच्या इतिहासात भरीव नोंद करता यावी असे अजोड काम शेखर सरांकडून घडो. त्यासाठी आई तुळजाभवानीने त्यांच्या हाताला यश द्यावे, अशी आजच्या शुभदिनी प्रार्थना करतो आणि शेखर सरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो.

धीरज वाटेकर

ई-मेल : dheerajwatekar@gmail.com

आस्थेवाईक गुरुजींची सेवानिवृत्ती

        एकविसाव्या शतकाच्या प्रारंभीची घटना. चिपळूण जवळच्या एका तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सकाळी साडेदहा वाजता भरणाऱ्या शाळेत जाण्यासाठी ...