शनिवार, १७ एप्रिल, २०२१

आंबोलीत सुरु आहे स्वच्छतेचा 'अभिषेक'

    गेल्यावर्षी कोरोना विषाणूच्या संक्रमणापूर्वी महिनाभर अगोदर शेवटची जंगलमय आंबोली पाहिली होती. तेव्हा अनेक ठिकाणी नजरेला खटकलेल्या कचऱ्याने तीव्र दु:खही झालेलं. सोबत असलेले वन्यजीव अभ्यासक रोहन कोरगावकर मात्र प्रत्येक नेचरट्रेलमध्ये जंगलवाटांवर पडलेला कचरा गोळा करत होते. यंदाही कोरोनाची दुसरी लाट महाराष्ट्रात सक्रीय होण्यापूर्वी मार्चच्या शेवटच्या आठवड्यात आंबोलीला गेलेलो. तेव्हाही नेचरट्रेलमध्ये जंगलवाटांवर पडलेला कचरा गोळा करण्याचे काम चालू राहिले. दरम्यान ‘आंबोली’त स्वच्छतेचा ‘अभिषेक’ सुरु असल्याची माहिती मिळाली. काहीसं सुखावायला झालं. स्वच्छतेच्या या अभिषेकात आपणही सामील व्हावं असं बोलूनही दाखवलं. पण आम्ही आंबोलीत असताना नेमक्या कचरा भरण्यासाठी लागणाऱ्या पिशव्या संपलेल्या होत्या. स्वच्छतेच्या या अभिषेकातून एक-दोन नव्हे तर तब्बल अडीचशे पिशव्यांतून साडेबाराशे किलोहून अधिक कचरा केवळ महादेवगड पॉईंट परिसरातून गोळा झाल्याचे आम्ही पाहिले. आम्ही आंबोलीत सुरु असलेला हा स्वच्छतेचा 'अभिषेक' समजून घेतला. चांगलं काहीतरी घडवू पाहणाऱ्या अशा सत्प्रवृत्त कामांना समाजाची खंबीर साथ मिळायला हवी, या हेतूने केलेलं हे विवेचन !

१०-१२ वर्षांपूर्वीपर्यंत अभिषेक नार्वेकर हा तरुण (मो. ०९४२३२१३१५३) इतर पर्यावरण प्रेमींप्रमाणे आंबोलीत संशोधनासाठी येणाऱ्या संशोधकांसोबत काम करत होता. अशा साऱ्या कामातून संशोधन पातळीवर ‘आंबोली’ खूप पुढे गेली. पण ‘संवर्धन’ विषय मागे पडला. यातला कचरा हा विषय अभिषेकला खटकत होता. तसे आंबोलीच्या स्वच्छतेचे प्रयत्न यापूर्वी ‘मलबार नेचर कॉन्झर्वेशन क्लब’ने केलेले होते. पुन्हा त्याची गरज असल्याचे लक्षात आल्याने अभिषेकने एके दिवशी ठरवलं, ‘आंबोलीतील मुख्य रस्त्यावर असलेल्या पोलीस चौकीपासून महादेवगड पॉईंटच्या शेवटपर्यंत आणि रस्त्याच्या दुतर्फा दरीत पडलेलाही सारा कचरा स्वच्छ करायचा’. त्याने आपली ही भूमिका सोशल मिडीयावर, ‘PROJECT CLEAN AMBOLI’ पेजवर जाहीर केली. समाजाचा प्रतिसाद मिळू लागला. अभिषेकने आपले सहकारी चेतन नार्वेकर, राकेश देऊलकर, सुजन ओगले आणि कौमुदी नार्वेकर यांच्या सहकार्याने हा कचरा गोळा केला. यासाठी त्यांनी २५ किलो क्षमतेच्या सिमेंटच्या रिकाम्या पिशव्या उपयोगात आणल्या. या टीमने मार्चच्या शेवटच्या आठवडयापर्यंत अडीचशेहून अधिक पिशव्या भरल्या होत्या. या पिशव्यातील कचरा सरासरी ५ किलो वजनाचा गृहित धरला तरी संपूर्ण कचरा साडेबाराशे किलो होत होता. आम्ही आंबोलीत होतो तेव्हा या अभियानाला तीनेक आठवडे झाले होते. आज ४५-५० दिवस होत आलेत. इथले स्थानिक सोशल मिडीयावर फारसे सक्रीय नसल्याने अभिषेकने तीनेक आठवडे कचरा गोळा केल्यावरही प्रशासनापर्यंत याची माहिती पोहोचली नव्हती. कचरा गोळा करायला सुरुवात केल्याच्या पहिल्या दिवशी अभिषेकने चार बॅग कचरा गोळा केला होता. यासाठीची वेळ त्याने सकाळ किंवा संध्याकाळची ठरवली होती. अशाच एके दिवशी त्याने तब्बल १६ बॅग कचरा गोळा केला.

महादेवगड पॉईंट परिसरात खूप कचरा होता. बराच कचरा वाऱ्याने उडून खोल दरीत गेला होता. अभिषेकने गोळा केलेल्या एकूण कचऱ्यापैकी रस्त्याशेजारी पडलेला मोजका कचरा वगळता ९५ टक्के कचरा हा जंगलात उताराच्या बाजूंवर दरीत मिळालेला आहे. माउंटनेरिंगचा कोर्स पूर्ण केलेल्या अभिषेकने गेल्या अनेक वर्षांपासून दरीत गेलेला, अडकून राहिलेला कचरा पहिल्यांदा दरीबाहेर आणला. दरीतून वरती जमिनीकडे पाहिले असता स्वच्छतेसाठी गेलेल्या व्यक्तीला बराच कचरा पानांखाली लपलेला दिसतो. मात्र हा कचरा जमिनीवरून दरीत खोलवर पाहिले असता दिसत नाही. यात पाण्याच्या प्लास्टिक बाटल्या, मद्याच्या बाटल्या, वेफर्सटाईप कुरकुऱ्यांची पाकीटे पुष्कळ आहेत. आंबोलीसारख्या संरक्षित जंगलात कचरा स्वच्छतेची जबाबदारी प्रशासनाची  आहे. पण ती ‘माहितीचे फलक’ लावण्यापलिकडे किती काळजीपूर्वक तपासली जाते ? काय माहित. असो ! तर दरीतला हा कचरा जमिनीवर आणून पुन्हा महादेवगड पॉईंटच्या पार्किंगपर्यंत नेणे वाटते तितके सोपे नव्हते. ज्यांनी आंबोली आणि महादेवगड पॉईंट पाहिला आहे, त्यांना यातले किमान परिश्रम लक्षात यावेत. परिश्रम लक्षात आलेल्या पर्यटकांनी पर्यटनस्थळी कुठेही, कसाही कचरा फेकताना हे काम जरी लक्षात घेऊन जंगल क्षेत्रातील अस्वच्छता टाळली तरी त्यांना ‘कदाचित’ देशसेवा केल्याचं पुण्य पदरात पाडून घेता येईल. हा सारा कचरा तातडीने स्थानिक व्यवस्थेला देऊ केला तर आंबोलीतील कचऱ्याच्या समस्येकडे कोणाचे लक्ष जाणार नाही. म्हणून त्याला महादेवगड पॉईंटवर साठविण्यात आले. भविष्यात आंबोलीतील इतर ठिकाणीही स्वच्छतेचं काम करायचे आहे. महादेवगड पॉईंटवर कचरा ठेवायला पुरेसी जागा उपलब्ध होती. इतर ठिकाणी ती नाही ही अडचणही आहे. आंबोलीत कचऱ्यासाठी डम्पिंग यार्डची आवश्यकता आहे. स्थानिक प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे, असे अभिषेकला वाटते. अभिषेकने या कामासाठी कोणालाही आग्रहपूर्वक बोलावले नाही. फक्त आवाहन केले. याचं महत्त्व आणि आवश्यकता माहित असलेले मोजके सहकारी त्याच्यासोबत जोडले गेले. यातले राकेश आणि सुजन हे दोघे स्वच्छतेचे काम आंबोली-चौकुळ मार्गावर नियमित करत असतात. सोशल मिडीयावर रोज सकाळी उठून शुभेच्छा देणे ही आपली नैतिक जबाबदारी असल्यासारखे मेसेज करणारे पहाटे उठून अभिषेकसोबत कचरा गोळा करायला पोहोचले नाहीत.

सध्या आंबोलीतील महादेवगड पॉईंट स्वच्छतेचा श्वास घेत आहे. लवकरच तो ‘प्लास्टिक फ्री झोन’ बनेल. या जंगलात आतवर पुन्हा कचरा जायला ‘कुठेही कचरा फेको’ टाईप पर्यटकांना अजून दोनेक वर्ष मेहनत घ्यावी लागेल. पण हे चक्र असचं चालू ठेवू द्यायचं ? की यावर कडक उपाययोजना करायच्या ? हे स्थानिक प्रशासनाने ठरवायचं आहे. ...अन्यथा अभिषेकसारखे तरुण आपलं काम करत राहतील. मात्र अशा स्वच्छता अभियानातून पर्यटक आणि गावाच्या संपूर्ण सुधारणेची जबाबदारी वाहणारे ‘खांदे’ नक्की काय करणार ? हेही पाहाणं महत्वाचं आहे. गेली दहाएक वर्षे अभिषेक पुण्यात एका ट्रॅव्हल कंपनीच्या माध्यमातून देशभरात साहसी आणि वन्यजीव क्षेत्रातील अभ्यासपूर्ण सहलींचे नियोजन करू करत होता. याच कामातून त्याने अनेकदा ‘ट्रेक्स हिमालया’दरम्यान तेथील पर्वतांमध्ये कचरा स्वच्छतेचे प्रयोग केले. त्यावेळी आपण आपल्या, ‘आंबोलीत असे काहीही केलेले नाही’ याची त्याला प्रकर्षाने जाणीव व्हायची. साहसी पर्यटनासह वन्यजीव, सूक्ष्म वनस्पती आणि जीवजंतूचा अभ्यास असलेल्या अभिषेकने २०१२ मध्ये एकाच वर्षात १५० हून अधिक फोर्ट ट्रेक केलेत. २०१५ मध्ये त्याने मनाली ते लेह आणि श्रीनगर पर्यंतची उंच डोंगरावरील सर्वात पहिली एकल सायकलिंग मोहीम पूर्ण केली. २०१७ मध्ये त्याने देशातील नऊ किनारावर्ती राज्यातून ७२ दिवसात ६७८० किलोमीटर सायकलिंग करून केले. ‘इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड्स’ने असे हे पहिले भारतीय सायकलिंग असल्याचे मान्य केले होते. असा हा अभिषेक गेल्यावर्षी कोरोना संक्रमणात आंबोलीत परतला. गेली अनेक वर्षे मान्सून टुरिझम, वाईल्डलाईफ टुरिझम आदी प्रयोग आंबोलीत सुरु आहेत. हेच काम आंबोलीत सुरु करण्याच्या प्रयत्नात असलेल्या अभिषेकच्या नजरेला इथला कचरा खटकू लागला. आपल्या सोबत फिरणाऱ्या साहसी आणि पर्यावरणप्रेमी पर्यटकांना आपण हाच कचरा दाखवायचा का ? या विचारातून स्वच्छतेचं हे काम उभं राहिलं. गप्पांच्या ओघात बोलता बोलता अभिषेक ‘बारा महिने, डेस्टिनेशन आंबोली’ यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्याच्याकडून समजल्यावर आम्हाला खूप आनंद झाला. कारण गेले वर्षभर नेमक्या याच विषयावर आम्ही आणि वन्यजीव अभ्यासक रोहन कोरगावकर विचार करत होतो. वन्यजीव अभ्यासक मल्हार इंदुलकर, सर्पमित्र अनिकेत चोपडे, निसर्गप्रेमी विलास महाडिक ही मंडळी सोबत होती. तीच संकल्पना अधिक विस्तृत आणि खात्रीशीर स्वरुपात अभिषेक ऐकवत राहिला. कोकणातल्या आंबोलीत, थंड हवेच्या ठिकाणी पर्यटक बारमाही वावरावा यासाठीच्या प्रयत्नात आता अभिषेकही असणार आहे.

जमलेल्या कचऱ्यातील प्लास्टिक आणि काचेच्या बाटल्या, काचा घेऊ शकणाऱ्या मंडळींची अभिषेकला माहिती मिळाली आहे. एकूणपैकी याचाच कचरा ६० टक्क्याहून अधिक आहे. उर्वरित कचरा हा प्लास्टिक वेस्ट आहे. यासाठीची व्यवस्था लावण्यात आणि भविष्यातील स्वच्छता नियोजनात सध्या अभिषेक आणि सहकारी गुंतलेत. त्यांच्या या खऱ्याखुऱ्या सेवाभावी प्रयत्नांना मनापासून शुभेच्छा द्यायला हव्यात. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कृत्रिम ऑक्सिजनसाठी वणवण भटकणाऱ्या आपण समाजाने, शासकीय यंत्रणेने अशा पर्यावरणपूरक कार्य साधणाऱ्या प्रयत्नरतांकडे ‘वेडे’ म्हणून बघण्याचे सोडून विशेष सहकार्य भावना दाखवावी. वेळोवेळी आपणहून एक पाऊल पुढे टाकावे, अशी अपेक्षा आहे.

धीरज वाटेकर

dheerajwatekar@gmail.com


ऑनलाईन लोकमत न्यूजपेपर लिंक :  https://www.lokmat.com/ratnagiri/amboli-begins-anointing-cleanliness-a703/?utm_source=Lokmat.com&utm_medium=InfiniteArticle-Desktop


वरील लेखाचा हिंदी अनुवाद प्रसिद्ध @

https://kendriyamanavadhikar.in/727/fbclid=IwAR07SHVzpxnAG1pcphZUj69sXHLLTBb5Lp44xMkeSBCIyvmzdkEJvhs0tTQ

अभिषेक नार्वेकर का स्वछता मे सहरानीय कार्य

पिछले साल ने कोरोना वायरस के संक्रमण से एक महीने पहले आखिरी जंगली अंबोली को देखा था। उस समय, कई जगहों पर जो कचरा दिखाई देता था, उससे मैं बहुत दुखी था। हालांकि, वन्यजीव शोधकर्ता रोहन कोरगांवकर, प्रत्येक प्रकृति की पगडंडी में जंगल के रास्तों पर पड़ा कचरा इकट्ठा कर रहे थे। इस वर्ष भी, कोरोना की दूसरी लहर महाराष्ट्र में सक्रिय होने से पहले मार्च के अंतिम सप्ताह में अंबोली गई थी। फिर भी, नेचर ट्रेल में जंगल के रास्तों पर पड़े कचरे को इकट्ठा करने का काम जारी रहा। इस बीच, यह पता चला कि स्वच्छता का ‘अभिषेक’ ‘अंबोली’ में शुरू हो गया है। कुछ गलत हो गया। उन्होंने यह भी कहा कि हमें स्वच्छता के इस अभिषेक में शामिल होना चाहिए। लेकिन जब तक हम अंबोली गए, तब तक हम बैग से बाहर निकल चुके थे। स्वच्छता के इस अभिषेक से, हमने देखा कि अकेले महादेवगढ़ प्वाइंट क्षेत्र से एक या दो नहीं बल्कि दो सौ से अधिक बैग कचरा इकट्ठा किया गया था। हमने अंबोली में शुरू होने वाली स्वच्छता के इस ‘अभिषेक’ को समझा। इस तरह का जानबूझकर किया गया काम जो कुछ अच्छा करना चाहता है उसे समाज का मजबूत समर्थन मिलना चाहिए।

10-12 साल पहले तक, अभिषेक नार्वेकर, एक युवा (मो. 09423213153) अन्य शोधकर्ताओं के साथ काम कर रहे थे, जो अन्य पर्यावरणविदों की तरह अनुसंधान के लिए अम्बोली आते हैं। इन सभी कार्यों में से, अंबोली ने अनुसंधान स्तर पर एक लंबा सफर तय किया है। लेकिन the संरक्षण ’का विषय पीछे छूट गया। कचरे का मुद्दा अभिषेक को परेशान कर रहा था। इसी प्रकार, मालाबार नेचर कंज़र्वेशन क्लब द्वारा अम्बोली को साफ़ करने के प्रयास किए गए। फिर से इसकी आवश्यकता को महसूस करते हुए, अभिषेक ने एक दिन, clean अंबोली में मुख्य सड़क पर पुलिस स्टेशन से महादेवगढ़ प्वाइंट के अंत तक और सड़क के दोनों ओर घाटी में सफाई करने का फैसला किया ’। उन्होंने C PROJECT CLEAN AMBOLI ’पेज पर सोशल मीडिया पर अपनी भूमिका की घोषणा की। समुदाय से प्रतिक्रिया शुरू हुई। अभिषेक ने अपने सहयोगियों चेतन नार्वेकर, राकेश देउलकर, सुजन ओगल और कौमुदी नार्वेकर की मदद से कचरे को एकत्र किया। इसके लिए, उन्होंने 25 किलो की क्षमता वाले खाली सीमेंट बैग का इस्तेमाल किया। मार्च के अंतिम सप्ताह तक टीम ने दो सौ से अधिक बैग पैक कर लिए थे। इस थैले में कचरे का औसत भार 5 किग्रा माना गया, कुल अपशिष्ट डेढ़ सौ किग्रा था। अभियान में तीन सप्ताह हो चुके थे जब हम अंबोली में थे। आज 45-50 दिन है। अभिषेक तीन हफ्तों तक कचरा इकट्ठा करने के बाद भी प्रशासन तक नहीं पहुंचा क्योंकि वह स्थानीय सोशल मीडिया पर बहुत सक्रिय नहीं था। अभिषेक ने कचरा इकट्ठा करने के पहले दिन चार बैग इकट्ठा किए थे। उसने आज सुबह या शाम के लिए समय निर्धारित किया था। उसी दिन, उन्होंने 16 बैग कचरा एकत्र किया।

महादेवगढ़ प्वाइंट इलाके में काफी कचरा था। गहरी घाटी में बहुत सारा कचरा हवा में उड़ गया था। अभिषेक द्वारा एकत्र किए गए कुल कचरे में से, 95 प्रतिशत घाटी में जंगल के ढलानों पर पाया गया, सिवाय मुट्ठी भर सड़क के किनारे। पर्वतारोहण का कोर्स पूरा करने वाले अभिषेक, पिछले कई वर्षों से घाटी में फंसे मलबे को बाहर निकालने वाले पहले व्यक्ति हैं। घाटी से ज़मीन की ओर देखने पर, सफाई के लिए गया एक व्यक्ति पत्तियों के नीचे छिपा हुआ ढेर सारा कचरा देखता है। हालाँकि, यह कचरा घाटी में नीचे जमीन से दिखाई नहीं देता है। बहुत सारी प्लास्टिक की पानी की बोतलें, शराब की बोतलें, वेफरस्टाइप कुरकुरे बैग हैं। अम्बोली जैसे संरक्षित जंगलों में, कचरे को साफ करना प्रशासन की जिम्मेदारी है। लेकिन panel सूचना पैनल ’से परे इसे कितनी सावधानी से जांचा जाता है? क्या आपको पता है। वैसे भी! इसलिए यह उतना आसान नहीं था जितना कि घाटी से कूड़े को जमीन पर लाना और वापस महादेवगढ़ प्वाइंट पर पार्किंग स्थल तक लाना प्रतीत होता है। जिन लोगों ने अंबोली और महादेवगढ़ के अंक देखे हैं, उन्हें कम से कम कड़ी मेहनत पर ध्यान देना चाहिए। यहां तक ​​कि अगर परिश्रमी पर्यटक, पर्यटक स्थल में कहीं भी कचरा फेंकते हैं, तो वन क्षेत्र में विषम परिस्थितियों से बचें, उन्हें देश की सेवा के लिए ’शायद’ पुरस्कृत किया जा सकता है। यदि यह सारा कचरा तुरंत स्थानीय प्रणाली को सौंप दिया जाता है, तो कोई भी अम्बोली में कचरे की समस्या पर ध्यान नहीं देगा। इसलिए इसे महादेवगढ़ बिंदु पर संग्रहीत किया गया था। अम्बोली के अन्य स्थानों को भी भविष्य में साफ करने की आवश्यकता है। कचरा रखने के लिए महादेवगढ़ बिंदु पर पर्याप्त जगह थी। कहीं और, यह कहना मुश्किल है। अंबोली में कचरे के लिए डंपिंग यार्ड की आवश्यकता होती है। अभिषेक को लगता है कि स्थानीय प्रशासन को इस पर ध्यान देने की आवश्यकता है। अभिषेक ने इस काम के लिए किसी को नहीं बुलाया। बस अपील की गई। कुछ सहयोगियों को पता था कि इसके महत्व और आवश्यकता को इसके साथ जोड़ा गया था। राकेश और सुजान दोनों अंबोली-चाकुल सड़क पर नियमित सफाई का काम कर रहे हैं। जो लोग सोशल मीडिया पर संदेश देते हैं कि हर सुबह उठना और अलविदा कहना अभिषेक के साथ कचरा इकट्ठा करने के लिए सुबह उठना उनकी नैतिक जिम्मेदारी नहीं है।

वर्तमान में, अंबोली में महादेवगढ़ प्वाइंट स्वच्छता की सांस ले रहा है। यह जल्द ही ‘प्लास्टिक फ्री जोन’ बन जाएगा। जंगल में कचरा वापस लाने के लिए पर्यटकों को दो साल तक कड़ी मेहनत करनी होगी। लेकिन यह सिलसिला चलता रहे? या हमें इसके खिलाफ सख्त कदम उठाने चाहिए? यह स्थानीय प्रशासन को तय करना है। … अन्यथा अभिषेक जैसे युवा अपना काम करते रहेंगे। लेकिन पर्यटक और गाँव के समग्र सुधार के लिए ज़िम्मेदार ‘कंधों’ का इस तरह के स्वच्छता अभियान के साथ क्या होगा? यह भी देखना महत्वपूर्ण है। पिछले दस वर्षों से, अभिषेक पुणे में एक ट्रैवल कंपनी के माध्यम से देश भर में साहसिक और वन्यजीव यात्राओं की योजना बना रहा है। यह इस काम से था कि वह अक्सर ट्रेक्स हिमालय के दौरान पहाड़ों में अपशिष्ट सफाई के साथ प्रयोग करते थे। उस समय, वह बहुत जागरूक था कि हमने अंबोली में ऐसा कुछ नहीं किया था। एडवेंचर टूरिज्म के साथ-साथ वाइल्ड लाइफ, माइक्रो-फ्लोरा और जीव-जंतुओं का अध्ययन करने वाले अभिषेक ने 2012 में एक ही साल में 150 से अधिक किलों की ट्रैकिंग की। 2015 में, उन्होंने मनाली से लेह और श्रीनगर तक अपना पहला एकल साइकिल अभियान अभियान पूरा किया। 2017 में, उन्होंने देश के नौ तटीय राज्यों में 72 दिनों में 6780 किमी साइकिल चलाई। इंडियन बुक ऑफ रिकॉर्ड ने स्वीकार किया कि यह पहली भारतीय साइकिलिंग थी। कोरोना संक्रमण के साथ अभिषेक पिछले साल अंबोली लौट आया। अम्बोली में पिछले कई वर्षों से मानसून पर्यटन, वन्यजीव पर्यटन आदि जैसे प्रयोग शुरू किए गए हैं। अभिषेक, जो अंबोली में उसी काम को शुरू करने की कोशिश कर रहा था, ने यहाँ कचरा देखा। क्या आप अपने साथ यात्रा करने वाले साहसिक और पर्यावरण के अनुकूल पर्यटकों को इस कचरे को दिखाना चाहते हैं? इसे ध्यान में रखते हुए, सफाई का काम बाहर खड़ा था। अभिषेक से यह जानकर हमें बहुत खुशी हुई कि वह 12 महीने तक ‘डेस्टिनेशन अम्बोली’ में काम करेगा। क्योंकि पिछले साल हम और वन्यजीव शोधकर्ता रोहन कोरगांवकर इसी विषय पर सोच रहे थे। वन्यजीव शोधकर्ता मल्हार इंडुलकर, स्नेक मित्र अनिकेत चोपड़े, प्रकृति प्रेमी विलास महादिक समूह के साथ थे। अभिषेक उसी अवधारणा को अधिक विस्तृत और ठोस रूप में सुनते रहे। अंबोली, कोंकण में, अभिषेक भी पर्यटकों को शांत हवा के स्थान पर आकर्षित करने के प्रयास में मौजूद होगा।

अभिषेक को उन सभाओं के बारे में बताया गया है जो एकत्र किए गए कचरे से प्लास्टिक और कांच की बोतलें और गिलास ले सकते हैं। इसमें से 60 फीसदी से ज्यादा बेकार है। बाकी कचरा प्लास्टिक कचरा है। अभिषेक और सहकर्मी वर्तमान में इसके लिए व्यवस्था करने और भविष्य की सफाई के लिए योजना बनाने में शामिल हैं। हम वास्तव में उनके वास्तविक सेवा उन्मुख प्रयासों की सराहना करते हैं। कोरोना की दूसरी लहर में, हम, कृत्रिम ऑक्सीजन के लिए भटक रहे समाज को सरकार द्वारा पर्यावरण के अनुकूल प्रयासों को ‘पागल’ के रूप में देखने के बजाय विशेष सहयोग दिखाना चाहिए। हम आपसे समय-समय पर एक कदम आगे बढ़ने की उम्मीद करते हैं। 

सिंधुदुर्ग प्रतिनिधी - धीरज वाटेकर 

सम्पर्कसूत्र - 9860360948

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

आस्थेवाईक गुरुजींची सेवानिवृत्ती

        एकविसाव्या शतकाच्या प्रारंभीची घटना. चिपळूण जवळच्या एका तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सकाळी साडेदहा वाजता भरणाऱ्या शाळेत जाण्यासाठी ...