सोमवार, १० डिसेंबर, २०१८

‘इंटरनॅशनल माउंटन डे’च्या निमित्ताने...



‘टायगर नेस्ट मॉनेस्ट्री’ : 

आनंददायी भूतानचा विस्मयकारक ठेवा !

      सहा-सात महिन्यांपूर्वी आमचा भूतान पर्यावरण अभ्यास दौरा निश्चित झाल्यापासून तेथील ‘टायगर नेस्ट मॉनेस्ट्री’ मनात घर करून राहिली होती. भूतानची जागतिक ओळख असलेले टायगर नेस्ट मॉनेस्ट्री (तक्तसांग मठ - Taktsang Monastery) हे पारो शहराच्या घाटीतील सर्वात पवित्र आणि अद्भुत बौद्ध ठिकाण. समुद्रसपाटीपासून ३१२० मीटर (१०२४० फूट) उंच पर्वतावर एका कड्यात अत्यंत कल्पकतेने बांधलेल्या या मॉनेस्ट्रीपर्यंत पोहोचणे सहजसाध्य नसल्याच्या जाणीवेतून मनात निर्माण झालेल्या सा-या प्रश्नांना अखेर ‘टायगर नेस्ट मॉनेस्ट्री’चा महत्वपूर्ण ट्रेक यशस्वी झाल्यावर (१५ नोव्हेंबर २०१८) उत्तरे मिळाली. आजच्या आधुनिक काळात अशा पर्वतांचं महत्त्व जपण्याची गरज लक्षात घेऊन युनोने सन २००३ पासून दरवर्षी ११ डिसेंबर हा दिवस ‘जागतिक पर्वत दिन’ घोषित केला. गिरीपर्वतांचा, निसर्गाचा आणि वन्यजीवनाचा जवळचा संबंध आहे. आपल्याकडे बर्फाळ डोंगरभागातही पूर्वापार मनुष्यवस्ती आहे. आजच्या आंतरराष्ट्रीय पर्वत दिनाच्या निमित्ताने दूर डोंगरी राहणारे लोक त्यांच्या आदिम वस्त्या, त्यांच्या परंपरा, संस्कृती याचं स्मरण करण्याचा, त्यांची स्थिती, समस्या जाणून घेण्याचा हेतू असतो. आजच्या निमित्ताने आपण टायगर नेस्ट मॉनेस्ट्रीया आनंददायी भूतानच्या विस्मयकारक ठेवा जाणून घेऊ या !

      आपला सह्याद्री आणि पूर्वेकडील हिमालयासह जगभरातील पर्वतांच आकर्षण सर्वांनाच आहे. सुमारे साडेतेवीस हजार फुटांपेक्षा अधिक उंची असलेली १०९ पर्वतशिखरं पृथ्वीवर आहेत. त्यातली बरीचशी आपल्या हिमालयातच आहेत. मानवी संस्कृतीच्या विकासात पर्वतांच्या अस्तित्वाचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. पर्वतांना मानवी, दैवी रूपातही चित्रित केलं गेलं आहे. या पर्वतांत अनेकदा पूजनीय व्यवस्थाही आपण पाहतो. जगातील छोटय़ा- छोटय़ा जमातीही प्राचीन काळापासून पर्वतांच्या आश्रयाने राहत आहेत. या लोकांची स्वतंत्र जीवनशैली, संस्कृती असते आणि ती त्यांची वेशभूषा, दागदागिने, संगीत यातून व्यक्त होत असते. पर्वतरांगांमध्ये राहणाऱ्या लोकांनी पिढय़ानपिढ्या पर्यावरणाचा समतोल जपल्याचे आपल्याला भूतानमध्ये चांगलेच जाणवते. पर्वतांच्या अस्तित्वामुळे जगात मोठय़ा, खोल नद्या निर्माण झाल्या. या नद्यांच्या काठावर विविध संस्कृतींचा विकास झाला. पर्वतांनी काळे ढग अडवून पाऊस पाडून जगभरातील विशाल नद्यांना पाणी पुरवलं आहे. आजच्या आधुनिक काळात जगातले सर्वच पर्वत पर्यटनक्षेत्रझालेत. अनेक टिकाणी पर्यटनाची शिस्त कमी-कमी होत गेली आहे. हिमालयातही प्लॅस्टिकचा कचरा ढिगाने दिसू लागला आहे. स्वच्छ पाण्याच्या नद्या, अनेक औषधी वनस्पतींची जंगलं वाढवणारे पर्वत आणि त्यावरील निसर्गतः संतुलित वन्यजीवन विकासाच्या नावाखाली आपण  बिघडवायला सुरुवात केली. पर्वतीय मार्गाची गरज लक्षात घेऊन तिथे वाहनांच्या प्रदूषणाचा त्रासही जाणवू लागला आहे. या साऱ्यांपासून काहीअंशी आजतरी टायगर नेस्ट दूर आहे. अशा स्थितीत ते पाहण्याचे भाग्य मिळाले, हे महत्वाचे !

      आज संपूर्ण जगभरात टायगर नेस्ट हे भूतानची ओळख बनले आहे. पारो शहराच्या बाहेर एका उंच डोंगरावर ताक्तसांग वसलेले आहे. पारो पासून येथे येण्यासाठी टॅक्सी ८०० ते १००० रुपये भाडे घेते. ताक्तसांग ही तिबेटी बौद्ध धर्माची एक प्रसिद्ध मॉनेस्ट्री आहे. पारो व्हॅलीत ३१२० मीटर उंच टेकडीवर ह्या मॉनेस्ट्रीपर्यंत जाणारा पदभ्रमणाचा मार्ग आव्हानात्मक आहे. शहरातील रस्त्यापासून दूरवर या मॉनेस्ट्रीकडे नजर टाकली असता तिथे पोहोचणे अशक्यच वाटते. या उंच धार्मिक स्थळावर पोहोचण्यासाठी पगडंडीनुमा मार्गे पायी चालत (ट्रेकींग) जावे लागते. पारो शहरापासून पगडंडीनुमा हे ट्रेकिंगच्या बेसचे ठिकाण १२ किमी. असून येथून ९०० मीटर खडी चढण चढावी लागते. आम्ही (धीरज वाटेकर) आमचे सहकारी पर्यावरणवादी चळवळीतील कार्यकर्ते विलास महाडिक, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ बालभारतीचे सदस्य बाळासाहेब चोपडे (पलूस-सांगली), गुरूवर्य प्राथमिक शिक्षक मार्गदर्शक पुस्तिकेचे उपसंपादक- शिक्षक तुकाराम अडसूळ (पारनेर-अहमदनगर) आणि मुक्त पत्रकार संतोष दिवे (संगमनेर-अहमदनगर) यांच्यासह दिनांक १५ नोव्हेंबर २०१८ रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ या वेळेत हा ट्रेक पूर्ण केला. या वेळेत परिसरात सरासरी ६°से. तापमान होते. हा ट्रेक करू इच्छिणाऱ्यांनी शक्य तितक्या पहाटे लवकर प्रवास सुरू करावा. पगडंडीनुमा येथे पायथ्याशी आपल्याला तिकीट काऊंटरवर प्रतिव्यक्ती ५०० रुपये देऊन तिकीट घ्यावे लागते. हे तिकीट जपून ठेऊन पुढे मॉनेस्ट्रीच्या मुख्य दरवाजावर तपासले जाऊनच प्रवेश दिला जातो. आपण जेथे आपल्या गाड्या थांबवून ट्रेकिंग सुरु करतो त्या मार्गावर सुरुवातीला पटरीबाजारआहे. येथे हस्तकौशल्यातून साकारलेल्या कोरीवकाम केलेल्या बौद्ध संस्कृती दर्शविणाऱ्या लाकडी वस्तू, छोट्या मूर्त्या, वज्राच्या प्रतिकृती मिळतात. चालायला सुरुवात करताना तेथे पन्नास रुपये (सन २०१८) भाड्याने मिळणारी काठी अवश्य घ्यावी. ट्रेकिंग दरम्यान स्वच्छता आणि शिस्त कमालीची जाणवते. पायथ्याशी खाद्यपदार्थ विकणारे लोक नाहीत. पटरीबाजारापासून थोडं पुढे गेलं की ‘इथून पुढे दुकाने लावायला परवानगी नाही’ लिहिलेला बोर्ड दिसतो. महत्वाची गोष्ट अशी की भूतानमध्ये बोर्डवरच्या सूचनांचा लोक आदर करतात.

      आकाशाशी स्पर्धा करणाऱ्या सायप्रस, पाईन वृक्षांच्या जंगलातून आमचा प्रवास सुरु झाला. थोडे पुढे गेल्यानंतर एक धबधबा आपले स्वागत करतो. तेथे झ-याच्या पाण्याच्या मदतीने गोल फिरणारे बौद्ध प्रार्थना चक्र पाहून विशेष वाटले. बौद्ध धर्मात पवित्र मानल्या जाणाऱ्या रंगीबेरंगी पताका भरपूर दिसल्या. हा संपूर्ण मार्ग कच्चा आहे काळजीपूर्वक चालणे शहाणपणाचे आहे. बऱ्याच ठिकाणहून पारो व्हॅलीचे सुंदर दृश्य दिसते. अर्धा प्रवास पूर्ण केल्यावर एक मोठे प्रार्थना चक्र दृष्टीस पडले. इथपर्यंत येण्यासाठी घोडे / खेचरे उपलब्ध असतात. प्रतिमाणसी त्यांचा दर सहाशे रुपये इतका आहे. आपल्याजवळील वेळेच्या उपलब्धीनुसार आपण याबाबतचा निर्णय घेऊ शकतो. मात्र यापुढचे दोन अत्यंत कठीण टप्पे आपल्याला आपल्याच पायाने सर करावे लागतात. उतरतानाही आपल्याला आपल्याच पायाने संपूर्ण टायगर नेस्ट मॉनेस्ट्री उतरावी लागते. काठीची गरज म्हणूनच असते. सायप्रस वृक्षांच्या दाटीवाटीतून आकाशाच्या दिशेने जाणारी वाट आपल्याला चांगलीच दमवते. अर्धे अंतर पार केल्यावर प्लॅस्टिकच्या बाटल्यांपासून बनविलेले प्रार्थनाचक्र त्याच्या रंगसंगतीमुळे लक्ष वेधून घेते. अति उंची (हाय अल्टिट्यूड), विरळ हवा, थंडी आणि खडी चढण यांचा सामना करीत लवकर दमछाक होणाऱा हा प्रवास करावा लागतो. रस्त्यात काही ठिकाणी पिण्यासाठी झ-याचे पाणी (खनिजातील शुद्ध पाणी) आहे. पहिल्या टप्प्यावर मुख्य रस्त्यापासून थोडा दूर खानपान व्यवस्था पुरविणारा एक कॅफेएरिया / रेस्टॉरंट आहे. आपण आवश्यकतेनुसार येथे आराम करू शकता. कॅफेएरिया सामन्यात: महागडा आहे. पर्यटक शक्यतो ट्रेकवरून परतताना येथे वेळ घालवितात.

      इथून पुढे आपल्या प्रवासाचा दुसरा टप्पा सुरु होतो जो आपल्याला टायगर नेस्ट ‘व्ह्यूपॉईंट’ पर्यंत नेतो. चालताना उजव्या हाताला डोंगर उतारावर झाडंच झाडं नजरेस पडत होती. त्यांच्या विविध रंगाच्या शेड्स फोटो क्लिक करायला भाग पाडत होत्या. कुणीतरी विचार करून गर्द आणि फिकट रंगाची झाडं लावली असावीत, असंही वाटलं. व्ह्यूपॉईंट वरून आपल्याला मॉनेस्ट्री समोरच अगदी जवळ दिसते. संपूर्ण मॉनेस्ट्रीचे देखणे फोटोज आपल्याला येथून टिपता येतात. आपण इथपर्यंत आल्याच्या क्षणांनाही आपण कमेऱ्यात क्लिक करू शकता. ट्रेकिंग अनेकांना चालून-चालून थकवा येऊन ते येथूनच फोटो घेऊन परत फिरतात. अशांसाठी सुरुवातीला पहिल्या टप्प्यापर्यंतच्या प्रवासासाठी उपलब्ध असणारी खेचरे / घोडे आम्हाला उत्तम पर्याय वाटतो. पारो रस्त्यावरून पाहाताना, जिथे पोहोचणे जवळपास अशक्य वाटते ते आता इथे पोहोचल्यावर काहीसे सोपे वाटू लागते.

      प्रवासाचा तिसरा पायऱ्या-पायऱ्यांचा टप्पा येथूनच सुरु होतो. पहिल्यासह पुढील दोन्ही टप्पे आपले ट्रेकिंगचे कसाब पणाला लावायला लावतात. अगदी शेवटच्या या टप्प्यात आपल्याला समोर मॉनेस्ट्री दिसत राहते मात्र ती पलिकडच्या डोंगरावरील कड्यात असल्याने फूटभर उंचीच्या ४०० उतरून पुन्हा ३०० पाय-या चढण्याची कसरत करूनच मॉनेस्ट्रीत पोहोचता येते. तिसऱ्या टप्प्यातील पहिल्या ४०० पायऱ्या उतरल्यावर आपण एक पूल पार करतो. पुलाच्या डाव्या हाताला मोठा धबधबा कोसळताना दिसतो, याला पवित्र मानतात. पवित्र मानला गेलेला धबधबा, बौद्ध धर्मात पवित्र मानल्या जाणा-या मंत्र लिहिलेल्या रंगीबेरंगी कापडी पताका आपले लक्ष वेधून घेतात. येथून समोर पारो घाटीचे सौंदर्य तर डावीकडे कड्याला बिलगलेली ताक्सांग मॉनेस्ट्री, डोळे मिटताक्षणी ध्यान लागावे इतकी शांतता, वातावरणात पवित्र धबधब्याच्या कोसळणाऱ्या पाण्याचा आवाज ऐकून मानवी मन वेडं होऊन जातं. टायगर नेस्ट मॉनेस्ट्रीच्या समीप पोहोचल्यानंतर समुद्रसपाटीपासून दहा हजार फूट उंचीवरील ती अनोखी शांतता आम्ही अनुभवली. रंगीबेरंगी पक्षी, वनराई यांनी युक्त असलेल्या या ठिकाणी आम्हाला कायम थंडी जाणवली. इथपर्यंत आपण मोकळेपणाने, काळजीपूर्वक फोटोग्राफी करू शकतो. पुढे प्रत्यक्ष ‘टायगर नेस्ट मॉनेस्ट्री’त फोटोग्राफी करण्यास मनाई आहे. कॅमेरा, पिशव्या आणि मोबाईल सारख्या किमती वस्तू सुरक्षित ठेवण्यासाठी बाहेर लॉकर उपलब्ध आहेत. सिक्युरिटी केबिन मध्ये तिकीट दाखवून एन्ट्री केली की आपल्याला लॉकर मिळतं.

      मॉनेस्ट्रीत पोहोचल्यावर समोरच्या दरीतले दृश्य पहिले आणि मन प्रसन्न झाले. समुद्रसपाटी पासून १० हजार फुटावर पर्वताच्या एका कोपऱ्यात आम्ही उभे होतो. नजरेसमोर धुक्याने भरलेली दरी होती. धुंद करणाऱ्या  वातावरणात गारवा जाणवत होता. टेकडीच्या कड्यावर बांधलेली मॉनेस्ट्री वरच्या दिशेने चार मुख्य भागांत विभागलेली आहे. या मॉनेस्ट्रीबद्दल काही आख्यायिका आहेत. सर्वात प्रमुख मॉनेस्ट्रीत बौद्ध वज्रयान पंथाचे गुरू आचार्य पद्मसंभवा यांचे स्थान आहे. एका लोककथेनुसार तत्कालिन सम्राट पत्नी येशे सोग्याल स्वेच्छेने आचार्य पद्मसंभवा यांची पत्नी बनली. पुढे तिने स्वतःला वाघीणीच्या रुपात बदलवून येथे आणले. या परिसरात एकूण आठ गुंफा आहेत. ज्या वेगवेगळ्या गुरूंच्या नावाने ओळखल्या जातात. सन २००५ साली जपान सरकारच्या सहकार्याने मॉनेस्ट्रीत सुधारणा करण्यात आलेल्या आहेत. मंदिरात आचार्य पद्मसंभवा यांच्यासह गौतम बुद्ध यांचे विशाल मूर्ती आहेत. मॉनेस्ट्रीच्या निर्मितीची कथाही आचार्य पद्मसंभवा यांच्याशी संबंधित आहे. भूतानच्या लोककथांनुसार याच परिसरात ८ व्या शतकात, आचार्य पद्मसंभवा यांनी ध्यानधारणा केली होती. तिबेटच्या दिशेने एका वाघिणीच्या (काही लोककथांच्या नुसार ही वाघीण म्हणजे त्यांची पत्नी) पाठीवर बसून या गुहेतील राक्षसाला मारण्यासाठी ते येथे आले होते. राक्षसाचा पाडाव केल्यानंतर इथलं सुंदर वातावरण पाहून त्यांनी इथेच तीन महिने कडक तपश्वर्या केली. त्यानंतरही त्यांनी तीन वेळा येथे तपश्वर्या केली होती. आचार्य पद्मसंभवा यांच्या आयुष्यात त्यांनी असा मोठा मुक्काम फार कमी ठिकाणी केलेला असल्याने या ठिकाणाला अनन्यसाधारण महत्व आहे. भूतानमध्ये बौद्ध धर्माची सुरुवात करण्याचे श्रेय त्यांनाच जाते. या मॉनेस्ट्रीत भगवान गौतम बुद्ध आणि आचार्य पद्मसंभवा यांच्या मुर्त्या आहेत. प्रत्येक मंदिरात प्रवेशद्वाराजवळील भिंतीनजीक बुद्धाची मूर्ती पाहिली. मंदिरात प्रवेश केल्यावर सर्व प्रथम आसनास नमस्कार केला जातो. त्यानंतर मूर्तीस तीनदा गुढघे टेकून नमस्कार करण्याची पद्धत आहे. मूर्तीस फुले / पाने / अक्षता / अगरबत्ती वाहण्याची पद्धत नाही. प्रसाद म्हणून काहीही म्हणजे बिस्किट्स, मॅगी, वेफर्ससुद्धा ठेवता येतात. सर्व प्रसाद एका मोठ्या फुलपात्रात ठेवला जातो. मूर्तीसमोर पातळ केलेल्या डालडा तुपाचा दिवा लावतात. मूर्तींच्या बाजूला सुंदर नक्षीकाम केलेल्या रंगीत कमानी ठेवलेल्या पाहिल्या.

      भगवान गौतम बुद्धांच्या २८ अवतारांपैकी दुसरे बुद्ध ‘गुरू पद्मसंभवा’ यांनी भूतान मध्ये बौद्ध धर्माचा प्रचार केला. यांच्या आणि बुद्धांच्या प्रतिमेत फक्त मिशांचा फरक आहे, यांच्या चेहऱ्यावर पातळ मिशा असतात. यांना भूतानची संरक्षक देवता मानले जाते. हिनयाना, महायाना आणि वज्रयाना या बुद्धिझम मधील ३ पंथांपैकी वज्रयाना पंथाला मानणारा हा देश आहे. यामध्ये नामस्मरण आणि शुद्धीकरणाला महत्व आहे. प्रत्येक भूतानी माणसाने आयुष्यात कधीतरी एकदा या ठिकाणी यावं असा भूतानमधला दंडक आहे. आचार्य पद्मसंभवा यांना स्थानिक भाषेत गुरु रिम्पोचे म्हणूनही ओळखले जाते. गुरू पद्मसंभवा वाघिणीवरून ज्या गुहेतून या भागात आले त्या गुहेत उतरल्यावर एका अवचित क्षणी हृदयावर प्रचंड दबाव आलेला जाणवला. कारण सुमारे १० हजार फूट उंचीवर दोन मोठाल्या दगडांच्या कपारीत अरूंद मार्गाने खोल दरीत शिरून पारो घाटीचा नजारा आणि टायगर नेस्ट पाहिल्याचा तो क्षण आम्ही जन्मभर विसरू शकणार नाही. हा सारा वारसा समजून घेतल्यावर आम्ही भगवान गौतम बुद्धांपुढे नतमस्तक झालो. सन १६९३ मध्ये येथे मॉनेस्ट्री उभारण्यात आली. त्यानंतर वेळोवेळी मॉनेस्ट्रीचे काम होत राहिले. काही वर्षापूर्वी १९ एप्रिल १९९८ रोजी मॉनेस्ट्रीला आग लागल्याने रोपवेच्या साहाय्याने आजची मॉनेस्ट्री नव्याने उभारली गेली. मूळ सांस्कृतिक ठेवा जतन करण्यासाठी नंतर रोपवे काढून टाकण्यात आला. हे बौद्ध भिक्षूंचे विशेष वास्तव्याचे ठिकाण आहे. मॉनेस्ट्रीच्या परिसरात भूतानची अद्भुत कला पाहाता येते. आपण पर्यटक म्हणून फिरतो त्याच्या वरती विद्यार्थ्यांचे एक गुरुकुल आहे. हा सारा परिसर पाहायला साधारणत २ तास पुरतात. ही मॉनेस्ट्री पूर्वेला असल्याने भर सकाळी मॉनेस्ट्रीच्या मागून सूर्य उगवताना चांगले फोटो मिळवणे अवघड होते. परतीच्या प्रवासात दुपारी सूर्य मॉनेस्ट्रीच्या बरोबर समोर आणि आपल्या मागे असतो तेव्हा चांगले फोटो मिळू शकतात.

      या ट्रेकिंग दरम्यान दिवसभर आम्हाला गार वारा बोचत होता. डोंगरावरील चढाई हा एक विलक्षण अनुभव असतो. आम्ही ताक्तसांग ट्रेकिंग दरम्यानही तो घेतला. गार वारा, गर्द झाडी, मळलेली पायवाट आणि चढणीवर धापा टाकत उभे राहून, गुडघ्यावर हात ठेवून तर कधी झाडाच्या एखाद्या बुंध्याला टेकून दम खाण्यातली मजा काही औरच ! टायगर नेस्ट मॉनेस्ट्री ट्रेकिंग करताना खूप थकायला होतं. छातीतली हृदयाची धडधड स्पष्ट ऐकू येते. बागेत चालावं इतक्या सहजतेने भूतानी बाया-बाप्यांना इथे चालताना पहिले की त्यांच्या मागे धापा टाकत चालणाऱ्या आम्हाला आमच्या शारीरिक क्षमता समजतात. या जातायेताच्या ११ किलोमीटरच्या प्रवासात भूतानच्या सरकारने फक्त एकाच ठिकाणी पहिल्या टप्प्यावर रेस्टोरेंटला परवानगी दिली आहे. ते वगळता इतर कोठेही कोणतीही खाण्याची व्यवस्था नाही. त्यामुळे आपण आपल्याला आवश्यक ट्रेकिंग योग्य खानपान सोबत घेतलेले योग्य. मात्र त्याचे रिकामे रॅपर्स मात्र रस्त्यात सोडू नयेत हेही तितकेच खरे ! या मार्गावर आम्ही काही ठिकाणी रिकाम्या रॅपर्सचा कचरा पहिला, विशेष म्हणजे तो आम्ही भारतीयांनीच केलेला होता. इथले स्थानिक मार्गदर्शक एकत्रितपणे चढाईचा हा संपूर्ण मार्ग नियमित स्वच्छ करतात. पारोघाटीतील एका सरळ रेषेतील सुळक्यावर टांगलेल्या अवस्थेत, पाहाताना आपला आपल्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही अशा ठिकाणी मॉनेस्ट्री उभी आहे. साहसी पर्यटन, ट्रेकिंग, दैनंदिन चालण्याचा सराव असेल तर हा ट्रेक थोड्या श्रमाने आपल्याला यशस्वी करणे शक्य आहे. भूतानमध्ये जाण्याचा विचार करत असाल तर टायगर नेस्ट मॉनेस्ट्री अवश्य अनुभवा. तो समृद्ध जीवनानुभव देऊन जाईल. त्यासोबतच भूतानमधील १६९ फूट उंच ग्रेटबुद्धा डोरडेन्मा शाक्यमुनि मूर्ती, प्राचीन संस्कृती, परंपरा, उंचचउंच डोंगररांगा, पर्यावरण, वास्तूंचे आर्किटेक्चर, येथील खानपान अनुभवा. भूतानमध्ये २०० रुपयात तात्पुरत्या स्वरूपाचे पर्यटकांसाठीचे मोबाईल सीमकार्ड उपलब्ध होते. ते फायदेशीर ठरते. पर्यटनासाठी मार्च ते मे तर निसर्गाच्या संस्मरणीय अनुभूतीसाठी ऑक्टोबर ते जानेवारी हा कालावधी उत्तम आहे.

      टायगर नेस्ट मॉनेस्ट्री भूतानमधील बौद्धधर्माचे उगमस्थान आहे. "ओम मणि पद्मे हुम" या मंत्राच्या त्रिकोणी पताकासर्वत्र पहिल्या. या पताका फडकल्याने मंत्रशांती हवेत दूरवर पोचते, अशी श्रद्धा आहे. टायगर नेस्ट मॉनेस्ट्री हा जरा लांब पल्याचा अत्यंत कठोर ट्रेक आमच्या मानसिक आणि शारीरिक क्षमतांची कठीण परीक्षा घेणारा ठरला. ९०० मीटर उंच चढून शिखर गाठण्याचा आनंदही अवर्णनीय होता. भूतानच्या मॉनेस्ट्रीची भव्यता, भूतानची शिस्त, परिस्थितीवर मात करून देशविकास करण्याची धडपड, हसरे चेहरे, प्रदूषणमुक्त निसर्गसौंदर्य, डोळे दिपवणारी हिरवाई, स्वच्छ नद्या पाहून मनाला जे समाधान लाभलं ते केवळ शब्दातीत.



धीरज वाटेकर

‘विधीलिखित’, १२६३-ब, कांगणेवाडी रोड, खेंड, चिपळूण ४१५६०५, जि. रत्नागिरी.     
मो. ९८६०३६०९४८

dheerajwatekar@gmail.com

(धीरज वाटेकर हे पर्यटन आणि चरित्र लेखनया विषयावरील प्रकाशित आठ पुस्तकांचे लेखक असून कोकण इतिहास, पर्यटन, पर्यावरणविषयक, सामाजिक जागृतीपर विषयात गेली १८ वर्षे कार्यरत पत्रकार आहेत.)








गुरुवार, ६ डिसेंबर, २०१८

आव्हानमायेच्या निमित्ताने...

        नामवंत बहुआयामी लेखकआमचे मार्गदर्शक आदरणीय सुमेध वडावाला (मृत्युंजय श्रीकृष्ण रिसबूड) सरांच्या सात पुस्तकांच्या नव्या आवृत्त्यांच्या प्रकाशनाचा कार्यक्रम नुकताच कोकणातील खेड शहरातील तटकरी सभागृहात संपन्न झाला. साधारणतः तीनेक महिन्यांपूर्वी सुमेध सरांनी फोन करून, ‘दोन डिसेंबर तारीख रिकामी ठेवा. माझ्या खेडमधील एका कार्यक्रमासाठी तुम्हाला यायचे आहे’, अशी स्पष्ट सूचना केली होती. एकाच वेळी एकाच लेखकाच्या सात पुस्तकांच्या नव्या आवृत्यांचा मराठी साहित्य विश्वातील दुर्मीळ प्रकाशन सोहोळा, पुस्तकांवर कोणीही काहीही बोलायचे नाही हा सर्व वक्त्यांना घालून दिलेला शिरस्ता आणि व्यक्त होण्यासाठी दिलेला ‘आव्हानमाया’ हा अनोखा विषय यांमुळे हा कार्यक्रम सर्वार्थाने वेगळा ठरला. या कार्यक्रमासाठी आम्हाला (धीरज वाटेकर) आमचे सहकारी निसर्ग प्रकाशनाचे सल्लागार विलास महाडीक यांच्यासह उपस्थित राहाता आले. त्या ‘आव्हानमाया’ कार्यक्रमाच्या निमित्ताने...

      ‘आव्हानमाया’ कार्यक्रमाने शीर्षकापासून संपेतोपर्यंत आपला वेगळेपणा कायम ठेवला. एकीकडे जागतिकीकरणामुळे मानवी जीवन जगण्याचा वेग प्रचंड वाढला आहे. आज प्रत्येक क्षेत्रात जागतिकीकरणाने प्रवेश केला आहे. त्यातून अनेक नवी आव्हाने निर्माण झाली आहेत. ग्रामीण भागातील तरूणांपुढे शिक्षण घेतानाच कौटुंबिक कामाला हातभार लावत स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे आव्हान खडतर आहे. बहुसंख्य तरूण उच्चशिक्षण घेऊनही नोकरीच्या शोधात सर्वत्र वणवण फिरत आहेत. नोकरी नसल्याने कुटुंबाच्या उदरनिर्वाहाबरोबर स्वतःचे कसे होणार हा प्रश्न अनुत्तरीत आहे. नोकऱ्या मिळत नसल्याने गुन्हय़ांमध्ये तरूणांची संख्या वाढते आहे. उदरनिर्वाहासाठी नेमके करायचे तरी काय ? या मन:स्थितीतील अनेकजण सध्या तणावग्रस्त आयुष्य जगताना दिसत आहेत. अविचार आत्मघाताला प्रवृत्त करतो. आयुष्याचा अर्थ समजून घेऊन जगणे सुंदर करावेअसे संस्कार दुर्मीळ होत चालल्याने जगण्याची मौज आणि त्याच्या संकल्पनाही संकुचित होत चालल्याने तरुणाईचा अविचारीपणा फोफावल्याची खंत अनेकदा जाणत्या पिढीकडून व्यक्त होताना दिसते. आज क्षणाचा शाश्वतपणा पुरता हरवला आहे. मुंबईसारख्या महानगरातक्षणाक्षणाला समोर आव्हाने उभी असतातयाची प्रत्येकाला पुरेपूर जाणीव असते. या आव्हानांचा  मुकाबला करण्यासाठी संयम आणि विवेकाची गरज असतानाअविचार आणि अविवेकाचेच मार्ग प्रभावी ठरू लागल्याचे चिंताजनक वास्तवही अलीकडे बळावत चालले आहे. अर्थात जगण्याचे संदर्भच बदलत असताना ‘आव्हानामाया’ हा विषय पुढे आला, हे महत्त्वाचे ! जगण्याचे वर्तमानकालीन संदर्भ बदलत अविचारी साहसवृत्तीला आयुष्याचा, जगण्याचा अर्थ समजावण्याचे मार्गदर्शन आव्हानमायेत मिळाले.

      सुमेध वडावाला हे मूळचे कोकणातल्या खेड गावचे रहिवासी. व्यवसायानिमित्ताने पुढे ते मुंबईत स्थिरावले. त्यांनी खेड परिसरातील आपले निवडक कौटुंबिक सदस्यनातेवाईकहितचिंतकत्यांच्या लेखनावर प्रेम करणाऱ्या सुमारे सव्वाशे साहित्यप्रेमींना या अनोख्या सोहोळ्यासाठी निमंत्रित केले होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षचिपळूणच्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराचे कार्याध्यक्ष प्रकाश देशपांडेज्ञानदीप शिक्षण संस्थेचे सरचिटणीस प्रकाश गुजराथीखेडच्या माजी नगराध्यक्षा वैशाली कवळेडॉ. उपेंद्र तलाठीविलास बुटाला आदि मान्यवर उपस्थित साहित्य रसिकांसमोर ‘आव्हानमाया’ विषयानुरूप व्यक्त होते झाले. यातून जे विचार सर्वांसमोर आले ते ऐकून उपस्थितांना थक्क व्हायला झालं. सर्वच मान्यवरांनी हातचं न राखता मनातलं हृदयस्थ खुलं केल्याने वक्त्यांच्या आयुष्यातील ही अनुभवांचीआव्हानांची मांडणी सा-यांनाच भावली. या पुस्तकांचे प्रकाशक सुकृत प्रकाशनचे अमर कदमविघ्नेश ग्रंथ भांडार कणकवलीचे विघ्नेश गोखले यांनी हा कार्यक्रम खेडला घडविला याबद्दल सूत्रसंचालनकर्ते उत्तमकुमार जैन यांनी त्यांच्याप्रति आणि उपस्थितीबाबत सर्व मान्यवरांप्रति कृतज्ञता व्यक्त केली. ‘वीर माणसाचा पोवाडा वीर माणसाने गावा, आणि तशानींच तो ऐकावा’. अशा स्वरूपाचा हा कार्यक्रम असल्याचे जैन यांनी नमूद केले. व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते सात पुस्तकांचे प्रकाशन झाले.

      ९ आत्मकथा, ८ कथासंग्रह, ७ कादंबऱ्या, ३ ललितसंग्रह, १ प्रवासवर्णन आदि प्रकारातील राजहंस, मॅजेस्टिक, मेहता, ग्रंथाली अशा प्रतिष्ठित प्रकाशकांनी प्रकाशित केलेली २८ पुस्तके सुमेध सरांच्या नावावर आहेत. जवळपास सर्वच पुस्तकांच्या २ ते ८ आवृत्याही निघाल्यात. सन १९९२ पासून २०१६ पर्यंत महाराष्ट्र शासनासह १७ पुरस्कार त्यांच्या पुस्तकांना मिळालेत. कादंब-याकथासंग्रहललितलेखन आदि उदंड लेखन करत सुमेध वडावाला (रिसबूड) हे नाव पुढे आत्मकथा / चरित्र या साहित्य प्रकारात स्थिरावले आणि अधिक प्रसिद्ध झाले. अनेक सामान्य माणसांच्या असामान्य जीवनप्रवासास वडावालांची शैली लाभल्याने ती पुस्तके वाचकवर्गाने हमखास उचलून धरली, हा आजवरचा अनुभव आहे. ‘वडावाला’ या त्यांच्या नावामागेही एक गंमत आहे. खेडला नारिंगी नदीच्या किनाऱ्यावरील जुन्या घरात त्यांचे बालपण गेलेले आहे. सन १९६२ साली कोकणातल्या सुशिक्षित घरात जन्मलेल्या (११ एप्रिल) सुमेध सर कोकणातील सुरुवातीच्या वास्तव्यानंतर पुढे विलेपार्ल्यात मामांकडे आले. सन १९८३ मध्ये नोकरी निमित्ताने माझगाव डॉक मध्ये स्थिरावल्यानंतर सायंकाळच्या फावल्या वेळेत विलेपार्ले येथे त्यांनी आपल्या जवळच्या व्यक्तीच्या वडापावच्या गाडीवर उभे राहण्यास सुरुवात केली होती. दरम्यान कथालेखन सुरूच होते. मात्र अनेकदा लेखन मूळ नावाने छापले जात नव्हते, लिखाण परत येई. नावामुळे असे होतेय की काय असे त्यांना वाटू लागले. इकडे सायंकाळी वडापावच्या गाडीवर त्यांना सहजतेने कोणीही ग्राहक हाक मारताना 'वडावाला' म्हणून संबोधित असे. एकदा सहज म्हणून त्यांनी ‘वडावाला’ हा शब्द वापरून लेखन करायला सुरुवात केली आणि त्यांची कथा साप्ताहिक सकाळ ने स्वीकारली. तेव्हापासून ‘सुमेध वडावाला’ हे नाव प्रसिद्धीस आले. त्यांच्यालेखनाचे विषय आणि मांडणी एवढी वेगळी कीविज्ञानलेखक निरंजन घाटे यांनी त्यांच्यासाठी मोठ्या प्रकाशकांकडे शब्द टाकला. सांजवा’ कथासंग्रह निघाला. पुस्तके यायला सुरुवात झाली. सन २०१३ साली चिपळूणच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सुमेध सर जन्मांध मनश्रीची मुलाखत घेत होते. मुख्य मंडप हाऊसफुल्ल झाला होता. गाण्यात प्रावीण्य मिळवलेली‘बालश्री’ने सन्मानित मनश्री तेव्हा कॉलेजमध्ये होती. दृष्टिहीनत्वामुळे बिकट झालेला प्रवास ती उलगडत होती. ‘बालश्री’ प्रदान सोहळ्यात राष्ट्रपती अब्दुल कलाम यांनी कौतुकानं विचारलं होतं, ‘‘कब आओगी मनश्री हमें वापस मिलने ?’’ त्यावेळी तिनं उत्स्फूर्तपणे सांगितलं होतंआज बालश्री स्वीकारने आयी हूँभविष्य में पद्मश्री’ लेने के लिये आ जाऊंगी’. त्या दुर्दम्य आत्मविश्वासदर्शी गप्पा अनेकांसोबत तेव्हा आम्हीही ऐकल्या होत्या. सुमेध वडावालांना त्यावेळी मिळालेलं ‘स्टँडिंग ओव्हेशन’ हा आम्हाला सर्वोत्तम पुरस्कार वाटला. या मनश्रीची आत्मकथाही त्यांनीच लिहिली. ही मनश्री’ लिहिताना पहाटे जाग आल्यावरच्या अंधारात आपण आंधळे असल्याचा भास सुमेध सरांना व्हायचा. अशा समरसतेमुळेच त्यांच्या आत्मकथा जीवंत झाल्या. पुढे वाचकांनाही तीच प्रचीती आली. राष्ट्रपतींसोबतच्या मनश्रीच्या संवादाची सरांनी या कार्यक्रमात आठवण करून दिली. 
   
     

                   प्रकाशक विघ्नेश गोखले आणि अमर कदम यांनी सुमेध वडावाला हे आमचे मार्गदर्शक असल्याचे सांगून ‘आम्हाला ग्राहक नको वाचक हवायं’, असे आवर्जून नमूद केले. प्रकाश गुजराथी यांनी बोलताना रिसबूड सरांचे चिरंजीव असा उल्लेख करून खेडची ‘माया’ व्यक्त केली. अनेकविध पुरस्कारांचे धनीखेडचा साहित्यिक असा सुमेध यांचा उल्लेख करून आपल्याला शिक्षणसंस्था चालवताना आलेल्या आव्हानांबाबत त्यांनी अनुभव सांगितले. कुटुंब चालवताना आवश्यक असलेले समाजभानआयुष्यात घेतलेला निर्णय चुकीचा ठरू न देता तो सिद्ध करण्याची आपल्यावर येणारी जबाबदारीकोणत्याही कामाला नकार न देणे आदि बाबींचा उहापोह त्यांनी केला. रिसबूड यांचे ‘अष्टावधान’ हे पुस्तक ज्यांच्या अनुभवांवर आधारित आहे त्या डॉ. उपेंद्र तलाठी यांनी सहज आव्हाने पेलणारे आव्हानमाया जगतात असे सांगून आयुष्यातील वैद्यकीय आणि सामाजिक जीवनातील काही किस्से सांगितले. योगायोगाने नगराध्यक्ष झालेल्या वैशाली कवळे यांनी बोलताना आपल्या कारकिर्दीतील आठवणी सांगितल्या. एक हाती सत्तेचा सामाजिक उपयोग करण्याच्या प्रयत्नात असूनही त्यांचा प्रत्येक दिवस समस्या घेऊन उजडायचा आणि मावळायचा. नगराध्यक्ष झाल्या तरीही त्यांच्यातला शिक्षक जीवंत असल्याने त्याचा सभेत काय परिणाम व्हायचा हे सांगितल्यावर सारे हास्यात बुडाले. कोट्यावधी रूपये गटारात का घालवता हा प्रश्न पुढे करून भुयारी गटार योजना बाबतचे अनुभव सांगितले. कार्यक्रमाध्यक्ष प्रकाश देशपांडे यांनी आव्हानाशिवाय जगणं अशक्य असल्याचे सांगितले. कोमसापचे पहिले साहित्य संमेलनकवी माधवांची जन्मशताब्दीजितेंद्र अभिषेकी यांचे नाट्यसंमेलनाध्यक्ष होणेआशा भोसले यांचे संमेलनाला येणे आदिंसह सन २०१३ साली चिपळूणात झालेल्या ८६ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनातील आव्हानांचा वृत्तांतही अत्यंत खुबीने मांडला. यावेळी चिपळूणच्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराचे अध्यक्ष अरुण इंगवले, डॉ. यतीन जाधव, डॉ. रेखा देशपांडे उपस्थित होत्या.

      झापडबंद राहू नका’, असा संदेश देणारे, प्रेरणादायीवैविध्यपूर्ण आणि वाचताना भान हरपायला लावणारं लेखन करणारे लेखक म्हणून सुमेध सरांचे लेखन आम्हालाही आवडते. बदलत्या नीतिमत्तेचा वेध घेणारी, केवळ संवादांतून साकारलेली धर्मयुद्ध’ ही त्यांची कादंबरी लक्षणीय आहे. अनुभवंतीआई ती आईचकाही काही माणसं!चित्रंतृष्णादोन चाकं झपाटलेलीथोरवीप्रदीप लोखंडेब्रह्मकमळमनश्रीमी नंदाजल आक्रमिलेसंदर्भासहित स्पष्टीकरणसफाईसांजवाहेडहंटरअशी त्यांची जवळपास सर्वच पुस्तके गाजलेली आहेत. या कार्यक्रमात मराठी साहित्य विश्वात एकाच लेखकाच्या सात पुस्तकांच्या नव्या आवृत्त्यांचे एकाच वेळी प्रकाशन होण्याची दुर्मीळ घटना घडत असताना स्वतः लेखक वडावाला यांनी व्यासपीठावरील मान्यवरांना ‘माझ्या पुस्तकांवर कोणीही बोलायचे नाही’, असे स्पष्ट केले होते. सर्वांना सुग्रास भोजन आणि सुमेध सरांच्या स्वाक्षरीसह मिळालेल्या पुस्तकभेटीने कार्यक्रमाचा समारोप झाला. समारोपापूर्वी व्यासपीठावरून बोलताना वडावाला यांनी लेखनानेच आपले आयुष्य समृद्ध झाल्याचे सांगितले. पुस्तकांच्या माध्यमातून दुस-यांचे आयुष्य रेखाटताना ते काही काळ जगायला मिळाल्याचेही त्यांनी नमूद केले. अखेरीस लेखक असण्याचे खूप फायदे असल्याचे सांगून लेखनाबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

धीरज वाटेकर

‘विधीलिखित’, १२६३-ब, कांगणेवाडी रोड, खेण्ड, चिपळूण ४१५६०५, जि. रत्नागिरी.     
मो. ९८६०३६०९४८

dheerajwatekar@gmail.com

(धीरज वाटेकर हे पर्यटन आणि चरित्र लेखन’ या विषयावरील प्रकाशित आठ पुस्तकांचे लेखक असून कोकण इतिहास, पर्यटन, पर्यावरणविषयक, सामाजिक जागृतीपर विषयात गेली १८ वर्षे कार्यरत पत्रकार आहेत.)

गुरुवार, २९ नोव्हेंबर, २०१८

वृक्षमित्र आबासाहेब मोरे आयोजित ‘भूतान पर्यावरण अभ्यास दौरा’

     
        निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ आणि महाराष्ट्र शासन प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तिसरे पर्यावरण सम्मेलन आणि भूतान निसर्ग व पर्यावरण अभ्यास दौरा नुकताच दिनांक १० ते २० नोव्हेंबर दरम्यान संपन्न झाला. महाराष्ट्रातील सहभागी ७८ पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी मंडळाचे अध्यक्ष वृक्षमित्र आबासाहेब मोरे यांच्या नेतृत्वाखाली हा दौरा यशस्वी केला. भूतान मधील भारताचे राजदूत जयदीप सरकार यांची राजधानी थिंफू येथील भारतीय दूतावासात भेट घेऊन त्याच्यांशी भूतान पर्यावरण व संस्कृती संदर्भातील विविध मुद्दयानुरूप संवाद साधण्याची  सर्वाना मिलालेली संधी या पर्यावरण अभ्यास दौऱ्याचे मोठे फलित म्हणावे लागेल.

      कुझोझाम्पुला म्हणजे भूतानच्या झोन्खा भाषेत नमस्कारगुड मॉर्निंग वगैरे हे आम्हाला तिथे गेल्यावर समजले. भूतान भू-उत्थान असा अर्थ होतो. येथे १ गुल्ट्रम = १ रुपया असा चलनाचा समसमान दर आहे. भूतान धूम्रपान बंदी करणारे ते जगातील पहिले राष्ट्र आहे. ताकिन हा भूतानचा राष्ट्रीय प्राणी आहे. राष्ट्रीय आणि सर्वात लोकप्रिय खेळ तिरंदाजी आहे. ३८३९४ चौ.कि.मी. पसरलेला भूतानफक्त १० लाख लोकसंख्याउतरेकडे २४००० फुट हिमशिखरापासून दक्षिणेकडील समुद्र सपाटीपासून ४५० फुट उंचीवर सपाट जमिनीवरील दाट जंगलापर्यंत पसरला आहे. ह्या देशात ५४०० प्रकारच्या विविध वनस्पती७०० हून अधिक पक्षी६०० पेक्षा अधिक प्रकार असलेले ऑरचीड४६ पेक्षा अधिक प्रकारचे Rhododendrons (गुलाबाचा एक प्रकार) आणि ३०० हून अधिक प्रकारच्या हर्बल वनस्पती (ज्याचा आयुर्वेदिक औषधासाठी उपयोग होतो ) दिसून येतात. २३००० फुट उंचीहून अधिक असणारी २० हिमशिखरे असलेला हिमालय ह्या देशाच्या उत्तरेला आहे. भूतानला पर्यटक पक्षी निरीक्षणासाठी अधिक येतात. आम्हीही काही पक्षी पहिले. भूतानमध्ये पुरुष गुडघाभर लांबीचा घो” नावाचा रोब सारखा पोशाख घालतात. स्त्रिया तळपायाच्या लांबीपर्यंतचा किरा” नावाचा पोशाख घालतात. विविध रंगाच्या मफलरी आणि स्कार्फ वापरतात. भूतानच्या एकूण १० लाखपैकी २ लाख राजधानी थीम्पू मध्ये रहातात. ही जगातली एकमेव राजधानी आहे जिथे ट्रॅफिक सिग्नल्स नाहीत. हा भारताच्या पूर्वेकडील भागपहाडी प्रदेश असल्यामुळे येथे लवकर अंधार होतो. "ओम मणि पद्मे हुम" या मंत्राच्या त्रिकोणी पताका आपल्याला देशभर सर्वत्र दिसतात.


      या देशातून फिरताना सर्वांनी येथील लोकांची आनंदी जीवनशैली अनुभवली. शेजारचा अस्वच्छ जयगाव आणि स्वच्छ फुटशोलिंग येथेच त्या देशाची ओळख सर्वांना पटली. येथे तंबाखू विक्रीला, उघडयावर शौचास बंदी आहे. तेथील महामार्गावर जागोजागी शौचालय आहेत. चोरीचे कमी प्रमाण, नाल्यात, गटारात कचरा न टाकण्याची मानसिकता, स्मशानभूमीला चारही बाजूने असलेल्या सीमाभिंती, अस्वच्छता करणाऱ्यावर होणारी पोलिस कारवाई असे अनेक मुद्दे वेगळे भासले. भूतान मधील रस्ते आपले भारतीय आभियंते तयार करतात. हे रस्ते खड्डे विरहित अवस्थेत किमान ७ - ८ वर्षे टिकतात. डोंगर उतरावर सेंद्रीयशेती केली जाते. येथे ध्वनी प्रदूषण नाही. हॉर्न वाजविण्यास बंदी आहे. येथे रस्त्यावर सिग्नल नाही. वाहतुकीला शिस्त आहे. रस्ता ओलंडताना झेब्राक्रॉसिंग वरुनच जावे लागतें. मनुष्य रस्ता ओलांडित असताना सर्व वाहने थांबतात. येथे वाहनाला गतीचे बंधन आहे. हवा, पाणी, जमीन, प्रदूषित होऊ नये याचे नियम कडक आहेत. येथे इमारतीला लाकूड मोठ्या प्रमाणात वापरतात. कोठेही स्टिकरफ्लेक्स जाहिराती दिसत नाहीत. मंत्री, पुढारी यांच्या वाढदिवस, शुभेच्छा आदि फलक नाहीत. लोक राजाला खूप मानतात. त्याबाबतचे फलक मात्र दिसतात. सद्यास्थितीत हा देश पर्यटन व्यवसायावर अवलंबून आहे. भूतान देश शिक्षण, संस्कृती, स्वच्छताशिस्त, तेथील नागरिकांचे त्यांचा देश, राजाविषयीचे प्रेम, पर्यावरणसेंद्रियशेती याबाबतीत वेगळा आहे. गच्च भरलेला निसर्ग, महिला-पुरुष वर्गाचे कष्ट, चेहऱ्यावरील आनंद कौतुकास्पद वाटला. भूतान पर्यावरण संवर्धन बाबतीत जगात अग्रेसर आहे. भूतान देशात पर्यवारणाचा अभ्यास करताना या देशातील शिक्षण कसे आहे ? याचीही माहिती सर्वांनी घेतली. त्यासाठी परिसरातील, गावातील विविध शिक्षक, नागरिक, पालक, विद्यार्थी यांच्याशी चर्चा करण्यात आली. सर्वांनी भूतान देशातील पुनाखा शहराजवळील पोचू-मोचू नदीच्या संगमजवळ एका सरकारी शाळेला भेट दिली. या शाळेचा परिसर खूपच स्वच्छ, सुंदर, निसर्गरम्य व आकर्षक दिसला. शाळेची इमारत भव्य, सुसज्ज होती. विशेष म्हणजे शाळेत जैवविविधतेने संपन्न गार्डन होती. भूतानमध्ये १०-१२ वीपर्यंत  मोफत आणि सक्तीचे शिक्षण आहे. येथे बहुतेक सर्व शैक्षणिक साहित्य मोफत मिळते. शाळेचा अभ्यासक्रम भूतान देश व इतर जगाची माहीती यावर आधारित आहे. येथे इयत्ता पहिलीपूर्वी प्री-प्रायमरी शिक्षण आवश्यक आहे. वर्गातील विद्यार्थी संख्या ३२-४० आहे. येथील प्रत्येक विषयाचा पर्यावरणाशी संबंध जोडलेला आहे, पर्यावरण हा विषय स्वतंत्र सक्तीचा आहे. वर्षातून २ वेळा परीक्षा होते. वर्गात ग्रीनबोर्ड, विविध खेळ, संगणक वापर, ई-लर्निग, तंत्रस्नेही पद्धत वापरली जाते. शिक्षकदिन मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. शिक्षकांच्या बदल्या त्यांच्या विनंतीनुसार होतात. विद्यार्थी सहलीला गेले तर छोटी डस्टबिन सोबत नेतात. शेतीत भात हे मुख्यपीक घेतले जाते. भाजीपाल्यामध्ये बटाटे, टोमॅटो, मिरची, कांदे, भोपाळाकोबी, फ्लॉवर अशी पीके घेतली जातात. येथे कोणीही रस्त्यावर कचरा टाकत नाहीत. रस्त्यावर सरकारने dont littering असे बोर्ड लावलेले आहेत. जंगल ७०% आहे. पारोपोचू, मोचू आदी सर्व नद्यांचे पाणी स्वच्छ आहे. नदीत कचरा दिसत नाही. नद्यांना  सरंक्षक भिंती बांधलेल्या आहेत. नदीमध्ये कपडे,  जनावरे, गाडया धुतल्या जात नाहीत. येथे कोठेही सांडपाणी डबकी दिसत नाहीत. त्यामुळे डासांचे प्रमाण नगण्य आहे. भूतानमध्ये कोठेही फोटो काढला असता अत्यंत सुंदर फोटो येतो. भूतानी निसर्गाला देव मानतात, त्याची पूजा करतात. दाट उंचाल्या वृक्षांच्या जंगलातून जाणारे वळणावळणाचे रस्ते, दुपारच्या वेळीही झोंबणारी थंड हवा, चहूबाजूंनी दिसणारी हिमालयाची उंच उंच शिखरे, खोल दऱ्या सर्वाना मोहवून टाकतात.

      भूतानची जागतिक ओळख असलेले टायगर नेस्ट मॉनेस्ट्री (तक्तसांग मठ - Taktsang Monastery) हे पारो घाटीतील सर्वात पवित्र आणि अद्भुत बौद्ध ठिकाण आहे. ही मॉनेस्ट्री समुद्र सपाटीपासून ३१२० मीटर उंच पर्वतावर एका कड्यात अत्यंत कल्पकतेने बांधलेली आहे. सन १६९२ मध्ये उभारणी झालेल्या मॉनेस्ट्रीचा सन १९९८ मध्ये जीर्णोद्धार करण्यात आला आहे. हे बौद्ध भिक्षूंचे वास्तव्याचे विशेष ठिकाण आहे. मॉनेस्ट्रीच्या परिसरात भूतानची अद्भुत कला पाहाता येते. या उंच धार्मिक स्थळावर पोहोचण्यासाठी पगडंडीनुमा मार्गे पायी चालत (ट्रेकींग) जावे लागते. पारो शहरापासून हे ट्रेकिंगचे ठिकाण १२ किमी आहे. रस्त्यात काही ठिकाणाहून टाइगर नेस्ट दिसते तेव्हा तिथपर्यंत पोहोचणे अशक्यप्राय वाटते. आम्ही ग्रुपमधील ५ जणांनी सकाळी ८ ते सायंकाळी ४ या वेळेत हा ट्रेक पूर्ण केला. या वेळेत परिसरात सरासरी ६°से. तापमान होते. सुरुवातीला छोटा पटरी बाजार आहे. सुरुवातीच्या प्रवासात झ-याच्या पाण्याच्या मदतीने गोल फिरणारे बौद्ध प्रार्थना चक्र पाहून विशेष वाटते. रस्त्यात काही ठिकाणी पिण्यासाठी झ-याचे पाणी आहे. या ट्रेकिंगचा पहिला टप्पा पूर्ण होतो तेथे खानपान व्यवस्था पुरविणारा एक कॅफेटेरिया आहे. पहिल्यासह पुढील दोनही ट्रेकिंगचे टप्पे आपले ट्रेकिंगचे कसाब पणाला लावायला लावतात. सायप्रस वृक्षांच्या दाटीवाटीतून आकाशाच्या दिशेने जाणारी वाट आपल्याला चांगलीच दमवते. अर्धे अंतर पार केल्यावर प्लास्टिकच्या बाटल्यांपासून बनलेले प्रार्थना चक्र लक्ष वेधून घेते. अति उंची (हाय अल्टिट्यूड)विरळ हवाथंडी आणि खडी चढण यांचा सामना करीत लवकर दमछाक होणाऱा हा प्रवास करावा लागतो. अगदी शेवटच्या टप्प्यात आपल्याला समोर मॉनेस्ट्री दिसत राहते मात्र ती पलिकडच्या डोंगरावरील कड्यात असल्याने फूटभर उंचीच्या ४०० उतरून पुन्हा ३०० पाय-या चढण्याची कसरत करूनच मॉनेस्ट्रीत पोहोचता येते. या मार्गावर पवित्र मानला गेलेला एक सुंदर धबधबाबौद्ध धर्मात पवित्र मानल्या जाणा-या मंत्र लिहिलेल्या रंगीबेरंगी कापडी पताका लक्ष वेधून घेतात. येथून समोर पारो घाटीचे सौंदर्य तर डावीकडे कड्याला बिलगलेली ताकसांग मॉनेस्ट्रीडोळे मिटताक्षणी ध्यान लागावे इतकी शांतता अनुभवून मानवी मन वेडं होऊन जातं. एकूण ट्रेकिंगचे जाता-येता अंतर ११ किलोमीटर आहे. रंगीबेरंगी पक्षीवनराई यांनी युक्त असलेल्या या ठिकाणी कायम थंडी जाणवली. माॅनेस्ट्रीत फोटोग्राफीला परवानगी नाही. तेथे धबधबा वगळता सहसा कोणताही आवाज येत नाही. माॅनेस्ट्री चार मुख्य भागात विभागली आहे. या मॉनेस्ट्रीबद्दल काही आख्यायिका आहेत. बौद्ध वज्रयान पंथाचे गुरू पद्मसंभवा हे वाघिणीवर स्वार होऊन येथे गुहेत आले. त्यांनी येथे खडतर तपश्चर्या केली होती. गुरू पद्मसंभवा वाघिणीवरून ज्या गुहेतून या भागात आले त्या गुहेत उतरल्यावर एका अवचित क्षणी हृदयावर प्रचंड दबाव आलेला जाणवला. कारण सुमारे १० हजार फूट उंचीवर दोन मोठाल्या दगडांच्या कपारीत अरूंद मार्गाने खोल दरीत शिरून पारो घाटीचा नजारा आणि टायगर नेस्ट पाहिल्याचा तो क्षण आम्ही जन्मभर विसरू शकणार नाही. हा सारा वारसा समजून घेतल्यावर आम्ही भगवान गौतम बुद्धांपुढे नतमस्तक झालो. या ट्रेकला आमच्यासोबत (धीरज वाटेकर) पर्यावरणवादी चळवळीतील आमचे सहकारी विलास महाडिकमहाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ बालभारती पुणेचे सदस्य बाळासाहेब चोपडे (पलूस-सांगली)गुरूवर्य प्राथमिक शिक्षक मार्गदर्शक पुस्तिकेचे उपसंपादक- शिक्षक तुकाराम अडसूळ (पारनेर-अहमदनगर) आणि मुक्त पत्रकार संतोष दिवे (संगमनेर-अहमदनगर) सोबत होते.

      भूतान निसर्ग व पर्यावरण अभ्यास दौ-यांतर्गत महाराष्ट्रातील सहभागी ७८ पर्यावरणवादी कार्यकर्त्यांना मंडळाचे अध्यक्ष वृक्षमित्र आबासाहेब मोरे यांच्या नेतृत्वाखाली सी. ए. राज देशमुख आणि सुशांत जवक यांच्या माध्यमातून भूतान मधील भारताचे राजदूत जयदीप सरकार यांची राजधानी थिंफू येथील भारतीय दूतावासात भेट घेण्याची संधी मिळाली. पर्यावरण अभ्यास दौ-यांतर्गत भूतानला आलेल्या महाराष्ट्रातील सर्व कार्यकर्त्यांचे भारतीय दूतावासातर्फे भेटीचे निमंत्रण स्वीकारल्यानंतर दूतावासात एक विशेष कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर आबासाहेब मोरेदूतावासातील वरिष्ठ अधिकारी इशा श्रीवास्तवसमीर अकोलकर उपस्थित होते. मोरे यांनी भारताचे राजदूत जयदीप सरकार यांचा विशेषांक देऊन विशेष सन्मान केला आणि आपल्या मनोगतात संवाद भेटीचे निमंत्रण स्वीकारल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी बोलताना जयदीप सरकार यांनी भूतानच्या आनंदी देश असण्यामागील रहस्य सर्वांना उलगडून सांगितले. भूतान आणि भारताचे संबंध अतिशय चांगले आहेत. भूतानला एकावेळी जगभरातील अधिक पर्यटकही इथे नको आहेत. म्हणून त्यांनी कायद्यात अनेक तरतूदी केल्या आहेत. या देशाच्या मानवी जीवन पद्धतीबाबत स्वतःच्या संकल्पना आहेत. इथली माणसे कशी वागतात हे पाहून त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखे असल्याचे ते म्हणाले. महाराष्ट्रभरातून उपस्थित पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी यावेळी भूतानमधील लोकांचे सरासरी आयुर्मानआरोग्यसेवा,शिक्षणनिसर्ग आणि पर्यटन विकासभूतानची संस्कृतीमानवी जीवनपद्धतीपर्यावरण संरक्षण आणि संवर्धन कायदामहिलांविषयीच्या मुद्द्यानुरूप संवाद साधला. कोकणातील अभ्यासक धीरज वाटेकर यांनीही भूतानमधील लोकांचे सरासरी आयुर्मान आणि भूतानमधील वीज निर्मिती व गरज याबाबत भारताचे राजदूत जयदीप सरकार यांच्याशी संवाद साधला. यातील काही प्रश्नांची उत्तरे दूतावासातील उपस्थित वरिष्ठ अधिका-यांनी दिली. चहापानानंतर या कार्यक्रमाची सांगता झाली.

      संतांचे विचारतत्त्वज्ञान आपण प्रामाणिकपणे आचरणात आणले तर त्याचा किती सकारात्मक परिणाम जाणवतोयाचे सर्वोत्तम उदाहरण असलेल्या भूतानचाभगवान गौतम बुद्धांविषयीचा अधिक अभ्यास करण्याची संधी या पर्यावरण अभ्यास दौ-याने उपलब्ध करून दिली. भारत-भूतान बाॅर्डरवरील जाता-येतानाचे दोन मुक्कामपारो शहरातील दोन आणि राजधानी थिंफूतील तीन अशा सात मुक्कामी दिवसाततत्पूर्वी अभ्यासलेला भूतान समजून घेता आला.
आपल्याला असंख्य भारतीय महानुभावांनी मर्यादेचे पालन करण्याची शिकवण दिली आहे.

चिंटी चावल ले चलीबीच में मिल गई दाल।
कहै कबीर दो ना मिलैइक ले डाल॥

असे मार्मिक विवेचन संत कबीर यांनी केले आहे. विकल्प हे मानवी डोक्यात बिघाड निर्माण करतात. घेशील किती दोन करांनी अशी माणसाची अवस्था होते. या अगतिकतेला,आपली दोन्ही हातांनी गोळा करायची आसक्ती कारणीभूत आहे. निसर्गाने माणसाला दोन हात दिलेतते दोन्ही हातांनी गोळा करावे म्हणून नाहीततर एका हाताने घ्यावं आणि दुस-या हाताने द्यावंयासाठी आहेत. नुसतं घेत राहिल्याने असमतोल निर्माण होतो. मानवी जीवनातील अरिष्टास तो कारणीभूत ठरतो. गौतम बुद्धांच्या साहित्यात तृष्णा असा शब्दप्रयोग आला आहे. बुद्ध विचाराने जगणा-या भूतानी माणसाचं समाधान आणि आनंद या विचारधारेमुळे टिकून आहे. हिमालय पर्वताच्या दक्षिणेकडील उतारावर वसलेला भूतान नैसर्गिक सौंदर्यासाठीबौद्ध माॅनेस्ट्रीकिल्ले यांसाठी प्रसिद्ध आहे. ऑफबीट डेस्टिनेशन असल्याने हौशी आणि नवख्या पर्यटकांनी शक्यतो भूतानचा मार्ग धरूच नयेअसे आमचे प्रामाणिक मत बनले. समाधान फक्त पैसाच देऊ शकतोहा जागतिक सिध्दांत बाजूला ठेवित पैशांपेक्षाही माणसांना मोठे मानणाराआनंदी जीवन जगणारा हा ३८ हजार कि.मी. परिसराचा देश आम्हाला विशेष वाटला. नोव्हेंबर महिन्यात आमच्या भूतानमधील आठवड्याभराच्या वास्तव्यात सरासरी ३ ते ७°से. तापमान राहिले. जवळपास ३ हजार भूतानी कलाकृतींचा संग्रह असलेले भूतानचे राष्ट्रीय संग्रहालय पारो म्युझियमनिसर्गाच्या कुशीत वसलेला बौद्ध परंपरेचा वारसा असलेला पारो डिझाँगहिमालय पर्वतरांगांचा अद्भूत नजारा दाखवणारा चेलेला पासटायगर नेस्ट मॉनेस्ट्रीट्रॅफिक लाईटस नसलेली जगातील एकमेव राजधानी थिंफूप्राचीन राजधानी पुनाखा आदि प्राचीनता पाहिली. थिम्पू हेरिटेज म्युझियम ही भूतानमधील ३ मजली लाकडी संग्रहालय इमारततेथील पुरातन काळातील नूडल बनवण्याचे मशीनबिबट्याच्या कातड्याच्या पिशव्या आम्हाला विशेष वाटल्या. पर्यावरणासह शाळाशेतीस्वच्छ आणि तळ दाखवणा-या नद्यारंगीबेरंगी पक्षीवृक्षवेली आदि समजून घेण्याचा प्रयत्न केला. भारतीय शहरवासी डास येथे भेटला नाही. मुख्यपिक भातासह भाजीपाला शेती पाहिली. प्रामाणिकपणे काम करणारे कष्टाळू लोकइथल्या सरकारने DON'T LITTERING, we have solution stop pollution असे लावलेले बोर्ड पाहिले. नद्यांमध्ये कपडे धुणा-या स्त्रीयागाड्यागायी-म्हशी धुणारे आढळले नाहीत. सांडपाणी वाळूमार्गे नैसर्गिक प्रक्रिया करूनच नदीला सोडलेले दिसले. श्रमिकपणामर्यादित गरजांमुळे ढेरी सुटलेली पोटं दिसली नाहीत. राजधानी थिंफूमधील डाकगृहात जाऊन भारत आणि जपानमध्ये छापलेली काही भूतान सरकारची तिकिटे घेता आली. भूतानमध्ये नाण्यांचे महत्त्व संपलेय. एक रूपयाला काहीच मिळत नसल्याने रूपयाचे नाणे व नोट मिळत नाही. सुदैवाने सन १९७९ ची तीन नाणी आणि नोट मिळाली. पाकीट मारणेचोरीस्त्रीयांची छेडछाडअत्याचार हे प्रश्न येथे नाहीत. अनेक ठिकाणी घाटांच्या रस्त्यावरअगदी सुनसान जागी एकटय़ा बायका छोटे-मोठे सामान घेऊन विकायला बसलेल्या दिसल्या. मोफत शिक्षणऔषधोपचार समजून घेण्याचा प्रयत्न केला. रस्त्यावरील वाहतुकीचे कडक नियम अनुभवले. रस्त्यावर कचरा फेकलेला दिसला नाही. फक्त टायगर नेस्ट रस्त्यावर जिथे भरपूर पर्यटक भारतीय असतात. तिथे रस्त्यावर कचराकुंडय़ा ठेवलेल्या असूनही इतरत्र कचरा पाहिलानि आमच्या भारतीय जीवनशैलीच्या खुणा दिसल्याचा साक्षात्कार झाला. अखिल विश्वा ला आर्थिक महामंदीपासून वाचवायचे असेल तर सकल राष्ट्रीय उत्पादन (जीडीपी) पेक्षा सकल राष्ट्रीय समाधान (जीएनएच) अर्थनीती राबविण्याची गरज आहेअसे सांगण्याचा भूतान प्रयत्न करते आहे. नाममात्र प्रदूषणप्राणवायूचे अधिक प्रमाणमनाला उल्हसित करणारी हवा७० टक्के भाग जंगलांनी व्यापलेला असल्याने भूतानला कार्बन निगेटिव्ह देश म्हणतात. भूतानमध्ये २००८ पासून लोकशाही आहे. रस्त्यावर कुणाच्या वाढदिवसाचेकुठल्याशा नेता-कार्यकर्त्याचे तीनपाट पदावर नियुक्ती झाल्याचेविशेषणांचा पाऊस पाडणारे एकही होर्डिग बघायला मिळाले नाही. कायदा पाळलाच पाहिजेअशी मानसिकता जाणवली. येथे लोक राजाला मनापासून मानतात. त्यामुळे बहुतेक दुकानांमध्ये,हॉटेलांमध्ये राजाचा छोटा-मोठा फोटोबॅनर हमखास दिसले. हा समृद्ध भूतान अनुभवताना आम्हाला पुण्याच्या सुप्रसिद्ध श्रीचंडिका ट्रॅव्हल्सच्या श्री. व सौ. राणी धनेश सरदेसाई यांची साथ राहिली.

      ज्येष्ठ समाजसेवकपद्मभूषण अण्णा हजारे यांच्या अध्यक्षतेखालीदरवर्षी निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंड़ळ महाराष्ट्र’ या संस्थेच्या वतीने आयोजित या संमेलनाच्या समारोपप्रसंगी पर्यावरण संवर्धन हा जागतिक आणि प्रत्यक्ष काम करण्याचा विषय असल्याचे प्रतिपादन अण्णा हजारे यांनी केले. आपल्या भाषणात बोलताना हजारे यांनीटाकाऊ पासून टिकाऊ निर्माण करण्याचा संकल्प करण्याचेविषयाची आसक्ती कमी करण्याचे आवाहन सर्वांना केले. जगभरात प्रदूषणामुळे आजारतापमानसमुद्रपातळी वाढतेयहिमनद्या वितळताहेत. त्यामुळे याविषयात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची जबाबदारी मोठी असल्याचे ते म्हणाले. समारोप प्रसंगी व्यासपीठावर मंडळाचे अध्यक्ष वृक्षमित्र आबासाहेब मोरेवखार महामंडळाचे महाव्यवस्थापक विजयकुमार ठुबेसी.ए. राज देशमुखसुभाष डांगे होते.

      हा विदेश अभ्यास दौरा करताना सर्वांना जागतिक ऑफबीट डेस्टीनेशन असलेल्या भूतान समजून घेता आले. भूतानची ओळखआंतरराष्ट्रीय महत्त्व असलेला टायगर नेस्ट चा ट्रेक यशस्वी करता आला. सर्वात महत्वाचे म्हणजे आबासाहेब मोरे यांच्या नेतृत्वाखाली भूतान मधील भारताचे राजदूत मा. जयदीप सरकार यांच्याशी राजधानी थिंफू येथील भारतीय दूतावासात भूतान पर्यावरण व संस्कृती संदर्भातील विविध मुद्दयानुरूप संवाद साधण्याची संधी मिळाली. एकूणात भूतान देशाची ओळख करून देण्यात हा दौरा यशस्वी ठरला. पुढील आयुष्यात भूतानमध्ये अधिकचे काय पाहायला हवे याची पक्की जाणीव करून घेत अत्यंत जड अंतःकरणानेजंगल नदी की माँ होती है हे तत्त्व शब्दशः जगत या विस्मयकारक भूमीतून सर्वजण महाराष्ट्रात परतले.

ओम नमो बुद्धाय !

धीरज वाटेकर
मो. +919860360948


टायगर नेस्ट 

पारो विमानतळ 

पुनाखा : पोचू मोचू नद्यांचा संगम 

पुनाखा पॅलेस 


आस्थेवाईक गुरुजींची सेवानिवृत्ती

        एकविसाव्या शतकाच्या प्रारंभीची घटना. चिपळूण जवळच्या एका तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सकाळी साडेदहा वाजता भरणाऱ्या शाळेत जाण्यासाठी ...