गुरुवार, ६ डिसेंबर, २०१८

आव्हानमायेच्या निमित्ताने...

        नामवंत बहुआयामी लेखकआमचे मार्गदर्शक आदरणीय सुमेध वडावाला (मृत्युंजय श्रीकृष्ण रिसबूड) सरांच्या सात पुस्तकांच्या नव्या आवृत्त्यांच्या प्रकाशनाचा कार्यक्रम नुकताच कोकणातील खेड शहरातील तटकरी सभागृहात संपन्न झाला. साधारणतः तीनेक महिन्यांपूर्वी सुमेध सरांनी फोन करून, ‘दोन डिसेंबर तारीख रिकामी ठेवा. माझ्या खेडमधील एका कार्यक्रमासाठी तुम्हाला यायचे आहे’, अशी स्पष्ट सूचना केली होती. एकाच वेळी एकाच लेखकाच्या सात पुस्तकांच्या नव्या आवृत्यांचा मराठी साहित्य विश्वातील दुर्मीळ प्रकाशन सोहोळा, पुस्तकांवर कोणीही काहीही बोलायचे नाही हा सर्व वक्त्यांना घालून दिलेला शिरस्ता आणि व्यक्त होण्यासाठी दिलेला ‘आव्हानमाया’ हा अनोखा विषय यांमुळे हा कार्यक्रम सर्वार्थाने वेगळा ठरला. या कार्यक्रमासाठी आम्हाला (धीरज वाटेकर) आमचे सहकारी निसर्ग प्रकाशनाचे सल्लागार विलास महाडीक यांच्यासह उपस्थित राहाता आले. त्या ‘आव्हानमाया’ कार्यक्रमाच्या निमित्ताने...

      ‘आव्हानमाया’ कार्यक्रमाने शीर्षकापासून संपेतोपर्यंत आपला वेगळेपणा कायम ठेवला. एकीकडे जागतिकीकरणामुळे मानवी जीवन जगण्याचा वेग प्रचंड वाढला आहे. आज प्रत्येक क्षेत्रात जागतिकीकरणाने प्रवेश केला आहे. त्यातून अनेक नवी आव्हाने निर्माण झाली आहेत. ग्रामीण भागातील तरूणांपुढे शिक्षण घेतानाच कौटुंबिक कामाला हातभार लावत स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे आव्हान खडतर आहे. बहुसंख्य तरूण उच्चशिक्षण घेऊनही नोकरीच्या शोधात सर्वत्र वणवण फिरत आहेत. नोकरी नसल्याने कुटुंबाच्या उदरनिर्वाहाबरोबर स्वतःचे कसे होणार हा प्रश्न अनुत्तरीत आहे. नोकऱ्या मिळत नसल्याने गुन्हय़ांमध्ये तरूणांची संख्या वाढते आहे. उदरनिर्वाहासाठी नेमके करायचे तरी काय ? या मन:स्थितीतील अनेकजण सध्या तणावग्रस्त आयुष्य जगताना दिसत आहेत. अविचार आत्मघाताला प्रवृत्त करतो. आयुष्याचा अर्थ समजून घेऊन जगणे सुंदर करावेअसे संस्कार दुर्मीळ होत चालल्याने जगण्याची मौज आणि त्याच्या संकल्पनाही संकुचित होत चालल्याने तरुणाईचा अविचारीपणा फोफावल्याची खंत अनेकदा जाणत्या पिढीकडून व्यक्त होताना दिसते. आज क्षणाचा शाश्वतपणा पुरता हरवला आहे. मुंबईसारख्या महानगरातक्षणाक्षणाला समोर आव्हाने उभी असतातयाची प्रत्येकाला पुरेपूर जाणीव असते. या आव्हानांचा  मुकाबला करण्यासाठी संयम आणि विवेकाची गरज असतानाअविचार आणि अविवेकाचेच मार्ग प्रभावी ठरू लागल्याचे चिंताजनक वास्तवही अलीकडे बळावत चालले आहे. अर्थात जगण्याचे संदर्भच बदलत असताना ‘आव्हानामाया’ हा विषय पुढे आला, हे महत्त्वाचे ! जगण्याचे वर्तमानकालीन संदर्भ बदलत अविचारी साहसवृत्तीला आयुष्याचा, जगण्याचा अर्थ समजावण्याचे मार्गदर्शन आव्हानमायेत मिळाले.

      सुमेध वडावाला हे मूळचे कोकणातल्या खेड गावचे रहिवासी. व्यवसायानिमित्ताने पुढे ते मुंबईत स्थिरावले. त्यांनी खेड परिसरातील आपले निवडक कौटुंबिक सदस्यनातेवाईकहितचिंतकत्यांच्या लेखनावर प्रेम करणाऱ्या सुमारे सव्वाशे साहित्यप्रेमींना या अनोख्या सोहोळ्यासाठी निमंत्रित केले होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षचिपळूणच्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराचे कार्याध्यक्ष प्रकाश देशपांडेज्ञानदीप शिक्षण संस्थेचे सरचिटणीस प्रकाश गुजराथीखेडच्या माजी नगराध्यक्षा वैशाली कवळेडॉ. उपेंद्र तलाठीविलास बुटाला आदि मान्यवर उपस्थित साहित्य रसिकांसमोर ‘आव्हानमाया’ विषयानुरूप व्यक्त होते झाले. यातून जे विचार सर्वांसमोर आले ते ऐकून उपस्थितांना थक्क व्हायला झालं. सर्वच मान्यवरांनी हातचं न राखता मनातलं हृदयस्थ खुलं केल्याने वक्त्यांच्या आयुष्यातील ही अनुभवांचीआव्हानांची मांडणी सा-यांनाच भावली. या पुस्तकांचे प्रकाशक सुकृत प्रकाशनचे अमर कदमविघ्नेश ग्रंथ भांडार कणकवलीचे विघ्नेश गोखले यांनी हा कार्यक्रम खेडला घडविला याबद्दल सूत्रसंचालनकर्ते उत्तमकुमार जैन यांनी त्यांच्याप्रति आणि उपस्थितीबाबत सर्व मान्यवरांप्रति कृतज्ञता व्यक्त केली. ‘वीर माणसाचा पोवाडा वीर माणसाने गावा, आणि तशानींच तो ऐकावा’. अशा स्वरूपाचा हा कार्यक्रम असल्याचे जैन यांनी नमूद केले. व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते सात पुस्तकांचे प्रकाशन झाले.

      ९ आत्मकथा, ८ कथासंग्रह, ७ कादंबऱ्या, ३ ललितसंग्रह, १ प्रवासवर्णन आदि प्रकारातील राजहंस, मॅजेस्टिक, मेहता, ग्रंथाली अशा प्रतिष्ठित प्रकाशकांनी प्रकाशित केलेली २८ पुस्तके सुमेध सरांच्या नावावर आहेत. जवळपास सर्वच पुस्तकांच्या २ ते ८ आवृत्याही निघाल्यात. सन १९९२ पासून २०१६ पर्यंत महाराष्ट्र शासनासह १७ पुरस्कार त्यांच्या पुस्तकांना मिळालेत. कादंब-याकथासंग्रहललितलेखन आदि उदंड लेखन करत सुमेध वडावाला (रिसबूड) हे नाव पुढे आत्मकथा / चरित्र या साहित्य प्रकारात स्थिरावले आणि अधिक प्रसिद्ध झाले. अनेक सामान्य माणसांच्या असामान्य जीवनप्रवासास वडावालांची शैली लाभल्याने ती पुस्तके वाचकवर्गाने हमखास उचलून धरली, हा आजवरचा अनुभव आहे. ‘वडावाला’ या त्यांच्या नावामागेही एक गंमत आहे. खेडला नारिंगी नदीच्या किनाऱ्यावरील जुन्या घरात त्यांचे बालपण गेलेले आहे. सन १९६२ साली कोकणातल्या सुशिक्षित घरात जन्मलेल्या (११ एप्रिल) सुमेध सर कोकणातील सुरुवातीच्या वास्तव्यानंतर पुढे विलेपार्ल्यात मामांकडे आले. सन १९८३ मध्ये नोकरी निमित्ताने माझगाव डॉक मध्ये स्थिरावल्यानंतर सायंकाळच्या फावल्या वेळेत विलेपार्ले येथे त्यांनी आपल्या जवळच्या व्यक्तीच्या वडापावच्या गाडीवर उभे राहण्यास सुरुवात केली होती. दरम्यान कथालेखन सुरूच होते. मात्र अनेकदा लेखन मूळ नावाने छापले जात नव्हते, लिखाण परत येई. नावामुळे असे होतेय की काय असे त्यांना वाटू लागले. इकडे सायंकाळी वडापावच्या गाडीवर त्यांना सहजतेने कोणीही ग्राहक हाक मारताना 'वडावाला' म्हणून संबोधित असे. एकदा सहज म्हणून त्यांनी ‘वडावाला’ हा शब्द वापरून लेखन करायला सुरुवात केली आणि त्यांची कथा साप्ताहिक सकाळ ने स्वीकारली. तेव्हापासून ‘सुमेध वडावाला’ हे नाव प्रसिद्धीस आले. त्यांच्यालेखनाचे विषय आणि मांडणी एवढी वेगळी कीविज्ञानलेखक निरंजन घाटे यांनी त्यांच्यासाठी मोठ्या प्रकाशकांकडे शब्द टाकला. सांजवा’ कथासंग्रह निघाला. पुस्तके यायला सुरुवात झाली. सन २०१३ साली चिपळूणच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सुमेध सर जन्मांध मनश्रीची मुलाखत घेत होते. मुख्य मंडप हाऊसफुल्ल झाला होता. गाण्यात प्रावीण्य मिळवलेली‘बालश्री’ने सन्मानित मनश्री तेव्हा कॉलेजमध्ये होती. दृष्टिहीनत्वामुळे बिकट झालेला प्रवास ती उलगडत होती. ‘बालश्री’ प्रदान सोहळ्यात राष्ट्रपती अब्दुल कलाम यांनी कौतुकानं विचारलं होतं, ‘‘कब आओगी मनश्री हमें वापस मिलने ?’’ त्यावेळी तिनं उत्स्फूर्तपणे सांगितलं होतंआज बालश्री स्वीकारने आयी हूँभविष्य में पद्मश्री’ लेने के लिये आ जाऊंगी’. त्या दुर्दम्य आत्मविश्वासदर्शी गप्पा अनेकांसोबत तेव्हा आम्हीही ऐकल्या होत्या. सुमेध वडावालांना त्यावेळी मिळालेलं ‘स्टँडिंग ओव्हेशन’ हा आम्हाला सर्वोत्तम पुरस्कार वाटला. या मनश्रीची आत्मकथाही त्यांनीच लिहिली. ही मनश्री’ लिहिताना पहाटे जाग आल्यावरच्या अंधारात आपण आंधळे असल्याचा भास सुमेध सरांना व्हायचा. अशा समरसतेमुळेच त्यांच्या आत्मकथा जीवंत झाल्या. पुढे वाचकांनाही तीच प्रचीती आली. राष्ट्रपतींसोबतच्या मनश्रीच्या संवादाची सरांनी या कार्यक्रमात आठवण करून दिली. 
   
     

                   प्रकाशक विघ्नेश गोखले आणि अमर कदम यांनी सुमेध वडावाला हे आमचे मार्गदर्शक असल्याचे सांगून ‘आम्हाला ग्राहक नको वाचक हवायं’, असे आवर्जून नमूद केले. प्रकाश गुजराथी यांनी बोलताना रिसबूड सरांचे चिरंजीव असा उल्लेख करून खेडची ‘माया’ व्यक्त केली. अनेकविध पुरस्कारांचे धनीखेडचा साहित्यिक असा सुमेध यांचा उल्लेख करून आपल्याला शिक्षणसंस्था चालवताना आलेल्या आव्हानांबाबत त्यांनी अनुभव सांगितले. कुटुंब चालवताना आवश्यक असलेले समाजभानआयुष्यात घेतलेला निर्णय चुकीचा ठरू न देता तो सिद्ध करण्याची आपल्यावर येणारी जबाबदारीकोणत्याही कामाला नकार न देणे आदि बाबींचा उहापोह त्यांनी केला. रिसबूड यांचे ‘अष्टावधान’ हे पुस्तक ज्यांच्या अनुभवांवर आधारित आहे त्या डॉ. उपेंद्र तलाठी यांनी सहज आव्हाने पेलणारे आव्हानमाया जगतात असे सांगून आयुष्यातील वैद्यकीय आणि सामाजिक जीवनातील काही किस्से सांगितले. योगायोगाने नगराध्यक्ष झालेल्या वैशाली कवळे यांनी बोलताना आपल्या कारकिर्दीतील आठवणी सांगितल्या. एक हाती सत्तेचा सामाजिक उपयोग करण्याच्या प्रयत्नात असूनही त्यांचा प्रत्येक दिवस समस्या घेऊन उजडायचा आणि मावळायचा. नगराध्यक्ष झाल्या तरीही त्यांच्यातला शिक्षक जीवंत असल्याने त्याचा सभेत काय परिणाम व्हायचा हे सांगितल्यावर सारे हास्यात बुडाले. कोट्यावधी रूपये गटारात का घालवता हा प्रश्न पुढे करून भुयारी गटार योजना बाबतचे अनुभव सांगितले. कार्यक्रमाध्यक्ष प्रकाश देशपांडे यांनी आव्हानाशिवाय जगणं अशक्य असल्याचे सांगितले. कोमसापचे पहिले साहित्य संमेलनकवी माधवांची जन्मशताब्दीजितेंद्र अभिषेकी यांचे नाट्यसंमेलनाध्यक्ष होणेआशा भोसले यांचे संमेलनाला येणे आदिंसह सन २०१३ साली चिपळूणात झालेल्या ८६ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनातील आव्हानांचा वृत्तांतही अत्यंत खुबीने मांडला. यावेळी चिपळूणच्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराचे अध्यक्ष अरुण इंगवले, डॉ. यतीन जाधव, डॉ. रेखा देशपांडे उपस्थित होत्या.

      झापडबंद राहू नका’, असा संदेश देणारे, प्रेरणादायीवैविध्यपूर्ण आणि वाचताना भान हरपायला लावणारं लेखन करणारे लेखक म्हणून सुमेध सरांचे लेखन आम्हालाही आवडते. बदलत्या नीतिमत्तेचा वेध घेणारी, केवळ संवादांतून साकारलेली धर्मयुद्ध’ ही त्यांची कादंबरी लक्षणीय आहे. अनुभवंतीआई ती आईचकाही काही माणसं!चित्रंतृष्णादोन चाकं झपाटलेलीथोरवीप्रदीप लोखंडेब्रह्मकमळमनश्रीमी नंदाजल आक्रमिलेसंदर्भासहित स्पष्टीकरणसफाईसांजवाहेडहंटरअशी त्यांची जवळपास सर्वच पुस्तके गाजलेली आहेत. या कार्यक्रमात मराठी साहित्य विश्वात एकाच लेखकाच्या सात पुस्तकांच्या नव्या आवृत्त्यांचे एकाच वेळी प्रकाशन होण्याची दुर्मीळ घटना घडत असताना स्वतः लेखक वडावाला यांनी व्यासपीठावरील मान्यवरांना ‘माझ्या पुस्तकांवर कोणीही बोलायचे नाही’, असे स्पष्ट केले होते. सर्वांना सुग्रास भोजन आणि सुमेध सरांच्या स्वाक्षरीसह मिळालेल्या पुस्तकभेटीने कार्यक्रमाचा समारोप झाला. समारोपापूर्वी व्यासपीठावरून बोलताना वडावाला यांनी लेखनानेच आपले आयुष्य समृद्ध झाल्याचे सांगितले. पुस्तकांच्या माध्यमातून दुस-यांचे आयुष्य रेखाटताना ते काही काळ जगायला मिळाल्याचेही त्यांनी नमूद केले. अखेरीस लेखक असण्याचे खूप फायदे असल्याचे सांगून लेखनाबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

धीरज वाटेकर

‘विधीलिखित’, १२६३-ब, कांगणेवाडी रोड, खेण्ड, चिपळूण ४१५६०५, जि. रत्नागिरी.     
मो. ९८६०३६०९४८

dheerajwatekar@gmail.com

(धीरज वाटेकर हे पर्यटन आणि चरित्र लेखन’ या विषयावरील प्रकाशित आठ पुस्तकांचे लेखक असून कोकण इतिहास, पर्यटन, पर्यावरणविषयक, सामाजिक जागृतीपर विषयात गेली १८ वर्षे कार्यरत पत्रकार आहेत.)

गुरुवार, २९ नोव्हेंबर, २०१८

वृक्षमित्र आबासाहेब मोरे आयोजित ‘भूतान पर्यावरण अभ्यास दौरा’

     
        निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ आणि महाराष्ट्र शासन प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तिसरे पर्यावरण सम्मेलन आणि भूतान निसर्ग व पर्यावरण अभ्यास दौरा नुकताच दिनांक १० ते २० नोव्हेंबर दरम्यान संपन्न झाला. महाराष्ट्रातील सहभागी ७८ पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी मंडळाचे अध्यक्ष वृक्षमित्र आबासाहेब मोरे यांच्या नेतृत्वाखाली हा दौरा यशस्वी केला. भूतान मधील भारताचे राजदूत जयदीप सरकार यांची राजधानी थिंफू येथील भारतीय दूतावासात भेट घेऊन त्याच्यांशी भूतान पर्यावरण व संस्कृती संदर्भातील विविध मुद्दयानुरूप संवाद साधण्याची  सर्वाना मिलालेली संधी या पर्यावरण अभ्यास दौऱ्याचे मोठे फलित म्हणावे लागेल.

      कुझोझाम्पुला म्हणजे भूतानच्या झोन्खा भाषेत नमस्कारगुड मॉर्निंग वगैरे हे आम्हाला तिथे गेल्यावर समजले. भूतान भू-उत्थान असा अर्थ होतो. येथे १ गुल्ट्रम = १ रुपया असा चलनाचा समसमान दर आहे. भूतान धूम्रपान बंदी करणारे ते जगातील पहिले राष्ट्र आहे. ताकिन हा भूतानचा राष्ट्रीय प्राणी आहे. राष्ट्रीय आणि सर्वात लोकप्रिय खेळ तिरंदाजी आहे. ३८३९४ चौ.कि.मी. पसरलेला भूतानफक्त १० लाख लोकसंख्याउतरेकडे २४००० फुट हिमशिखरापासून दक्षिणेकडील समुद्र सपाटीपासून ४५० फुट उंचीवर सपाट जमिनीवरील दाट जंगलापर्यंत पसरला आहे. ह्या देशात ५४०० प्रकारच्या विविध वनस्पती७०० हून अधिक पक्षी६०० पेक्षा अधिक प्रकार असलेले ऑरचीड४६ पेक्षा अधिक प्रकारचे Rhododendrons (गुलाबाचा एक प्रकार) आणि ३०० हून अधिक प्रकारच्या हर्बल वनस्पती (ज्याचा आयुर्वेदिक औषधासाठी उपयोग होतो ) दिसून येतात. २३००० फुट उंचीहून अधिक असणारी २० हिमशिखरे असलेला हिमालय ह्या देशाच्या उत्तरेला आहे. भूतानला पर्यटक पक्षी निरीक्षणासाठी अधिक येतात. आम्हीही काही पक्षी पहिले. भूतानमध्ये पुरुष गुडघाभर लांबीचा घो” नावाचा रोब सारखा पोशाख घालतात. स्त्रिया तळपायाच्या लांबीपर्यंतचा किरा” नावाचा पोशाख घालतात. विविध रंगाच्या मफलरी आणि स्कार्फ वापरतात. भूतानच्या एकूण १० लाखपैकी २ लाख राजधानी थीम्पू मध्ये रहातात. ही जगातली एकमेव राजधानी आहे जिथे ट्रॅफिक सिग्नल्स नाहीत. हा भारताच्या पूर्वेकडील भागपहाडी प्रदेश असल्यामुळे येथे लवकर अंधार होतो. "ओम मणि पद्मे हुम" या मंत्राच्या त्रिकोणी पताका आपल्याला देशभर सर्वत्र दिसतात.


      या देशातून फिरताना सर्वांनी येथील लोकांची आनंदी जीवनशैली अनुभवली. शेजारचा अस्वच्छ जयगाव आणि स्वच्छ फुटशोलिंग येथेच त्या देशाची ओळख सर्वांना पटली. येथे तंबाखू विक्रीला, उघडयावर शौचास बंदी आहे. तेथील महामार्गावर जागोजागी शौचालय आहेत. चोरीचे कमी प्रमाण, नाल्यात, गटारात कचरा न टाकण्याची मानसिकता, स्मशानभूमीला चारही बाजूने असलेल्या सीमाभिंती, अस्वच्छता करणाऱ्यावर होणारी पोलिस कारवाई असे अनेक मुद्दे वेगळे भासले. भूतान मधील रस्ते आपले भारतीय आभियंते तयार करतात. हे रस्ते खड्डे विरहित अवस्थेत किमान ७ - ८ वर्षे टिकतात. डोंगर उतरावर सेंद्रीयशेती केली जाते. येथे ध्वनी प्रदूषण नाही. हॉर्न वाजविण्यास बंदी आहे. येथे रस्त्यावर सिग्नल नाही. वाहतुकीला शिस्त आहे. रस्ता ओलंडताना झेब्राक्रॉसिंग वरुनच जावे लागतें. मनुष्य रस्ता ओलांडित असताना सर्व वाहने थांबतात. येथे वाहनाला गतीचे बंधन आहे. हवा, पाणी, जमीन, प्रदूषित होऊ नये याचे नियम कडक आहेत. येथे इमारतीला लाकूड मोठ्या प्रमाणात वापरतात. कोठेही स्टिकरफ्लेक्स जाहिराती दिसत नाहीत. मंत्री, पुढारी यांच्या वाढदिवस, शुभेच्छा आदि फलक नाहीत. लोक राजाला खूप मानतात. त्याबाबतचे फलक मात्र दिसतात. सद्यास्थितीत हा देश पर्यटन व्यवसायावर अवलंबून आहे. भूतान देश शिक्षण, संस्कृती, स्वच्छताशिस्त, तेथील नागरिकांचे त्यांचा देश, राजाविषयीचे प्रेम, पर्यावरणसेंद्रियशेती याबाबतीत वेगळा आहे. गच्च भरलेला निसर्ग, महिला-पुरुष वर्गाचे कष्ट, चेहऱ्यावरील आनंद कौतुकास्पद वाटला. भूतान पर्यावरण संवर्धन बाबतीत जगात अग्रेसर आहे. भूतान देशात पर्यवारणाचा अभ्यास करताना या देशातील शिक्षण कसे आहे ? याचीही माहिती सर्वांनी घेतली. त्यासाठी परिसरातील, गावातील विविध शिक्षक, नागरिक, पालक, विद्यार्थी यांच्याशी चर्चा करण्यात आली. सर्वांनी भूतान देशातील पुनाखा शहराजवळील पोचू-मोचू नदीच्या संगमजवळ एका सरकारी शाळेला भेट दिली. या शाळेचा परिसर खूपच स्वच्छ, सुंदर, निसर्गरम्य व आकर्षक दिसला. शाळेची इमारत भव्य, सुसज्ज होती. विशेष म्हणजे शाळेत जैवविविधतेने संपन्न गार्डन होती. भूतानमध्ये १०-१२ वीपर्यंत  मोफत आणि सक्तीचे शिक्षण आहे. येथे बहुतेक सर्व शैक्षणिक साहित्य मोफत मिळते. शाळेचा अभ्यासक्रम भूतान देश व इतर जगाची माहीती यावर आधारित आहे. येथे इयत्ता पहिलीपूर्वी प्री-प्रायमरी शिक्षण आवश्यक आहे. वर्गातील विद्यार्थी संख्या ३२-४० आहे. येथील प्रत्येक विषयाचा पर्यावरणाशी संबंध जोडलेला आहे, पर्यावरण हा विषय स्वतंत्र सक्तीचा आहे. वर्षातून २ वेळा परीक्षा होते. वर्गात ग्रीनबोर्ड, विविध खेळ, संगणक वापर, ई-लर्निग, तंत्रस्नेही पद्धत वापरली जाते. शिक्षकदिन मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. शिक्षकांच्या बदल्या त्यांच्या विनंतीनुसार होतात. विद्यार्थी सहलीला गेले तर छोटी डस्टबिन सोबत नेतात. शेतीत भात हे मुख्यपीक घेतले जाते. भाजीपाल्यामध्ये बटाटे, टोमॅटो, मिरची, कांदे, भोपाळाकोबी, फ्लॉवर अशी पीके घेतली जातात. येथे कोणीही रस्त्यावर कचरा टाकत नाहीत. रस्त्यावर सरकारने dont littering असे बोर्ड लावलेले आहेत. जंगल ७०% आहे. पारोपोचू, मोचू आदी सर्व नद्यांचे पाणी स्वच्छ आहे. नदीत कचरा दिसत नाही. नद्यांना  सरंक्षक भिंती बांधलेल्या आहेत. नदीमध्ये कपडे,  जनावरे, गाडया धुतल्या जात नाहीत. येथे कोठेही सांडपाणी डबकी दिसत नाहीत. त्यामुळे डासांचे प्रमाण नगण्य आहे. भूतानमध्ये कोठेही फोटो काढला असता अत्यंत सुंदर फोटो येतो. भूतानी निसर्गाला देव मानतात, त्याची पूजा करतात. दाट उंचाल्या वृक्षांच्या जंगलातून जाणारे वळणावळणाचे रस्ते, दुपारच्या वेळीही झोंबणारी थंड हवा, चहूबाजूंनी दिसणारी हिमालयाची उंच उंच शिखरे, खोल दऱ्या सर्वाना मोहवून टाकतात.

      भूतानची जागतिक ओळख असलेले टायगर नेस्ट मॉनेस्ट्री (तक्तसांग मठ - Taktsang Monastery) हे पारो घाटीतील सर्वात पवित्र आणि अद्भुत बौद्ध ठिकाण आहे. ही मॉनेस्ट्री समुद्र सपाटीपासून ३१२० मीटर उंच पर्वतावर एका कड्यात अत्यंत कल्पकतेने बांधलेली आहे. सन १६९२ मध्ये उभारणी झालेल्या मॉनेस्ट्रीचा सन १९९८ मध्ये जीर्णोद्धार करण्यात आला आहे. हे बौद्ध भिक्षूंचे वास्तव्याचे विशेष ठिकाण आहे. मॉनेस्ट्रीच्या परिसरात भूतानची अद्भुत कला पाहाता येते. या उंच धार्मिक स्थळावर पोहोचण्यासाठी पगडंडीनुमा मार्गे पायी चालत (ट्रेकींग) जावे लागते. पारो शहरापासून हे ट्रेकिंगचे ठिकाण १२ किमी आहे. रस्त्यात काही ठिकाणाहून टाइगर नेस्ट दिसते तेव्हा तिथपर्यंत पोहोचणे अशक्यप्राय वाटते. आम्ही ग्रुपमधील ५ जणांनी सकाळी ८ ते सायंकाळी ४ या वेळेत हा ट्रेक पूर्ण केला. या वेळेत परिसरात सरासरी ६°से. तापमान होते. सुरुवातीला छोटा पटरी बाजार आहे. सुरुवातीच्या प्रवासात झ-याच्या पाण्याच्या मदतीने गोल फिरणारे बौद्ध प्रार्थना चक्र पाहून विशेष वाटते. रस्त्यात काही ठिकाणी पिण्यासाठी झ-याचे पाणी आहे. या ट्रेकिंगचा पहिला टप्पा पूर्ण होतो तेथे खानपान व्यवस्था पुरविणारा एक कॅफेटेरिया आहे. पहिल्यासह पुढील दोनही ट्रेकिंगचे टप्पे आपले ट्रेकिंगचे कसाब पणाला लावायला लावतात. सायप्रस वृक्षांच्या दाटीवाटीतून आकाशाच्या दिशेने जाणारी वाट आपल्याला चांगलीच दमवते. अर्धे अंतर पार केल्यावर प्लास्टिकच्या बाटल्यांपासून बनलेले प्रार्थना चक्र लक्ष वेधून घेते. अति उंची (हाय अल्टिट्यूड)विरळ हवाथंडी आणि खडी चढण यांचा सामना करीत लवकर दमछाक होणाऱा हा प्रवास करावा लागतो. अगदी शेवटच्या टप्प्यात आपल्याला समोर मॉनेस्ट्री दिसत राहते मात्र ती पलिकडच्या डोंगरावरील कड्यात असल्याने फूटभर उंचीच्या ४०० उतरून पुन्हा ३०० पाय-या चढण्याची कसरत करूनच मॉनेस्ट्रीत पोहोचता येते. या मार्गावर पवित्र मानला गेलेला एक सुंदर धबधबाबौद्ध धर्मात पवित्र मानल्या जाणा-या मंत्र लिहिलेल्या रंगीबेरंगी कापडी पताका लक्ष वेधून घेतात. येथून समोर पारो घाटीचे सौंदर्य तर डावीकडे कड्याला बिलगलेली ताकसांग मॉनेस्ट्रीडोळे मिटताक्षणी ध्यान लागावे इतकी शांतता अनुभवून मानवी मन वेडं होऊन जातं. एकूण ट्रेकिंगचे जाता-येता अंतर ११ किलोमीटर आहे. रंगीबेरंगी पक्षीवनराई यांनी युक्त असलेल्या या ठिकाणी कायम थंडी जाणवली. माॅनेस्ट्रीत फोटोग्राफीला परवानगी नाही. तेथे धबधबा वगळता सहसा कोणताही आवाज येत नाही. माॅनेस्ट्री चार मुख्य भागात विभागली आहे. या मॉनेस्ट्रीबद्दल काही आख्यायिका आहेत. बौद्ध वज्रयान पंथाचे गुरू पद्मसंभवा हे वाघिणीवर स्वार होऊन येथे गुहेत आले. त्यांनी येथे खडतर तपश्चर्या केली होती. गुरू पद्मसंभवा वाघिणीवरून ज्या गुहेतून या भागात आले त्या गुहेत उतरल्यावर एका अवचित क्षणी हृदयावर प्रचंड दबाव आलेला जाणवला. कारण सुमारे १० हजार फूट उंचीवर दोन मोठाल्या दगडांच्या कपारीत अरूंद मार्गाने खोल दरीत शिरून पारो घाटीचा नजारा आणि टायगर नेस्ट पाहिल्याचा तो क्षण आम्ही जन्मभर विसरू शकणार नाही. हा सारा वारसा समजून घेतल्यावर आम्ही भगवान गौतम बुद्धांपुढे नतमस्तक झालो. या ट्रेकला आमच्यासोबत (धीरज वाटेकर) पर्यावरणवादी चळवळीतील आमचे सहकारी विलास महाडिकमहाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ बालभारती पुणेचे सदस्य बाळासाहेब चोपडे (पलूस-सांगली)गुरूवर्य प्राथमिक शिक्षक मार्गदर्शक पुस्तिकेचे उपसंपादक- शिक्षक तुकाराम अडसूळ (पारनेर-अहमदनगर) आणि मुक्त पत्रकार संतोष दिवे (संगमनेर-अहमदनगर) सोबत होते.

      भूतान निसर्ग व पर्यावरण अभ्यास दौ-यांतर्गत महाराष्ट्रातील सहभागी ७८ पर्यावरणवादी कार्यकर्त्यांना मंडळाचे अध्यक्ष वृक्षमित्र आबासाहेब मोरे यांच्या नेतृत्वाखाली सी. ए. राज देशमुख आणि सुशांत जवक यांच्या माध्यमातून भूतान मधील भारताचे राजदूत जयदीप सरकार यांची राजधानी थिंफू येथील भारतीय दूतावासात भेट घेण्याची संधी मिळाली. पर्यावरण अभ्यास दौ-यांतर्गत भूतानला आलेल्या महाराष्ट्रातील सर्व कार्यकर्त्यांचे भारतीय दूतावासातर्फे भेटीचे निमंत्रण स्वीकारल्यानंतर दूतावासात एक विशेष कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर आबासाहेब मोरेदूतावासातील वरिष्ठ अधिकारी इशा श्रीवास्तवसमीर अकोलकर उपस्थित होते. मोरे यांनी भारताचे राजदूत जयदीप सरकार यांचा विशेषांक देऊन विशेष सन्मान केला आणि आपल्या मनोगतात संवाद भेटीचे निमंत्रण स्वीकारल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी बोलताना जयदीप सरकार यांनी भूतानच्या आनंदी देश असण्यामागील रहस्य सर्वांना उलगडून सांगितले. भूतान आणि भारताचे संबंध अतिशय चांगले आहेत. भूतानला एकावेळी जगभरातील अधिक पर्यटकही इथे नको आहेत. म्हणून त्यांनी कायद्यात अनेक तरतूदी केल्या आहेत. या देशाच्या मानवी जीवन पद्धतीबाबत स्वतःच्या संकल्पना आहेत. इथली माणसे कशी वागतात हे पाहून त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखे असल्याचे ते म्हणाले. महाराष्ट्रभरातून उपस्थित पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी यावेळी भूतानमधील लोकांचे सरासरी आयुर्मानआरोग्यसेवा,शिक्षणनिसर्ग आणि पर्यटन विकासभूतानची संस्कृतीमानवी जीवनपद्धतीपर्यावरण संरक्षण आणि संवर्धन कायदामहिलांविषयीच्या मुद्द्यानुरूप संवाद साधला. कोकणातील अभ्यासक धीरज वाटेकर यांनीही भूतानमधील लोकांचे सरासरी आयुर्मान आणि भूतानमधील वीज निर्मिती व गरज याबाबत भारताचे राजदूत जयदीप सरकार यांच्याशी संवाद साधला. यातील काही प्रश्नांची उत्तरे दूतावासातील उपस्थित वरिष्ठ अधिका-यांनी दिली. चहापानानंतर या कार्यक्रमाची सांगता झाली.

      संतांचे विचारतत्त्वज्ञान आपण प्रामाणिकपणे आचरणात आणले तर त्याचा किती सकारात्मक परिणाम जाणवतोयाचे सर्वोत्तम उदाहरण असलेल्या भूतानचाभगवान गौतम बुद्धांविषयीचा अधिक अभ्यास करण्याची संधी या पर्यावरण अभ्यास दौ-याने उपलब्ध करून दिली. भारत-भूतान बाॅर्डरवरील जाता-येतानाचे दोन मुक्कामपारो शहरातील दोन आणि राजधानी थिंफूतील तीन अशा सात मुक्कामी दिवसाततत्पूर्वी अभ्यासलेला भूतान समजून घेता आला.
आपल्याला असंख्य भारतीय महानुभावांनी मर्यादेचे पालन करण्याची शिकवण दिली आहे.

चिंटी चावल ले चलीबीच में मिल गई दाल।
कहै कबीर दो ना मिलैइक ले डाल॥

असे मार्मिक विवेचन संत कबीर यांनी केले आहे. विकल्प हे मानवी डोक्यात बिघाड निर्माण करतात. घेशील किती दोन करांनी अशी माणसाची अवस्था होते. या अगतिकतेला,आपली दोन्ही हातांनी गोळा करायची आसक्ती कारणीभूत आहे. निसर्गाने माणसाला दोन हात दिलेतते दोन्ही हातांनी गोळा करावे म्हणून नाहीततर एका हाताने घ्यावं आणि दुस-या हाताने द्यावंयासाठी आहेत. नुसतं घेत राहिल्याने असमतोल निर्माण होतो. मानवी जीवनातील अरिष्टास तो कारणीभूत ठरतो. गौतम बुद्धांच्या साहित्यात तृष्णा असा शब्दप्रयोग आला आहे. बुद्ध विचाराने जगणा-या भूतानी माणसाचं समाधान आणि आनंद या विचारधारेमुळे टिकून आहे. हिमालय पर्वताच्या दक्षिणेकडील उतारावर वसलेला भूतान नैसर्गिक सौंदर्यासाठीबौद्ध माॅनेस्ट्रीकिल्ले यांसाठी प्रसिद्ध आहे. ऑफबीट डेस्टिनेशन असल्याने हौशी आणि नवख्या पर्यटकांनी शक्यतो भूतानचा मार्ग धरूच नयेअसे आमचे प्रामाणिक मत बनले. समाधान फक्त पैसाच देऊ शकतोहा जागतिक सिध्दांत बाजूला ठेवित पैशांपेक्षाही माणसांना मोठे मानणाराआनंदी जीवन जगणारा हा ३८ हजार कि.मी. परिसराचा देश आम्हाला विशेष वाटला. नोव्हेंबर महिन्यात आमच्या भूतानमधील आठवड्याभराच्या वास्तव्यात सरासरी ३ ते ७°से. तापमान राहिले. जवळपास ३ हजार भूतानी कलाकृतींचा संग्रह असलेले भूतानचे राष्ट्रीय संग्रहालय पारो म्युझियमनिसर्गाच्या कुशीत वसलेला बौद्ध परंपरेचा वारसा असलेला पारो डिझाँगहिमालय पर्वतरांगांचा अद्भूत नजारा दाखवणारा चेलेला पासटायगर नेस्ट मॉनेस्ट्रीट्रॅफिक लाईटस नसलेली जगातील एकमेव राजधानी थिंफूप्राचीन राजधानी पुनाखा आदि प्राचीनता पाहिली. थिम्पू हेरिटेज म्युझियम ही भूतानमधील ३ मजली लाकडी संग्रहालय इमारततेथील पुरातन काळातील नूडल बनवण्याचे मशीनबिबट्याच्या कातड्याच्या पिशव्या आम्हाला विशेष वाटल्या. पर्यावरणासह शाळाशेतीस्वच्छ आणि तळ दाखवणा-या नद्यारंगीबेरंगी पक्षीवृक्षवेली आदि समजून घेण्याचा प्रयत्न केला. भारतीय शहरवासी डास येथे भेटला नाही. मुख्यपिक भातासह भाजीपाला शेती पाहिली. प्रामाणिकपणे काम करणारे कष्टाळू लोकइथल्या सरकारने DON'T LITTERING, we have solution stop pollution असे लावलेले बोर्ड पाहिले. नद्यांमध्ये कपडे धुणा-या स्त्रीयागाड्यागायी-म्हशी धुणारे आढळले नाहीत. सांडपाणी वाळूमार्गे नैसर्गिक प्रक्रिया करूनच नदीला सोडलेले दिसले. श्रमिकपणामर्यादित गरजांमुळे ढेरी सुटलेली पोटं दिसली नाहीत. राजधानी थिंफूमधील डाकगृहात जाऊन भारत आणि जपानमध्ये छापलेली काही भूतान सरकारची तिकिटे घेता आली. भूतानमध्ये नाण्यांचे महत्त्व संपलेय. एक रूपयाला काहीच मिळत नसल्याने रूपयाचे नाणे व नोट मिळत नाही. सुदैवाने सन १९७९ ची तीन नाणी आणि नोट मिळाली. पाकीट मारणेचोरीस्त्रीयांची छेडछाडअत्याचार हे प्रश्न येथे नाहीत. अनेक ठिकाणी घाटांच्या रस्त्यावरअगदी सुनसान जागी एकटय़ा बायका छोटे-मोठे सामान घेऊन विकायला बसलेल्या दिसल्या. मोफत शिक्षणऔषधोपचार समजून घेण्याचा प्रयत्न केला. रस्त्यावरील वाहतुकीचे कडक नियम अनुभवले. रस्त्यावर कचरा फेकलेला दिसला नाही. फक्त टायगर नेस्ट रस्त्यावर जिथे भरपूर पर्यटक भारतीय असतात. तिथे रस्त्यावर कचराकुंडय़ा ठेवलेल्या असूनही इतरत्र कचरा पाहिलानि आमच्या भारतीय जीवनशैलीच्या खुणा दिसल्याचा साक्षात्कार झाला. अखिल विश्वा ला आर्थिक महामंदीपासून वाचवायचे असेल तर सकल राष्ट्रीय उत्पादन (जीडीपी) पेक्षा सकल राष्ट्रीय समाधान (जीएनएच) अर्थनीती राबविण्याची गरज आहेअसे सांगण्याचा भूतान प्रयत्न करते आहे. नाममात्र प्रदूषणप्राणवायूचे अधिक प्रमाणमनाला उल्हसित करणारी हवा७० टक्के भाग जंगलांनी व्यापलेला असल्याने भूतानला कार्बन निगेटिव्ह देश म्हणतात. भूतानमध्ये २००८ पासून लोकशाही आहे. रस्त्यावर कुणाच्या वाढदिवसाचेकुठल्याशा नेता-कार्यकर्त्याचे तीनपाट पदावर नियुक्ती झाल्याचेविशेषणांचा पाऊस पाडणारे एकही होर्डिग बघायला मिळाले नाही. कायदा पाळलाच पाहिजेअशी मानसिकता जाणवली. येथे लोक राजाला मनापासून मानतात. त्यामुळे बहुतेक दुकानांमध्ये,हॉटेलांमध्ये राजाचा छोटा-मोठा फोटोबॅनर हमखास दिसले. हा समृद्ध भूतान अनुभवताना आम्हाला पुण्याच्या सुप्रसिद्ध श्रीचंडिका ट्रॅव्हल्सच्या श्री. व सौ. राणी धनेश सरदेसाई यांची साथ राहिली.

      ज्येष्ठ समाजसेवकपद्मभूषण अण्णा हजारे यांच्या अध्यक्षतेखालीदरवर्षी निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंड़ळ महाराष्ट्र’ या संस्थेच्या वतीने आयोजित या संमेलनाच्या समारोपप्रसंगी पर्यावरण संवर्धन हा जागतिक आणि प्रत्यक्ष काम करण्याचा विषय असल्याचे प्रतिपादन अण्णा हजारे यांनी केले. आपल्या भाषणात बोलताना हजारे यांनीटाकाऊ पासून टिकाऊ निर्माण करण्याचा संकल्प करण्याचेविषयाची आसक्ती कमी करण्याचे आवाहन सर्वांना केले. जगभरात प्रदूषणामुळे आजारतापमानसमुद्रपातळी वाढतेयहिमनद्या वितळताहेत. त्यामुळे याविषयात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची जबाबदारी मोठी असल्याचे ते म्हणाले. समारोप प्रसंगी व्यासपीठावर मंडळाचे अध्यक्ष वृक्षमित्र आबासाहेब मोरेवखार महामंडळाचे महाव्यवस्थापक विजयकुमार ठुबेसी.ए. राज देशमुखसुभाष डांगे होते.

      हा विदेश अभ्यास दौरा करताना सर्वांना जागतिक ऑफबीट डेस्टीनेशन असलेल्या भूतान समजून घेता आले. भूतानची ओळखआंतरराष्ट्रीय महत्त्व असलेला टायगर नेस्ट चा ट्रेक यशस्वी करता आला. सर्वात महत्वाचे म्हणजे आबासाहेब मोरे यांच्या नेतृत्वाखाली भूतान मधील भारताचे राजदूत मा. जयदीप सरकार यांच्याशी राजधानी थिंफू येथील भारतीय दूतावासात भूतान पर्यावरण व संस्कृती संदर्भातील विविध मुद्दयानुरूप संवाद साधण्याची संधी मिळाली. एकूणात भूतान देशाची ओळख करून देण्यात हा दौरा यशस्वी ठरला. पुढील आयुष्यात भूतानमध्ये अधिकचे काय पाहायला हवे याची पक्की जाणीव करून घेत अत्यंत जड अंतःकरणानेजंगल नदी की माँ होती है हे तत्त्व शब्दशः जगत या विस्मयकारक भूमीतून सर्वजण महाराष्ट्रात परतले.

ओम नमो बुद्धाय !

धीरज वाटेकर
मो. +919860360948


टायगर नेस्ट 

पारो विमानतळ 

पुनाखा : पोचू मोचू नद्यांचा संगम 

पुनाखा पॅलेस 


बुधवार, १७ ऑक्टोबर, २०१८

चाळीशीच्या उंबरठ्यावर !

      नेमिले तू करि कर्म कर्तव्यचि म्हणोनिया : गीताई  
कालच्या १७ ऑक्टोबरला आम्ही वयाची ३८ वर्षे पूर्ण करून ३९ व्या वर्षात पदार्पण केले. अत्यंत शिस्तबद्ध जीवन जगण्याची कला मनुष्याला सततचे समाधान प्राप्त करून देत असते, याचा अनुभव वयाच्या १७ व्या वर्षांपासून गेली २१-२२ वर्षे आम्ही घेत आलो आहोत. मानवी जीवनात अनंत अडचणी सदैव येतच असतात, पण त्यावर सतत मात करून एकेक पाऊल पुढे जाण्यातली गंमत काही औरच असते. संपूर्ण कुटुंबियांसह असंख्य वंदनीय ‘गुरुजी’, सच्चे मार्गदर्शक, शिक्षक, जीवलग मित्र-मैत्रिणी आणि आबालवृद्धांच्या सानिद्ध्यात आम्हीही हा अनुभव घेतला आहे.

वास्तविक चाळीशी म्हटले की अनेकदा आपल्या भुवया उंचावतात, कधीकधी अस्वस्थही वाटू लागते. मलाही ‘सुटलेल्या पोटाची कहाणी’ लिहावी लागते की काय अशी शंका होती ! असो... आपण किती वर्षे जगलो यापेक्षा कसे जगलो यालाच जीवनात अधिक महत्त्व असल्याचे संदेश आपण फेसबुक / वॉट्सपवर सतत वाचत असतो. तशा जगण्यातली मजा काही वेगळीच असते. गुणवत्तापूर्ण जगण्यासाठीही चाळीशीनंतरचा काळ अधिक महत्त्वाचा असतो. वय वाढण्याची प्रक्रिया ही आपल्या जन्मापासूनच सुरूच असते. शरीरात काही अपरिहार्य, अटळ बदल वयोमानानुसार होत असतातचं ! ते मान्य करून जगण्याची सवय आपल्याला आनंद प्रदान करते. बालपणापासून आम्ही वाट बघण्याचा अतिरेक आणि अतिघाई या मधला फरक समजून घेत जगण्याचा प्रयत्न करत आलो आहोत. तरीही अनेकदा घाई होतेच ! कालच्या वाढदिनी आम्हांला फोन, फेसबुक, वॉट्सपवरून शुभेच्छा देणाऱ्या सर्वांचे आम्ही याद्वारे आभार व्यक्त करीत आहोत.
      वीस वर्षांची काय नवलाई ती, साखर तेव्हा कायतरीच स्वस्त होती !
      बापानं आमच्या वाटी वाटी वाटली ती, पहिल्या पुत्र लाभाकारणे !
      घराणे तसे देवादिकातले, भटजी आले, पाटावर बसले !
      पंचांग उघडले, आणि घातले, अवघे बोटचि की हो तोंडात !
      सतरा ऑक्टोबरला जन्म ज्याचा ज्याचा...          
      वयाच्या विसाव्या वर्षी कॉलेजच्या स्नेहसंमेलनात ही ७२ ओळींची कविता आम्ही सादर केली होती. दुर्दैवाने ती आमच्या कडून गहाळ झाली. पण या सुरुवातीच्या ओळी मात्र आजही आठवत राहतात. त्यावेळी आमच्यासोबत असलेल्यांना नक्की आठवतील. वीस वर्षांनंतर चाळीशीच्या उंबरठ्यावर आज त्या पुन्हा शेअर कराव्याश्या वाटल्या.      

आमच्या ‘नियोजित’ जीवनाला अर्थप्राप्त करून देणाऱ्या सर्वांना पुन्हा एकदा मन:पूर्वक धन्यवाद !!!

धीरज वाटेकर
विजयादशमी, दिनांक १८ ऑक्टोबर २०१८

सन २००० @ अलोरे ता. चिपळूण 


सोमवार, १५ ऑक्टोबर, २०१८

‘तिवरे ते मालदेव’ व्हाया ‘बैलमारव घाट’

             

 
इतिहासात, ‘देश आणि कोकण’ या दरम्यान चालणारी चिपळूणसह त्याला जोडलेल्या अनेक गावांची व्यापारी देवघेव ज्या मार्गाने चालत होती तो घाट ‘बैलमारव घाट’ या नावाने प्रसिद्ध आहे. पूर्वांपार या मार्गाने लमाणांचे तांडे कोकणात येत असत. सन १८४६ च्या दरम्यान रत्नागिरी-सातारा सीमा जोडणाऱ्या कुंभार्ली घाटातून बैलगाडी प्रवास सुरु झाला आणि ‘बैलमारव घाट’ परिसराचे व्यापारी महत्त्व हळूहळू कमी होत गेले. मात्र प्रदूषणाने घेरलेल्या सध्याच्या काळात या प्राचीन घाटमार्गांवर असणाऱ्या पदभ्रमण मार्गांना महत्त्व प्राप्त होऊ घातले आहे. वन्यजीव परीक्षणपर्यटनासह ट्रेकींग करणाऱ्यांसाठी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील महाबळेश्वर ते आंबा घाट दरम्यान ८ हॉट स्पॉटनजीकच्या बफर झोनचे दरवाजे वन्यजीव विभागाने नुकतेच उघडले. तिवरे ते मालदेव व्हाया बैलमारव घाट हा त्यापैकी एक आहे. या ‘ट्रेकरूट’वरील प्रत्यक्ष अनुभवलेल्या, सामान्य पर्यटकाला आपलंस करण्याची क्षमता असलेल्या परिसराचा आढावा !

     
प्राचीन बैलमारव घाट  
चिपळूण पर्यटन विकासासाठी झटणारी मातृसंस्था ‘ग्लोबल चिपळूण टुरिझम’ने या जंगल ट्रेकना पर्यटकाभिमुख बनविण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून नुकताच आबालवृद्धांच्या उत्साही सानिद्ध्यात 
सह्याद्री टायगर रिझर्व्हनजीक असलेला तिवरे ते मालदेव व्हाया बैलमारव घाट हा ट्रेक ३० निसर्गप्रेमींनी १६ कि.मी. भटकंती करीत अडीच हजार फुट उंचीपर्यंत जात यशस्वी केला. या ट्रेक दरम्यान तिवरेदुर्गमालदेवपालीदेवसरीबैलमारवघाटरेडेघाट हा परिसर नजरेच्या टप्यात येतो. रत्नागिरी जिल्ह्याच्या ८२४८.८ चौ.कि.मी. भौगोलिक क्षेत्रापैकी अवघे ६२.५९ चौ.कि.मी. वनक्षेत्र आहे. जिल्ह्याच्या पूर्व सीमेवर सह्याद्रीच्या उंच शिखरांची उंची ४०० ते २००० मीटरपर्यंत आहे. जिल्ह्याला लागूनच कोयना व चांदोली अभयारण्ये असल्याने वन्यप्राण्यांचा वावर सह्याद्रीच्या खोऱ्यात आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या पायथ्याशी वसलेल्या गावांमध्ये या माध्यमातून स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ‘जंगलट्रेक’चे प्रयोजन असून हे घडल्यास जंगलतोडजंगलातील वणवे यांचे प्रमाण कमी होऊ शकेल, असा प्रशासनाला विश्वास आहे.

      चिपळूणहून ३१ कि.मी. अंतरावर असलेले तिवरे हे गाव सह्याद्रीतील चिपळूण तालुक्यात इतिहासप्रसिद्ध ‘दसपटी’ (दस म्हणजे दहा आणि पट्टी म्हणजे कर दहा टक्क्यांची करवसुली) या २८ गाव इनाम भागात येते. चिपळूण तालुक्याच्या या पूर्व भागात,
मालदेवच्या दिशेने कूच करताना ट्रेकर्स 
सह्याद्रीत बारराव कोळ्याचे साम्राज्य होते. मौजे पेढांबे गावाच्या माथ्यावर खडपोली, कळकवणे यांच्या सीमामध्यावर पंधराशे फूट उंचीचा बारराव कोळ्यांचा ‘किल्ले बारवई’ आहे. तेथे १२ कोरीव लेणी (ओवरी/खोली) आहेत. त्यांचा पाडाव केल्यानंतर शिंदे-कदम सरदारांनी या भागात आपला अंमल प्रस्थापित केला. या दरम्यान त्यांनी कुंभार्ली, चोरवणे खिंड आणि तिवरेच्या घाटात ध्वज लावून चौक्या बसविल्या होत्या. या घाटांतून वाहतूक चालू असताना चिपळूणसह गोवळकोट बंदरात पडाव लागत. गोवळकोट बंदरात ४०० लोकांना एकाचवेळी आणणाऱ्या बोटी प्रवासात होत्या. शहरातील जुन्या पद्मा चित्रमंदिरासमोरील ‘कोकणी आणि घाटी’ अशा दोन स्वतंत्र भव्य गाडीतळात शेकडो बैलगाड्या उभ्या असत. सांगली, कराड, कोल्हापुरातून गूळ, ज्वारी, मिरची, कांदा, लसूण, गुळ, हरभरा, चवळी, मूग, आणि इतर शेतमालाची वाहतूक होत असे. बैलमारव घाटातून 
पुरातन काळापासून देशावरून लमाणांचे तांडे या वाटेने कोकणात येतं. हा घाट कोकण व पश्चिमघाट यांना जोडणारा महत्वाचा दुवा होता. याच मार्गे बैलांच्या पाठीवर माल लादून त्याची ने-आण चाले. म्हणून त्यास बैलमारव घाट असे नाव पडले.

      तिवरेचे ग्रामदैवत श्रीदेवी व्याघ्रांबरी देवस्थानचा ञैवार्षिक जञोत्सव (समा) आपली सुमारे पाचशे वर्षांची परंपरा जोपासून आहे. गावात सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेल्या गंगेचीवाडी भागातखडकाळ नदीप्रवाहाच्या तीरावर गंगाकुंड’ आहे. या कुंडात दर तीन वर्षांनी कार्तिक महिन्यात सातशे वर्षापूर्वीपासून गंगा उगम पावते आहे. या पर्वणी काळात गंगास्नानास भाविकजिज्ञासूपर्यटक यांची येथे रीघ लागलेली असते. तिवरे येथील सहयाद्रीच्या रांगेत उंच टेबलासारखा पठारवजा डोंगर दिसतो तो तिवरेगड. तिवरे गावातून बैलमारव घाटातून या गडाकडे, मालदेवकडे जाण्याचा प्रवास सुरू होतो. घाट संपल्यानंतर खिंडीतून उजव्या बाजूने पाल घाटातून पाली गावाकडे, तिवरेगडावर पोहोचता येते.तिवरेगडावर देवीची छोटी मूर्ती, चौथ-याचे भग्नावशेष दिसतात. हा परिसर सह्याद्री प्रकल्पाच्या कोअर झोन मध्ये असल्याने तेथे जाता येत नाही. घाटमार्गांवर लक्ष ठेवण्यासाठी किल्ल्याची योजना असावी. तिवरे धरणाच्या उजवीकडीलभेंडवाडीतील उंच टापूवर आपल्या गाड्या उभ्या करून ठेवून धरणाच्या डाव्या किंवा
मालदेवहून दिसणारे तिवरे धरण  
उजव्या 
तीरावरून (स्थानिक वाटाड्यांच्या सूचनांनुसार) ट्रेकची सुरुवात करता येते. तिवरे ते मालदेव हा बैलमारव घाटातील प्रवास प्राचीन इतिहासाची आठवण करून देतो. घाटाच्या मध्यभागीही श्रीदेवी व्याघ्रांबरीचे स्थान आहे. याच घाटमार्गे तिवरे गावात प्रवेश करताना देवीने येथे काहीकाळ विसावा घेतला होता. तेथून थोडे पुढे मार्गक्रमण केल्यानंतर, ‘बैलमारव आलं हं !’ ही अक्षरे लिहिलेला मोठासा काळाकभिन्न पत्थर दिसतो. तिवरे धरणाच्या बॅकवॉटरच्या शेजारून सुरुवातीचा  प्रवास पूर्ण झाल्यानंतर हा घाट सुरु होतो. घाटातील वातावरण आल्हाददायक आहे. घाट संपतो तेथे खिंड आहे. तिवरे गावातून मालदेवकडे पहिले असता खिंडीचा आकार इंग्रजी ‘U’ अक्षरासारखा दिसतो. मालदेवच्या पश्चिमेला कोकणात याच खिंडीतून दोन वाटा उतरल्या आहेत. त्यातली एक बैलमारव घाटमार्गे आणि दुसरी सोंडेवरून उतरणारी देवसरीची वाट आहे. तिवरे गावातून तेराशे फूट उंचीवर सहयाद्रीत ऊर्ध्व बाजूकडून पायाकडे निमुळता होत गेलेला सुमारे २२ फूट उंचीच्या विशाल प्रस्तरखंडाच्या शेजारून ही वाट गेलेली आहे. प्रस्तरखंडाचा आकार साधारणपणे उभ्या केलेल्या चिलमीसारखा दिसायचा म्हणून त्यास चिलीम खडकही म्हणत. किमान अडीच-तीन तासांच्या पदभ्रमणानंतर बफर आणि कोअर झोनच्या सीमांवर असलेल्या अडीच हजार फुट उंचीवरील मालदेव गाव सीमेत आपण तिवरेघाट खिंडीतून प्रवेश करतो. सुखावणारा थंडगार वारा येथे आपले स्वागत करतो. जवळचा एखादा जीवंत झरा आपली तृष्णा भागवतो.मालदेव हद्दीत डाव्या बाजूस असलेल्या उंच टापूवरून दिसणारे तिवरे धरणाचे विहंगम दृश्य, सह्याद्रीच्या विशालतेचे दर्शन घडते.

ट्रेकमधील एका निवांत क्षणी ब्लॉगलेखक  
      सह्याद्रीच्या माथ्यावर उंच पठारावरील सपाट माळरान म्हणजे माळदेव किंवा मालदेव’ होय. कोयना खोऱ्यातील वासोटा किल्ल्याजवळ असलेल्या ‘मालदेव’चे सन १९५९ नंतर कोयना जलविद्युत प्रकल्पाची गरज म्हणून मनुष्य वस्ती उठवून पुनर्वसन झाले आहे. परंतु शहरीकरणाचा स्पर्श न झालेले, गेली अनेक दशके मालदेव ट्रेक करणाऱ्या असंख्य डोंगरभटक्यांचे स्थानिक मार्गदर्शक ‘पितृतुल्य’ ८५ वर्षीय शामराव कोकरे यांनी गावावरचे प्रचंड प्रेम, मातीशी असणारे मायेचे नाते यांमुळे अगदी काल-परवापर्यंत गाव सोडलेले नव्हते. ‘मालदेव रिकामं झाल्यानंतरही शामराव भूतासारखे एकटे तिथं राहात. श्वापदांनी हल्यात त्यांचा अडीचशे जनावरांचा गोठा रिता केला. पण ‘मरेन तर इथंच’ या हट्टाने शामराव अनेक दशके येथे राहिले. डोक्याला गुंडाळलेलं मुंडासं, अंगात शर्ट, भगवी लुंगी, हातात काठी, खांद्यावर बॅग असा पेहेराव असलेल्या  शामरावांचा अनेक ट्रेकर्सनाकोयनेतल्या निसर्गाइतकाच लळा आहे. वन्यजीवांच्या सान्निध्यात राहण्याची सवय जडल्याने त्यांना आजही कुठेही गेलं तरीही मालदेव आठवत राहतं. याच आठवणीतूनच त्यांनी (१ ऑक्टोबर २०१८) मालदेवकडे कूच केली नि ट्रेकदरम्यान आमची-त्यांची भेट घडली. ट्रेकच्या दिवशी पहाटे आमच्या सौभाग्यवतीने बनवून सोबत दिलेले ‘कांदेपोहे’ शामरावांना खाऊ घालताना आम्हाला जो आत्मिक आनंद मिळाला तो शब्दातीत ! ‘वाघ आता म्हातारा झालायं, आता त्याला किंमत उरली नाही’, हे त्यांचे वाक्य ऐकून मनाला वेदनाही झाल्या. जंगली श्वापदांची शास्त्रीय माहिती बाजूला ठेवून शामारावांना विविध प्रश्न विचारून खरं जंगल जाणून घेण्याचा अनेकांचा शिरस्ता आम्हीही पाळला. मालदेव हे जिल्ह्याचे ठिकाण साताऱ्यापासून ९७ कि.मी., तर जावळी ९२  कि.मी. अंतरावर आहे७३४ हेक्टर क्षेत्र असलेल्या कोअरझोन मध्ये असलेल्या मालदेवात आता मनुष्य वस्ती नाही. ‘शामराव’ मात्र आजही या भागात अधून-मधून भटकताना दिसतात. या भागात उंबर, अंजन, कढीपत्ता, शिकेकाई, वावडिंगची झाडे, रानगवे, अस्वल, जंगली कुत्रे, रानडुक्कर, बिबट्या, कोल्हा आदि वन्यजीवांचे अस्तित्त्व आहे. अरण्यसहवासासाठी मालदेव उत्तम आहे. शामराव कोकरेंचे वास्तव्य राहिलेल्या वाड्यानजीक एक पुरातन जांभ्या दगडाची बांधीव चौकोनी विहीर (घोडेबाव) असून तीत उतरण्यास रूंद पायऱ्या आहेत. मुख्य मंदिरात चार कोनाडयाचे छप्पर असून भैरव व देवीच्या मूर्ती आहेत. कोयना धरणाचे बॅकवॉटर पसरलेल्या बामणोली गावातूनही बोटीने मालदेवला जाता येतेहा परिसर कोअरझोन (अतिसंवेदनशील) असल्याने येथे जाण्यास मज्जाव आहे.

      मनुष्याला अरण्यवाचन आल्यासच जंगले’ टिकतील ही नामवंत वन्यजीव अभ्यासक निलेश बापट यांची भूमिका ट्रेकमध्ये त्यांच्याच तोंडून ऐकण्यातला आनंद काही औरच ! ‘ग्लोबल चिपळूण पर्यटन’चे अध्यक्ष श्रीराम रेडीज यांनी आपली संपूर्ण शारीरिक क्षमता पणाला लावून हा ट्रेक पूर्ण केला. हे पाहून त्यांना ‘सलाम’ करावासा वाटला. आजपर्यटनाचा ट्रेण्ड बदलतोय. लोक त्याच-त्या पर्यटनाला कंटाळलेत. शहरातील जगण्यातली हिरवाईची उणीव भरून काढण्यासाठी पर्यटकांची पावलं निसर्ग सफारींकडं वळू लागलीत.पर्यटकांना जंगलांतला भन्नाट रानवारा शीळ घालतोय. जंगलातल्याआडरानातल्या वाटा खुणावू लागल्या आहेत. म्हणूनच नेचरट्रेल्सजंगल सफारींना प्रतिसाद मिळतोय. महत्त्वाचेम्हणजे सर्व वयोगटातील निसर्गप्रेमी तिथं जाताना दिसत आहेतट्रेकिंग करताना मानवाच्या शारीरिक क्षमतांचा कस लागतो. अनेकदा शरीर अजून सुदृढ बनवायला हवं,खाण्यापिण्यावर नियंत्रण गरजेचं’ असल्याची जाणीवही होते. वयाच्या चाळीशीत थोडंस चालल्यानंतर पाय दुखायला लागले तर आपल्या शरीराच्या सूचना आपल्यालाच मिळत जातात. ट्रेक करताना नुसतेच काय डोंगर चढता नि उतरता ? हा पूर्वीचा खोचक प्रश्न आता कमी झालायं. ट्रेकिंगमध्ये निसर्गातल्या अनेक घटकांशी मुक्तपणे संवाद करता येतो. अनेक सहकाऱ्यांशी जुळवून
२५०० फूट उंचीवर पोटपूजा !
घेत जीवनाची शिस्तबद्ध हालचाल करता येते. डोंगरात वर चढताना श्वासांची क्रिया जलद होते
त्यामुळे पूर्ण श्वासोच्छ्वासाची जलद प्रक्रिया घडते. रक्तप्रवाह वाढतोरक्ताभिसरणाची क्रिया जलद होते. प्रसंगी शीरांतीलनसांतील ब्लॉकेज निघतात. ब्लड-प्रेशरचा त्रास कमी होतो. गुडघे, पायांवर ताण येऊन स्नायु उत्तेजित होतात. चढ चढताना दम भरल्याने फुफ्फुसे पुर्ण क्षमतेने ऑक्सीझन आत घेतात आणि बाहेर सोडतात. गुरुत्वाकर्षणाच्या विरुध्द चालल्याने कधीकधी डिहाइड्रेशनमुळे शरीरातील पाणी पातळी कमी होते मात्र इप्सित ठिकाणी पोहोचल्यावर झरातळीपावसाचे अतिशुद्ध पाणी पिल्याने शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती कमालीची वाढते. शरीरातील चरबी कमी होते. मन प्रसन्न करणाऱ्यानिसर्गाची मुक्तहस्त उधळण असलेल्या वातावरणाने ताण-तणाव दूर होण्यास मदत होते. ट्रेकिंगमुळे श्वसनरक्तप्रवाहगुडघेछातीपोट आणि मानसिक मानसिक आजारांचे प्रमाण कमी होते. त्यामुळे याकडे दुर्लक्ष करण्यापेक्षा स्वतः खात्री केव्हाही श्रेयस्कर !
    
  निसर्गावर मात करु पाहाणाऱ्या जीवनशैलीने आम्हाला गेल्या शतकात हृदयरोग आणि चालू शतकात कर्करोग दान’ केला आहे. यामुळे मनुष्य नावाचा भारतीय प्राणी निसर्गाकडेनिसर्ग सहवासाकडेआयुर्वेदीय संकल्पनांकडे अतिशय सकारात्मक दृष्टीने पाहू लागला आहे. दैनंदिन टिपिकल घर ते ऑफिस जीवन जगणाऱ्या अनेकांना ट्रेकिंगचे महत्त्व पटल्याने डोंगरातील पदभ्रमण हा साहसी पर्यटन प्रकार आता सामान्य पर्यटकांत रुजतो आहे. ट्रेकिंगमॅरेथान सारख्या उपक्रमांना सामान्यजनांचा प्रतिसाद वाढतो आहे. शहरात खाण्यावर वाट्टेल तसा आडवा-उभा ताव मारतअरबट-चरबट खाणं शरीराला लवकर थकवतं आणि डोंगर-दऱ्यांमधल्या पाऊलवाटांवरून चालताना हे जाणवतं. या बाबतच्या वाढत्या जाणीवांमुळे पर्यटक’ म्हणवणारा एक वर्ग ट्रेकिंगकडे वळतो आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील महाबळेश्वर ते आंबा घाट दरम्यान वन्यजीव विभागाने ८ हॉट स्पॉटनजीकच्या बफर झोनचे दरवाजे नुकतेच उघडल्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या ट्रेकला मिळालेला प्रतिसाद त्याचेच द्योतक आहे. तेव्हा ग्लोबल चिपळूण पर्यटन’ (संपर्क : ९८२३१३८५२४) संस्थेने सुरु केलेल्या या ट्रेकचा आनंद घ्यायला तुम्हीही या ! इथला सह्याद्री तुमचे स्वागताला सज्ज आहे !



धीरज वाटेकर


पत्ता : विधीलिखित’, १२६३-बकांगणेवाडी रोडखेंडचिपळूण ४१५६०५जि. रत्नागिरी. मो. ९८६०३६०९४८.

ई-मेल - dheerajwatekar@gmail.com

(धीरज वाटेकर हे पर्यटन आणि चरित्र लेखन’ या विषयावरील प्रकाशित आठ पुस्तकांचे लेखक असून कोकण इतिहासपर्यटनपर्यावरणविषयकसामाजिक जागृतीपर विषयात गेली १५ वर्षे कार्यरत पत्रकार आहेत.)

दैनिक सागर चिपळूण १४ ऑक्टोबर २०१८ 

मुंबई तरुण भारत १४ ऑक्टोबर २०१८
सहभागी ट्रेकर्स



आस्थेवाईक गुरुजींची सेवानिवृत्ती

        एकविसाव्या शतकाच्या प्रारंभीची घटना. चिपळूण जवळच्या एका तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सकाळी साडेदहा वाजता भरणाऱ्या शाळेत जाण्यासाठी ...