शनिवार, २६ सप्टेंबर, २०२०

अतुलकाका सराफ यांची निसर्ग व पर्यावरण मंडळास तंत्रस्नेही भेट

तंत्रस्नेही भेटीचा ऑनलाईन ‘हस्तांतरण आणि शुभारंभ सोहोळा’

चिपळूण / अहमदनगर : आपली उद्यमशीलता जपून समाज विकासाचा ध्याय घेतलेले, कुंथलगिरी येथे सुमारे ६९ लाख लिटर क्षमतेचे शेततळे उभारणारे, नॅशनल ज्वेलरी अॅवार्डकडून ‘जेम ऑफ द इयर’ पुरस्काराने सन्मानित चंदुकाका सराफ अॅन्ड सन्स प्रा. लिमिटेड बारामतीचे संचालक अतुलकुमार जीनदत्त शहा (सराफ) उर्फ अतुलकाका यांनी निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या पर्यावरण संवर्धनविषयक राज्यव्यापी कामाला गती प्राप्त व्हावी, तंत्रज्ञानाची जोड मिळावी या हेतूने लॅपटॉप, प्रिंटरसह एक वर्षांचे पेड झुम व्हिडीओ कन्फरन्स अॅप नुकतेच अध्यक्ष ‘वृक्षमित्र’ आबासाहेब मोरे यांना भेट दिले. जागतिक पर्यटनदिनी या तंत्रस्नेही भेटीचा ऑनलाईन ‘हस्तांतरण आणि शुभारंभ सोहोळा’ झूम व्हिडीओ कॉन्फरन्सिंग अॅपद्वारे संपन्न झाला.

चंदुकाका सराफ अॅन्ड सन्स प्रा. लिमिटेडचे अहमदनगरचे प्रतिनिधी आनंदभाई कोठारी यांचे हस्ते मोरे यांनी आपल्या संपर्क कार्यालयात ही भेट स्वीकारली. यावेळी मंडळाचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष तुकाराम अडसुळ, कार्याध्यक्ष पै. नाना डोंगरे, वैभव मोरे उपस्थित होते. मोरे यांच्या गेल्या ३/४ वर्षांतील सह्राद्री वाहिनी आणि इतर न्यूजवाहिन्यांवरील मुलाखती ऐकून अतुलकाका सराफ यांनी आबासाहेबांना फोन करून मंडळाचे काम जाणून घेतले होते. गेली काही वर्षे ते स्वतः आणि त्यांचे सहकारी बाळकृष्ण कुलकर्णी हे आबासाहेबांच्या संपर्कात आहेत. मंडळाच्या पर्यावरणीय कामावर समाधान व्यक्त करणाऱ्या सराफ यांनी या भेटीद्वारे मंडळाला तंत्रस्नेही होण्याची संधी उपलब्ध करून दिली. कार्यक्रमाप्रसंगी बोलताना मंडळाचे सचिव धीरज वाटेकर यांनी पर्यावरण मंडळाच्या कामाचा आढावा घेतला. अतुलकाका यांच्या कार्याविषयी माहिती दिली. ते म्हणाले, ‘कोरोना वैश्विक महामारीच्या काळात मंडळाला मिळालेलं हे दूरसंचार यंत्रणेच योगदान आपणा सर्व पर्यावरणप्रेमी कार्यकर्त्यांच्या हाताना बळकटी देणारं ठरणार आहे. शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक कार्यात तन, मन आणि धनाने सहभाग घेणाऱ्या, समाजाला आपण काय देऊ शकतो ? याचा विचार करणाऱ्या, सेंद्रिय शेतीत विशेष रुची असलेल्या अतुलकाकांनी, ‘वृक्षमित्र आबासाहेब मोरे यांचे वय, सध्याची कोरोना स्थिती, मंडळाच्या पर्यावरण कामाची राज्यभर असलेली व्याप्ती, पर्यावरणप्रेमी सदस्यांचा मंडळातील सक्रीय सहभाग विचारात घेऊन अडचण येऊ नये आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मंडळ सतत प्रगतीपथावर कार्यरत व्हावे यासाठी  दिलेल्या या योगदानाबद्दल वाटेकर यांनी अतुलकाकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी बोलताना वृक्षमित्र आबासाहेब मोरे यांनी अतुलकाका यांना या सहकार्यासाठी धन्यवाद दिले. निसर्ग व पर्यावरण मंडळाचा प्रत्येक सदस्य हा पर्यावरण संवर्धन हे ध्येय समोर ठेवून कार्यरत आहे. मंडळाच्या माध्यमातून राज्यात बीजारोपण, वृक्ष लागवड मोहीमेसह रोपवाटिका नियोजन करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले. यावेळी बोलताना अतुलकाका शहा यांनी, झाडे वाढली तर आपल्याला अधिक ऑक्सिजन मिळणार असून हे काम व्हायला हवे असल्याचे म्हटले. मंडळाचे काम राज्यभर  सुरु आहे ही चांगली बाब आहे. यासाठी आपण आपले कर्तव्य केल्याची भावना त्यांनी बोलून दाखविली. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.

या ऑनलाईन ‘हस्तांतरण आणि शुभारंभ सोहोळा’ झूम व्हिडीओ कॉन्फरन्सिंगला राज्यभरातून कार्याध्यक्ष विलास महाडिक, डॉ. गौतम सावंत, राजेंद्र सावंत, प्रियवंदा तांबोटकर, विलास शेडाळे, नाना पाटील, शिवा नंदकुले, बाळासाहेब चोपडे, प्रमोद मोरे, बाळासाहेब कणसे, माधव केंद्रे, बाबासाहेब महापुरे, अ‍ॅड. सौ. आंधळे, प्रणिता पाताडे,  उमाजी बिसेन, सुहास गावितम रामदास खवसी, कचरु चांभारे, अनिल लोखंडे, संजय भापकर, डॉ. जगदीश पाटील, दत्तात्रय मंचरे, प्रमोद काकडे, सुनिल दिघे, नंदकुळे शिवप्पा, नयना पाटील, संजय ताडेकर, लीलाधर वानखेडे, राजेश पाटील, सुरेंद्र पाटील, प्रभाकर तावरे, विजय लुल्हे, रविंद्र खरादे, कुंभकर उपस्थित होते. यांनी सहभाग नोंदवला. कॉन्फरन्सचे सूत्रसंचालन आणि आभार मारुती कदम यांनी मानले. वनश्री प्रतिज्ञा वाचनाने कॉन्फरन्सचा समारोप झाला.

 तंत्रस्नेही भेटीच्या ऑनलाईन ‘हस्तांतरण आणि शुभारंभ सोहोळा’ निमित्ताने...

आदरणीय अतुलकाका सराफ यांचेविषयी लिहिलेला विशेष ब्लॉग

 पर्यावरणप्रेमी सेवाव्रती उद्योजक

आपली उद्यमशीलता जपून समाज विकासाचा ध्याय घेतलेले, कुंथलगिरी येथे ६८ लाख ७५ हजार २८० लिटर क्षमतेचे शेततळे उभारणारे, नॅशनल ज्वेलरी अॅवार्डकडून ‘जेम ऑफ द इयर’ पुरस्काराने सन्मानित चंदुकाका सराफ अॅन्ड सन्स प्रा. लिमिटेड बारामतीचे संचालक आदरणीय अतुलकुमार जीनदत्त शहा (सराफ) उर्फ अतुलकाकांनी, निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे अध्यक्ष ‘वृक्षमित्र’ आबासाहेब मोरे यांच्या नेतृत्त्वाखालील पर्यावरण संवर्धनविषयक राज्यव्यापी कामाला गती प्राप्त व्हावी, तंत्रज्ञानाची जोड मिळावी या हेतूने लॅपटॉप, प्रिंटरसह एक वर्षांचे पेड झुम व्हिडीओ कन्फरन्स अप भेट दिले. त्याचा ‘हस्तांतरण आणि शुभारंभ सोहोळा’ आज (२७ सप्टेंबर) ऑनलाईन स्वरुपात आपण चंदुकाका सराफ अॅन्ड सन्स प्रा. लिमिटेडचे अहमदनगरचे प्रतिनिधी आनंदभाई कोठारी यांचे शुभहस्ते संपन्न झाला. आपले अध्यक्ष आबासाहेबांच्या गेल्या ३/४ वर्षांतील सह्राद्री वाहिनी आणि इतर न्यूजवाहिन्यांवरील मुलाखती ऐकून आदरणीय अतुलकाकांनी, आबासाहेबांना फोन करून मंडळाचे काम जाणून घेतले. गेली काही वर्षे ते स्वतः आणि त्यांचे सहकारी बाळकृष्णकाका कुलकर्णी हे सातत्याने आबासाहेबांच्या संपर्कात होते. मंडळाच्या पर्यावरणीय कामावर समाधान व्यक्त करणाऱ्या आदरणीय अतुलाकाकांनी आपल्या मंडळाला तंत्रस्नेही होण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. त्याबद्दल आपण सर्वांनी त्यांचे अभिनंदनही केले. कोरोना वैश्विक महामारीच्या काळात मंडळाला मिळालेलं हे दूरसंचार यंत्रणेच योगदान आपणा सर्व पर्यावरणप्रेमी कार्यकर्त्यांच्या हाताना बळकटी देणारं ठरलं आहे. त्या निमित्ताने अतुलकाकांचा आपण थोडक्यात परिचय करून घेऊ यात.

विविध ठिकाणी असलेल्या १४ शाखांच्या माध्यमातून शुद्धता, विश्वास आणि परंपरा यांवर आधारित आपली १९३ वर्षांची परंपरा जपणारा, चंदुकाका सराफ अॅन्ड सन्स प्रा. लिमिटेड हा सोने खरेदी-विक्री व्यवहारातला पश्चिम महाराष्ट्रातला प्रसिद्ध ‘ब्रँड’ आहे. कोरोना संकटात मागच्या १५ मे रोजी बारामतीत लॉकडाऊन शिथिलतेनंतर एका दिवसात ३ कोटी रुपयांचे सोने खरेदीचे व्यवहार झाले. या वृत्ताची दखल संपूर्ण देशातील माध्यमांनी घेतली होती. या व्यवहारामागे चंदुकाका सराफ आणि परिवाराने जपलेली विश्वासार्ह्यता आहे. अतुलकाकांना नुकतेच १५ फेब्रुवारी २०२० रोजी नॅशनल ज्वेलरी अॅवार्ड सोहोळ्यात ‘जेम ऑफ द इयर’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. परिवाराच्या पुढच्या पिढीचे प्रतिनिधी सिद्धार्थ शाह यांनाही ‘महाराष्ट्र टाईम्स’तर्फे ‘यंग अचिव्हर्स २०२०’ पुरस्काराने गौरविण्यात आले.

सिद्धक्षेत्र श्रीदिगंबर जैन सिद्धक्षेत्र कुंथलगिरी संचालित भक्तनिवास, विद्यार्थी वसतिगृह, विविध पशुपक्षी, फळबागा, विविध प्रकारची झाडे आणि शेतीकरिता वर्षभर सातत्याने व मुबलक पाणी पुरवठा व्हावा या हेतूने जलसंधारण कामांतर्गत २० ऑगस्ट २०२० रोजी, अतुलकाकांनी स्वखर्चाने ६८ लाख ७५ हजार २८० लिटर क्षमतेचे शेततळे उपलब्ध करून दिले. विशेष म्हणजे परामपूज्य शांतीसागर महाराजांच्या ६५ व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने पूर्णत्त्वास गेलेल्या शेततळ्याचे काम अमीर खान संचलित पाणी फाउंडेशन विकास सेवा मंडळाने केले आहे. या शेततळ्याची लांबी ५४ मीटर, रुंदी ४४ मीटर आणि खोली सात मीटर आहे. या शेततळ्यामुळे श्रीदिगंबर जैन सिद्धक्षेत्र कुंथलगिरी संस्थेची पाण्याची संपूर्ण गरज पूर्ण होईल. या ठिकाणी तयार झालेला शेततळ्याचा हा पहिला प्रकल्प आहे. या शेततळ्याचे ‘वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे तलाव’ असे नामकरण करण्यात आलेले आहे.

शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक कार्यात तन, मन आणि धनाने सहभाग घेणाऱ्या, समाजाला आपण काय देऊ शकतो ? याचा विचार करणाऱ्या, सेंद्रिय शेतीत विशेष रुची असलेल्या अतुलकाकांनी, ‘वृक्षमित्र आबासाहेब मोरे यांचे वय, सध्याची कोरोना स्थिती, मंडळाच्या पर्यावरण कामाची राज्यभर असलेली व्याप्ती, पर्यावरणप्रेमी सदस्यांचा मंडळातील सक्रीय सहभाग विचारात घेऊन अडचण येऊ नये आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मंडळ सतत प्रगतीपथावर कार्यरत व्हावे यासाठी  हे योगदान दिले आहे. याद्वारे आपण आपली फक्त सामाजिक बांधिलकी जपल्याचे नमूद करणाऱ्या अतुलाकाकांचे आपण सर्वांनी मनापासून अभिनंदन करूयात !

धीरज वाटेकर

सचिव, निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ

मो. ९८६०३६०९४८

 

जेम ऑफ द इयर 'अतुलकाका '

सिद्धार्थभाई शाह गौरव 

कुंथलगिरी शेततळे हस्तांतरण 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

आस्थेवाईक गुरुजींची सेवानिवृत्ती

        एकविसाव्या शतकाच्या प्रारंभीची घटना. चिपळूण जवळच्या एका तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सकाळी साडेदहा वाजता भरणाऱ्या शाळेत जाण्यासाठी ...